Skip to main content

कुणी घरटं देतं का घरटं !

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 18/01/2018 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
(लेखातील माहिती जालावरून संकलित केलेली आहे.) आपले लहानपण 'एक घास चिऊचा , एक घास काऊचा' असे ऐकण्यात गेले. 'चिऊताई चिऊताई दार उघड असे विनवणारा कावळा आणि त्याला न जुमानणारी चिमणीही असायची. माणसाला हा नखरेलपणा बहुधा आवडला नसावा. अक्षरक्षः रस्त्यावर आणले हो त्याने दोघांना. कावळ्यालाही पिंडापुरते ठेवून त्याचाच पराचा कावळ केला. आज ते दोघे 'कुणी घरटं देतं का घरट' असा चिवचिवाट करत असतील असं उगीचच वाटत राहत. पण मला खात्री आहे की पक्ष्यांची ही भाषा माणसाला कधी कळणारच नाही.

(तरही) या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला!

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 18/01/2018 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
(मौसम तरही का छाया है, तो गुस्ताखी माफ! पण तरहीच्या ओळीसाठी विशाल व क्रांतीताईंचे आभार,तसेच अगंतूकपणे तरही लिहिल्याबद्दल क्षमस्व!) सूर्य मावळता कधीही व्हायचे नव्हते मला या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला! पावले वळली कितीदा त्याच त्या वळणावरी ज्या जुन्या शहरात पुन्न्हा जायचे नव्हते मला! आजही डोळ्यांत माझ्या धुंद ही आली कशी? मी पुन्हा प्यालो..खरेतर, प्यायचे नव्हते मला! वेळ नाही,काळ नाही,ना ऋतूंना लाजही थेंब-थेंबाला विचारा,न्हायचे नव्हते मला! भावनांना भाव नव्हता मैफलींमध्ध्ये तुझ्या गात आलो गीत मी,जे गायचे नव्हते मला! —सत्यजित

या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला.. वेगळे सुचलेले--

लेखक राघव यांनी बुधवार, 17/01/2018 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
विशालची ही रचना बघून वेगळ्याप्रकारे काही मांडणे झाले [विडंबन नाही].. गझल आहे की नाही हे मात्र माहित नाही. सूर येथे होत बेसूर.. ऐकायचे नव्हते मला.. या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला.. श्वापदांनी फाडलेले पदर ज्यांना झाकती.. देहभूमीच्या चिरांना मोजायचे नव्हते मला.. ओथंबले आभाळ माझे.. मग सर्वकाही चांगले! तीरापल्याडच्या भुकेला उमजायचे नव्हते मला.. पुन्हा वळती त्या दिशेला..पावले माझी..
काव्यरस

शेजाऱ्याचा डामाडुमा- बेबे-कोक्को, ऑपरेशन कॅक्टस आणि भारत-मालदीव - भाग ६

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 17/01/2018 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
मालदीव मालिकेतील या आधीचे ५ भाग अनुक्रमणिका वापरून वाचता येतील. पाचवा भाग इथे आहे :- http://www.misalpav.com/node/41759  आजचे माले शहर * * * वर्ष १९८८ आणि स्थळ श्रीलंकेचा उत्तर किनारा. उमामहेश्वरन उर्फ मुकुंदनला आता स्वतंत्र तामिळ इलमसाठी 'संघर्ष' सुरु करून दहा वर्षे होत आली होती.

एक प्रश्न : मदत करा

लेखक साहना यांनी बुधवार, 17/01/2018 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
समजा दोन सरकारी स्कीम्स आहेत. ह्यांतील कुठली स्कीम जास्त चांगली आहे असे तुम्हाला वाटते ? १. फक्त अल्पसंख्यांक लोकांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती २. फक्त अल्पसंख्यांक लोंकासाठी पण फक्त मुलींसाठी शिष्यवृत्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख पेक्षा कमी आहे ! सोर्स : https://twitter.com/realitycheckind/status/953285874136969217 आणखीन : https://twitter.com/TormundsMember0/status/953390737281908736

(भिती तुझ्याउरी पण)

लेखक नाखु यांनी बुधवार, 17/01/2018 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
भिती तुझ्याउरी पण,उमजे तुलाच नाही. या अवसानाचा,का भार व्यर्थ घ्यावा? धाग्यात मांडताना,कुंठते निवांत मती. या मूढ तारस्वरांचा , सांग काय बोध घ्यावा? फेके जिव्हारी तूही , दुसराही परजे भाला . मधल्या वाचकांचा, असा काय अपराध देवा? सोडून नेक वाट,चळते बुद्धी​ जराशी. मग अशांत त्या मिपाशी,कोठून नूर यावा? जमले मिपावरी हे, गोंगाट भाट सारे. नाहिरे कसे म्हणू मी? का नुसताचं स्वार्थ पहावा! आता मौनवदनी, सोडून देतं आहे. विझली फुण्गी जरी ही,नित-मात्र दक्ष पहारा! मोडून काय लाभे? तारेत क्षणभराचे. हे मोजकेच आहे, लागला (तरच ) अर्थ घ्यावा. थांबवू कसातरी मग मी?

तरही गज़ल : या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/01/2018 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या एका व्हाट्सएप ग्रूपवर क्रांतिताईने (क्रांति साडेकर) दिलेल्या एका ओळीवर (तरही) लिहीलेली ही गज़ल ! ताईने दिलेली ओळ होती... या दिशेला एकदाही यायचे नव्हते मला ********************* नाव कुठल्या ईश्वराचे घ्यायचे नव्हते मला चाल तू रस्ता तुझा नियती पुन्हा म्हणते मला तू नको सांगू गड्या वागायचे आता कसे बुद्ध नसलो मी तरीही एवढे कळते मला रोज मरणाची नव्याने कारणे मी शोधतो चक्र जन्माचे निरंतर पाशवी छळते मला थांबता चौकात गाडी पोर कोणाचे रडे भूक त्या डोळ्यातली पाहून धडधडते मला बा निसर्गा का असा छळवाद तू रे मांडला? बरसणे त्या पावसाचे फक्त आठवते मला ओळखीचा चोर कोणी मान अलगद कापतो त्याच खांद्य
काव्यरस

प्रश्न साधासाच होता...

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 16/01/2018 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्न साधासाच होता, त्याने उत्तर टाळले.. आणि अबोलीचे फूल तिच्या केसात माळले. त्याचा रोजचाच खेळ, चार दाणे पक्ष्यांसाठी.. पाखरांच्या नकळत, त्याने हक्काने पाळले. क्षणभर विसावला जीव बकुळीच्या खाली.. सडे अनाम दु:खाचे तिने पायाशी ढाळले. आहे सुखाचा पाऊस, डोळे भरले कशाने? वेडे मन तुझे का ग मृगजळास भाळले?
काव्यरस

लास-वेगस.... माहिती हवी आहे.

लेखक किल्लेदार यांनी सोमवार, 15/01/2018 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारी ला लास-वेगस ला जायचा प्लॅन आहे. हॉटेल आणि फ्लाईट बुकिंग झाले आहे. ग्रँड कॅनियॉन ला भेट द्यायचा विचार आहे. काही टिप्स ?