Skip to main content

कविता माझी

..तिथे ती भेटते

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 04/07/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
ढगाच्या आतले विजेचे वेटोळे सुटून मोकळे डोंगरा डसते...तिथे ती भेटते निबिड रानात पोपटी पानात झुकून बघत मोतिया थेंबात ...किणकिण हासते भणाण वाऱ्यात लाटेच्या गाजेत चांदीच्या वर्खात किनारा कोरत ... माझ्याशी बोलते
काव्यरस

आयुष्याची गाडी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 28/06/2017 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
रिकामी दिसली एक गाडी त्यात जाऊन बसलो मी आता मजा येईल प्रवासाची म्हणून स्वतःशीच हसलो मी कधी वाटलं गाडीला थांबवावं कधी सुसाट पळवावं तिला पण आयुष्य नामक चालकाने माझा पूर्ण भ्रमनिरास केला मी नेईन तसंच जायचं तू म्हणालं मला माझं आयुष्य कसला हट्ट करायचा नाही विचारायचं नाही कधी भविष्य घडवीन तुला सफर मी आता एका वेगळ्याच जादुई दुनियेची कुठे फार थांबायचं नाही आपण आणि घाईही नाही करायची आलास जसा जन्माला सगळे रंग तू बघून घे लक्षात नाही यायचा खेळ हा हे पहिल्यांदा समजून घे तुझ्यासारखेच इतर अनेक भेटतील तुला पावलोपावली तू मात्र असशील एकटाच बरोबर फक्त तुझीच सावली वाटेल तुला तूच करतोस सगळं पण तो

वारी हो वारी

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 23/06/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
होता आषाढी कृष्णमेघांची दाटी मन केवळ विठूसाठी आक्रंदे । चालती पाऊले दिशा पंढरीची वारकरी आम्ही नाहू आनंदे । घोष एक गजर एक एक नाम जीव पिसावला या मधुर नादे । ना जुमानू आता ऊन पावसासी मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे । पडता दिठीस चरण ते सावळे जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे । वारीस न जाताही मनाने वारीमय हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।

साक्षात्कार

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 12/06/2017 21:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या चित्रातले पक्षी चौकट तोडून मोकळ्या आकाशात आले तेव्हा दिसलं इंद्रधनुष्य कवेत घेण्यासाठी रिमझिमतं आभाळ तर कधीचं ओथंबून वाकलंय वीट वीट पारखून बांधलेल्या माझ्या कुंपणापलीकडे मी पाहिलं तेव्हा दिसलं मी सहज फेकलेल्या विटेवर माझं श्रेय-प्रेय तर कधीचं उभं ठाकलंय अंधार पीत पीत मी इथवर आलो उजेडाच्या प्रतीक्षेत तेव्हा दिसलं माझ्या रोमरोमात तर पहाटेचं तेज कधीचं फाकलंय
काव्यरस

येथे पाहिजे जातीचे .....

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी सोमवार, 12/06/2017 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता गुरू त्याचा एक महागुरू भेटल्यावर म्हणाले, " आपण अभ्यास करू आणि चराचरात शिरू " मी म्हंटले , " ओके " त्यांनी मला वह्या दिल्या मी त्यांच्या नावाने त्या भरवल्या त्यांना अर्पण केल्यावर हसून ते म्हणाले, " " भल्या गृहस्था, हा कसला अभ्यास ? " आम्ही आधुनिक गुरू वेगवेगळ्या धंद्यात शिरू, यात तर धंद्याचा लवलेषही नाही अर्थाचा नुसता अनर्थ आहे काल हरणासाठी अर्थ हवा जो इतरांकडून घ्यावा आणि गोणींमध्ये भरावा कालसर्प, राहू शांत , नारायण नागबली मनः शांती, ही तर आमची हत्यारे तुला जमत नसेल तर कितीतरी आहेत अनुसरणारे मुकाट बाजूला हो, सामान्य पुचकट माणसाचे काम नाही येथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काम नव्हे.
काव्यरस

पहिले प्रेम आणि पहिला पाऊस सारखाच!

लेखक bhavana kale यांनी सोमवार, 12/06/2017 15:08 या दिवशी प्रकाशित केले.
आताच हिंजवडीत मस्त पाऊस पडला आणि मग हे सुचलं.... आभाळ आला कि मन हळवं होतं.... असंख्य आठवणी बरसू लागतात.. मग माझी मीच ह्या पावसासोबत वाहत जाते... सरींसारखे विचार मनात सरसर कोसळतात भूतकाळाच्या पानात मग मी रमत जाते.. पावसात भिजली नाही तरी मनात खूप पाऊस पडतो.. कितीही नाही म्हटलं तरी वेळेचा काटा पळत असतो.. पाऊस संपत संपत माझा आनंदही घेऊन जातो.. का हा पाऊस असा ह्रदयाला चिरून चेहऱ्यावर एक गोड हास्य देऊन जातो...
काव्यरस

मीच का ?

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी रविवार, 11/06/2017 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
मीच का ओझे वाहावे ? संस्कृतीचे सभ्यतेचे पांढऱ्या कॉलरीत माझ्या मीच का गोड बोलावे ? मीच का पूजा करावी ? मीच का वारी करावी ? मीच का त्यांच्या चुकांना पदरात घ्यावे पुन्हा पुन्हा मीच का साफ करावा माझाच चष्मा हरघडी त्यांनी चालावे रुबाबात काळा चष्मा वापरोनी मीच चोरटेपणाने का पाहावे स्त्रीकडे ते भोगुनीयाही तिला लेऊनी घेती हारतुरे मीच बांधलेला समाजी मीच बाधलेला भिडेने मीच छाती आत घेउनी का चालावे घाबरोनी ? अशाच या कोंदट जगातील सहावा लागे कोंडमारा प्रकाशाला अन सूर्याला जो ढगाआडून पाही.
काव्यरस

ढग . . !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 10/06/2017 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळातले ढग कधीतरी त्याला खूप त्रास देतात कारण नसताना उगीच तिचाच आकार घेतात . . . . मग तोही नादावतो वेडा बघत बसतो तासन् तास ढगाचं नुसतं निमित्त एक त्याला फक्त तिची आस.... कधी कधी एकाच क्षणात तो ढग जातो अचानक विरुन अन् अचानक जाणवतं रितेपण भकास वास्तव टाकतं घेरुन ढगासारखंच स्वप्न विरलं आणि संपला सगळा खेळ तो मात्र अजून जपतो उराशी आठवणींच्या जगातली वेळ !
काव्यरस

तूरडाळ टंचाई

लेखक अरूण गंगाधर कोर्डे यांनी बुधवार, 07/06/2017 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
तुरडाळ शेतात पिकली अन बाजारात येऊन भडकली कोण लागणार तिच्या नादी तशी ही स्वस्त नव्हती कधी गिऱ्हाईक नुसतेच लांबून जाई भाव विचारण्याची सोय नाही फोडणीशिवायच तडतडू लागली व्यापाऱ्यांची फाटू लागली तरीही मख्ख व्यापाऱ्यांनी साठेबाजी चालूच ठेवली सरकारने डाळीला मुक्ती दिली पण फक्त गोदामे बदलली अधिकाऱ्यांची चंगळ झाली सामान्यांची कोंडी वाढली मोर्चे, आंदोलने करुनही सरकार घट्ट बसून राही वरण भातालाही जनता महागली समोर दिसेल ते मुकाट खाऊ लागली आता भाव पाहत नाहीत जमले तरीही घेत नाहीत इतर डाळींची खिचडी करून सामान्यांनी भूक भागवून घेतली
काव्यरस

ऊन

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 01/06/2017 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसाचा ताप संपला कि ऊन उदास होऊन कोपऱ्यात एकटे बसते. आपण कुणासाठी सावली झालो नाही म्हणून हुरहुरते, हळहळते. अंधारात गडप होऊन पाण्यापलीकडचे मृगजळ शोधू लागते. -शिवकन्या
काव्यरस