वारी हो वारी
काव्यरस
होता आषाढी कृष्णमेघांची दाटी
मन केवळ विठूसाठी आक्रंदे ।
चालती पाऊले दिशा पंढरीची
वारकरी आम्ही नाहू आनंदे ।
घोष एक गजर एक एक नाम
जीव पिसावला या मधुर नादे ।
ना जुमानू आता ऊन पावसासी
मार्ग क्रमु पांडुरंगाच्या आशिर्वादे ।
पडता दिठीस चरण ते सावळे
जैसे भ्रमर प्राशी तो मकरंदे ।
वारीस न जाताही मनाने वारीमय
हळवा अवघा महाराष्ट्र विठ्ठल छंदे ।
वाचन
2813
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
सुंदर.
जयजय रामकृष्ण हरि