Skip to main content

कविता माझी

ट्रिंग ट्रिंग !!!!!

लेखक बटाटा चिवडा यांनी शुक्रवार, 24/02/2017 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिंग ट्रिंग असा वाजतो जेव्हा Tone.. तेव्हा सर्वाना आठवतो तो "Telephone" १९९० च्या दशकात केलेला तो पहिला कॉल आजही आठवतो चाळमालकांच्या घरातला हॉल... हॉल मध्ये फोनचा "डब्बा" असायचा ठेवलेला येता-जाता निरखत असायचो आम्ही त्याला.. चाळीतले ते जोशी , नाडकर्णी , आणि पाटील सर्वांचे कॉल त्या डब्बा फोन वर यायचे.. अन कोणाचा फोन आला आहे हे सांगायला लहान मुलांनी घरोघरी पळायचे... काही वर्षांनी, आमच्याही घरी आला तो Landline चा डब्बा इतका आनद झाला जणू घरी आले गणपती बाप्पा... त्या फोनचीही निराळीच होती तऱ्हां ८ - ८ दिवस ‘Dead’ होऊन वाजायचे त्याचे बारा...

ती वाचत असता कविता

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 24/02/2017 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
ती वाचत असता कविता डोळ्यात तरळले पाणी गवसले हरवले शब्द आठवली विस्मृत गाणी ती वाचत असता कविता भळभळल्या बुजल्या जखमा दु:खाच्या शाश्वत प्रहरी उन्मळल्या अविचल सीमा ती वाचत असता कविता मी पुन्हा हलाहल प्यालो अवलाद नवी सर्पांची मी गळा माळुनी नटलो ती वाचत असता कविता शेवटची बेडी तुटली करुणेची धून अनाहत झंकारत आतून आली
काव्यरस

प्रश्नत्रयी

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 16/02/2017 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्ण-विवराच्या गर्भीच्या कल्लोळा वेध का लागती दिक्काल-मुक्तीचे ? स्थूलास व्यापून सूक्ष्मात सांडता कैवल्य ओलांडी उंबरे कशाचे ? तुझ्या नि माझ्या निर्लेप नात्याला पाश हे कशाला जीवन मृत्यूचे ?
काव्यरस

प्रेम

लेखक पराग देशमुख यांनी मंगळवार, 14/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे साला , अंधार झालाय अंधार . अब्रू वेशींवर टांगलेली नि, भावनांचा चाललेला व्यापार . नजर वखवखणारी असूनही येथे, कोवळ्या कळ्यांना धुमारे फुटू लागतात. अन प्रेमाचा पाऊस पडला तरी कुजण्याइतकी, नात्यांची बीजे भिकार असतात. पैशाच चामडं पांघरून इथ , वा
काव्यरस

माझी एक गोची होते

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 13/02/2017 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
वृत्तबद्ध लिहिताना माझी एक गोची होते यमक जुळवू जावे तर अलगद काही निसटून जाते माझी कविता "जुळत" नाही टोटलच बघा लागत नाही (अन जुळलीच बेटी चुकून तर..) कमावलेली कृत्रिमता हट्टीपणे हटत नाही कवितेचे झटपट वर्ग कुठे कोणी घेतं का? असल्यास जरा सांगा मला प्रतिभा विकत मिळते का? (एक कोडं सुटत नाही ...) भावना इतक्या तरल कशा? शब्द इतके रुक्ष कसे ? मग त्याची कविता वाचता वाचता डोळ्यात पाणी येतेच कसे?
काव्यरस

तूच तू...

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 13/02/2017 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
तोच चांद नभी अन् रात आज तीच ती सागराच्या लाटेवरची गाज देखील तीच ती तोच वारा... तीच नशा तेच धूसर क्षितिजही..... त्याच त्या नभामधुनी चांद किरणे तीच ती.... मात्र आज नको मज हे आठव तुझी दाटते..... साय-ओल्या वाळूमधली पाऊल खुण बोलावते.... तू असशी जर इथे तर.... सर्वकाही हवेसे! तूच नाही जर इथे तर.... जीणे अर्थहीन... नकोसे!!!
काव्यरस

त्या आतल्या द्युतीला

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 09/02/2017 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्या आतल्या द्युतीला उमजू कसे? न कळते -जी सर्वव्यापी ऐसे स्थलकाल भरुनी उरते चक्षूस ना दिसे ती पाळी न नियम कोते क्षणमात्र लुप्त होते क्षणि झगमगून उठते ही तीच का मिती, जी- -स्पर्शात रंग भरते -ध्वनितून नव-रसांना -उधळीत गंध होते
काव्यरस

तुझ्या अंतरीची (चारोळी)

लेखक पराग देशमुख यांनी सोमवार, 06/02/2017 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या अंतरीची, मला जाण आहे; जरी गीत माझे, तुला ताण आहे. जरी ना निथळली, कधी कांत माझी; तुझे पावसाळे, मला रोष आहे. ..............................................मुकुंद

शब्दच केवळ

लेखक अनन्त्_यात्री यांनी सोमवार, 06/02/2017 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
जोवर ना ती तेज दुधारी कट्यार दु:ख्खाची मज चिरते तोवर माझे शोकगीतही शब्दच केवळ, काव्य नव्हे ते जोवर ना ती रिमझिमणारी श्रावण सर मज चिंब भिजविते तोवर माझे पाऊसगाणे शब्दच केवळ, काव्य नव्हे ते जोवर ना मज दुमदुमणारी हाक अनाहत ऐकू येते तोवर रचिले सूक्त जरी मी शब्दच केवळ, काव्य नव्हे ते प्रतिभेचे लखलखते लेणे जोवर या झोळीत न येते तोवर स्फुरला मंत्र जरी मज शब्दच केवळ, काव्य नव्हे ते
काव्यरस

देवा तुला नक्की काय करायचं होतं ?

लेखक अभिषेक पांचाळ यांनी गुरुवार, 02/02/2017 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
भल्यामोठया तंट्यातून , तू जन्म मला दिला अगदी थोड्या क्षणात , तू पोरका याला केला आधार देतो म्हणून , तू थोडा पुढे आला पुढे येऊन माझा , आधारच घेऊन गेला तेव्हाच माझ्या मनी , एक कोडं उभं होतं देवा तुला नक्की काय करायचं होतं ? सुख म्हणून दिलस , ते झोळीत नाही पडलं किती सांगू तुला , नेमकं काय काय घडलं साठवण्या ते सुख , तू झोळी मला दिली माझंच नशीब खोटं , ती ही फाटकी निघाली सुख म्हणून नक्की , तुला काय द्यायचं होतं ? देवा तुला नक्की काय करायचं होतं ? वाटलं होतं चालतोय ती वाट आहे न्यारी अजून सुद्धा चालताना , ती काटेच फेकून मारी होईल पुढे काही , अशी आशाच गायब झालीय त्याच वाटेने माझी , हालत अशी केलीय
काव्यरस