Skip to main content

करुण

देऊनी स्वप्ने विझल्या गात्री

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 09/08/2010 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
जरी काळरात्र होती ती तुझ्या कुशीत होती ती येई ना वेळ पुन्हा हाती ती थकल्या गात्री ....उत्तर रात्री श्वास अधीरे... गहिवरे धरित्री. ये सकाळ अवघा प्रकाश पसरे कारुण्य पुसे...
काव्यरस

(चटेपटेरी चड्डीचा हा दोष असावा)

लेखक राजेश घासकडवी यांनी शनिवार, 07/08/2010 02:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मिपावरच्या पौगंडी विचारसरणीच्या लेखनाची परखड टीका केशवसुमार यांनी एक समर्थ विडंबन लिहून केली. ती वाचून शब्दांच्या गुणसूत्रांचाच दोष वगैरे कारणं देण्यापेक्षा तसल्या लेखकांनी आत्मपरिक्षण करावं असं आम्हाला वाटलं. (ते लोकांनी करण्याआधी आपणच केलेलं बरं, नाही का? कारण काही काही वेळा सिगार हा फक्त सिगार असतो) त्यातून या स्वडंबक कवितेचा जन्म झाला. प्रेरणा अर्थातच अभ्यंकरांची उत्तम कविता.
काव्यरस

वाटते बोलायचे राहून गेले

लेखक डॉ.कैलास यांनी शुक्रवार, 06/08/2010 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते बोलायचे राहून गेले तेच रडगाणे पुन्हा गाऊन गेले भेटले जे,ते मला फसवून गेले हे फुकट आहे कळाले त्यांस जेव्हा, पोट भरलेले,तरी खावून गेले मतलबी झालो इथे मी, काल जेव्हा आप्त माझे पाठ मज दावून गेले माफ केले पाप ते सारे तुझे मी आसवांसमवेत जे वाहून गेले पक्ष कसले?काय्?हे कळते न ज्यांना, आपला झेंडा इथे लावून गेले जाहले '' कैलास '' सारे सांगुनी पण, वाटते,'' बोलायचे राहून गेले '' डॉ.कैलास गायकवाड
काव्यरस

माझे मन सुखाच्या मागे धावत असता..

लेखक संजयशिवाजीरावगडगे यांनी गुरुवार, 05/08/2010 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मन सुखाच्या मागे धावत असता , त्याला सगळे काही मिळाले, पण......? मी मागे वळुन आयुष्याच्या वाटे वर पाहिले असता आज ... पण .......? माझे मन सुखाच्या मागे धावून , आयुष्‍यालाच विटले, आणि तेव्‍हां कुठे त्‍याला, मृगजळच भेटले.........!!! मनापासून जे हवं होतं, ते नाही मिळालं.. अजुन सुद्धा !!
काव्यरस

एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

लेखक झुम्बर यांनी गुरुवार, 05/08/2010 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी तु आला अचानक बदलवून गेलास जन्मांतरी का तु दाखवले मला काट्यातही फुलती फुले वेदनाही माझी का अशी जी तुझ्यापाशीच खुले ग्रीष्मवेदना वेचताना का दाविल्या श्रावण सरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी आसवे ही सुख आणती अन सुखानेही येते रडे तुझ्या स्पर्शी कवितेलाही प्राजक्ती स्वप्न पडे अश्रुनाही का तु दिले कोंदण सुखाचे भरजरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी झोपलेल्या स्वप्नंफुलांना जाग आणली नवी वठून गेल्या फांदिलाही हुंकारली कोवळी पालवी का राखेतुनी घडवली पुन्हा मूर्त ही कारीगरी एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु भंगल्या
काव्यरस

कंट्रोल झेड

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 03/08/2010 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीतल्या नवरा बायकोंचं एकमेकाशी पटेनासं झालं काउन्सिलिंगला कपल शेवटी आमच्यापाशीच आलं (मी विचारलं, हं सांग रे लग्न कसं ठरलं? तो म्हणाला..) माझं सर्फींग चाललं होतं, ही विंडोत उभी दिसली सहज पिंग केलं तशी सांगतो काय गोड हसली आयडिया केली, आयडी शोधला, चॅटींगला इन्व्हाईट केलं डेटाफाईल डाउनलोड केली, सांगा काय वाईट केलं? फेसबुक, ऑर्कुट, हायफाय भेटी, मेसेज, मेल रोजच्या रोज कॉन्फिग्रेशन जुळतंय वाटलं, मॅरेजसाठी केलं प्रपोज (नंतर आमचं लग्न झालं...
काव्यरस

प्रश्न

लेखक सौरभ परांजपे यांनी सोमवार, 02/08/2010 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
जीवंतपणी जीवाला का जाळतात प्रश्न? तिरडीवर ही मेले छळतात प्रश्न दिवसभर उत्तरे शोधून थकलो मी थडग्यात देखील साले डसतात प्रश्न चितेवर सुटकेचा निश्वास घेतला मी प्रेत जळले तरी राहतात प्रश्न माझ्या चितेची सोय मीच केली घट्ट नात्याची वीण उसवतात प्रश्न पतनाचा माझ्या ’आगाज’ मीच केला बरेचवेळा माणसाला घडवतात प्रश्न मी न केला कधी कोणास प्रश्न उगाच केविलवाणे करतात प्रश्न निरंतन संघर्षाचा ’यल्गार’ मीच केला जन्मभर पुरुन परत उरतात प्रश्न आर्थिक, कौंटुंबिक, राजकिय, सामाजिक प्रश्न सामान्य माणसाला फक्त नाडतात प्रश्न एक-एक करुन सोडवायला सारे घेतले भूमितिय पद्धतिने अचानक वाढतात प्रश्न
काव्यरस

ताप

लेखक मितभाषी यांनी रविवार, 01/08/2010 16:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला वाजते का थंडी. आणि कळपाची भीती. का भरलाय तुम्हाला ताप. तोंड दाबुन बुक्क्याचा मार. शब्दांना नसते दु:ख. फक्त ओझे वाहणारे आपण. सवत आनली म्हणे. ग्यानबाची बायको हरवली. आता जास्त विचारत नाही. कारण तुमच्याकडे उत्तर नाही. राम रावण युध्द होणार अनिरुध्द मिशा पिळणार मी झाडावर लपणार ।। निश्चित ।। ही कविता संपादकांना अडचणीत तर नाही ना आणनार?????????? . . . कविवर्य भावसार.

(माझी जन्माची शिदोरी )

लेखक अडगळ यांनी शुक्रवार, 30/07/2010 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांती ताई, माफी असावी मूळ कविता : http://www.misalpav.com/node/13405 तुझा भात गं जळका भाकरी ही ढाल जशी , तुला पाहताच मेली , अन्नपूर्णा पटदिशी. बासुंदीत ही दोडके, हे का नव्हते थोडके, आमरसात बटाटे, आली शिर्‍यात हाडके. शिव्या तरी किती घालू , गेली विटाळून वाणी, तुझ्या बापानं का कधी, दिली चहाला फोडणी ? यावे यमा रेड्यावरी, आतड्याचे तुम्ही वाली जळो , मरो ही शिदोरी, नरकाची मेस बरी
काव्यरस

अघटीत

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 28/07/2010 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य गारठला, चंद्र विझला जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला... तारे हरपले, अवकाश संपले, जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले...
काव्यरस