नार्सिसस....
"जिनियस माणसं कधी-कधी माथे फिरल्यासारखी वागतात त्याचं कारण काय असेल?"
प्रा. बिरुटे, अवलियाला विचारत होते. प्रो. देसाई सुटीवर असल्यामुळे प्रा.बिरुटे अवलियांना घेऊन तळ्याकाठी बसले. एकेक भाजलेला शेंगदाणा टाइमपास म्हणून खातांना असा अचानक प्रश्न विचारल्याने अवलिया नेहमीप्रमाणे भांबावल्या सारखा झाला.
"अवलियासेठ तुला सांगतो. मराठी माणसं एकत्र आली म्हणजे फ्लॅट घेतला का ? पोरीच्या लग्नाचं जमलं का ? कार्यालयातले बॉस काय म्हणताहेत ? काय म्हणतं राजकारण ? असे काही सामान्य प्रश्न विचारतात. "
"हो तर ! जगरहाटीत अनेक प्रश्न सामान्य माणसाच्या मागे हात धुवून लागलेले असतात.
मिसळपाव