(काऽऽय रेऽऽ देवाऽऽ)
(कवि संदीप खरे यांची क्षमा मागून...)
आता पुन्हा उपोषण होणार
मग देश ढवळून निघणार
मग बेदींना कंठ फुटणार
मग मध्येच मोदी बोलणार
मग जुनाच खेळ चालू होणार...
काऽऽय रेऽऽ देवाऽऽ...
मग जुन्या खेळात जुने खेळाडू पुन्हा एन्ट्री घेणार...
मग सारीपाट मांडणार...
मग मांडलेला सारीपाट काहींना पसंत नसणार...
मग ते कुणीतरी ओरडणार
मग अण्णा-मित्र असतील तर रडणार
रामदेव बाबा असतील तर चिडणार
मग नसतोच खेळलो तर बरं असं वाटणार
आणि या सगळ्याशी आता प्रणवदांना
काहीच घेण-देणं नसणार...
काय रेऽऽ देऽऽवा
मग त्याचवेळी लोकपाल विधेयकावर चर्चा चालू असणार...
मग त्यात बेदी, केजरीवाल नि काँग्रेसचं कुणी असणार...
मग त्याला अण्णांनी आप
काव्यरस
मिसळपाव