Skip to main content

मिसळपाव...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 22/04/2010 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपण सर्व मिपाकर हे जाणतो की मिसळपाव हे संकेतस्थळ श्री तात्या अभ्यंकर यांनी स्थापन केले आहे. ते या संकेतस्थळाचे मालक सुध्दा आहेत. गेल्या काही महिण्यांपासून मिपाच्या व्यवस्थापनाकडे तात्यांना लक्ष द्यायला वेळ मिळत नसल्याने मी व संपादक मंडळानेच मिपा सुरू ठेवलंय. आता सुध्दा येत्या काही काळ तात्यांना मिपाकडे लक्ष देणे होणार असे दिसत नाही. त्यामुळे तात्यांनी आधी अघोषीत असलेली व्यवस्था घोषीत केलीये की मिपाच्या व्यवस्थापनाचे सर्व अधिकार नीलकांत कडे असतील. यात मालकी हक्काबाबत कुठलाही उल्लेख आलेला नाहीये. त्यामुळे त्याबाबत वर केलेल्या विधानाशिवाय काहीही उल्लेख करने गैरलागू आहे.

कुसुमाग्रजांची कविता, पुनर्भेट

लेखक शेखर जोग यांनी गुरुवार, 22/04/2010 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
'कुसुमाग्रज" एक अद्वितीय, तीव्र संवेदनशील व्यक्तीमत्व. कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांची महाराष्ट्राला अस्मितेला नव्याने ओळख करून देण्याचा तसेच त्यांच्या कवितांचा अर्थ शक्य झाल्यास थोड्या वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा एक खटाटोप. माझे भाग्य इतके चांगले की त्याना अगदी जवळून बघण्याचा सुदैवाने योग आला. अर्थात मी खूप लहान होतो त्यावेळी. त्यांच्या काही स्मृती, आठवणी मला माझ्या आईने (ते माझ्या आईचे मामेभाऊ लागत)सांगितल्या होत्या. त्याही तुमच्या समोर मांडण्याचा विचार आहेच.

तापत जाणारं ऊन!

लेखक राघव यांनी गुरुवार, 22/04/2010 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच नागपूरला जाऊन आलो.आता मूळ गाव म्हटल्यावर एक ओढ असतेच मनाला.. त्यामुळे खरं तर कितीही वेळा तिथे गेलो कि अगदी नवीन वाटतं. एकदम फ्रेश! पण आत्ताचा उन्हाळा म्हणजे तिथे खरंच बाहेर पडू देत नाहीये. ४५ अंशांवर पारा सहज चढतोय. पोचलो तेव्हा सकाळचे ८ वाजले होतेत. पण अगदी ११ वाजलेत का काय असं ऊन तापलेलं. विचार करण्याजोगी गोष्ट आहे - सध्या संपूर्ण विदर्भच तापतोय. अकोला, खामगांव सुद्धा असंच भट्टीत जमा झालंय. अकोल्यात तर म्हणे दिवसाला ८ तास लोडशेडींग अन आठवड्याला १ तास पाणी येतंय अशी परिस्थिती आहे. टॆंकर बोलवायला पैसे आहेत लोकांकडे पण त्या टॆंकरमधे पाणी घालायला पुरेसा साठा नाही.

रसग्रहण - सुपरहिट गाणी !

लेखक टारझन यांनी गुरुवार, 22/04/2010 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स मंडली , सहजरावांबरोबर चर्चा करता करता सुचलेला एक विषय ... आपली बॉलीवुड परंपरा अतिशय महान आहे. मनोरंजणाचा अनलिमिटेड खजाणा आहे. दलाल : मिथुन च्या एका अप्रतिम हिट चित्रपटातलं हे गाणं म्हणजे क्या केहने ? सुनते ही बात बनती है .. "चढ गया उपर रे ... अटरीया पे लोटन कबुतर रे ... गुटूर गटूर ..." व्वा !! ज्या कोणी लिहीलंय त्याने कसं एखाद्या बैठकीला लिहीलंय ... "चढ गया उपर रे ... " मधे जो यमनाचा सुर लागतो त्यावर मिथुन ने तितक्याच ताकदवर नृत्याभिनयाने शब्दाशब्दाला दाद दिली आहे. आणि त्यानंतर "अटरीया पे लोटन का कसला तरी कबुतर म्हणजे खल्लासंच !

भाषांतरासाठी मदत हवी आहे........

लेखक मितभाषी यांनी गुरुवार, 22/04/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मला खालील क्वालिटी पॉलिसीचे मराठीत भाषांतर हवे आहे. कृपया मदत कराल का? xxxxx Quality, Environment and Safety Policy xxxxxx is the union of community, shareholders.

आजची स्त्रीची प्रतिमा - १

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 22/04/2010 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यातला दुसरा रविवार मातृदिन. स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते असं आपण म्हणतो. भारतीय संस्कृतीत स्त्री ही देवीसमान आहे असंही म्हणण्याची पद्धत आहे. पण प्रत्यक्षात दिसायला काय दिसतं? जाहिरातींतून, सिनेमांतल्या आयटम गाण्यांतून, टीव्हीवरच्या सीरियल्समधून, आंतर्जालावर ठिकठिकाणी स्त्रीचं क्षणभंगूर रूप केवळ आपल्या डोळ्यांसमोर येतं. शिवाजीला संस्कार देणारी जिजाबाई अधूनमधून जयजयकार करण्यासाठी इतिहासाच्या पुस्तकात दडून राहाते. पण जिथे पाहावं तिथे मुखपृष्ठावर, बिलबोर्डांवर तारुण्याने मुसमुसलेल्या व अंगप्रदर्शन करणाऱ्या मोहिनी दिसत राहातात.

मदत हवि आहे

लेखक प्रशान्त पुरकर यांनी गुरुवार, 22/04/2010 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करानो तुमची मदत हवि आहे. माझ्याकडे SEAGATE 320 GB, External Hard disk आहे जिच्यात मी दोन स्वतन्त्र विभाग (drives) केले आहेत. त्यातिल एक विभाग जर मला password protect करयचा असेन तर कसा करता येइन, कुणि सान्गु शकेल का ?

आठवण

लेखक स्वप्निल मन यांनी गुरुवार, 22/04/2010 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
एकही क्षण नाही जेव्हा तिची आठवण येत नसेल, असा एकतरी क्षण असेल जेव्हा ती मला आठवत असेल

(भक्ता! तू सुद्धा ???)

लेखक राजेश घासकडवी यांनी गुरुवार, 22/04/2010 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा ही कविता. खाली दिलेल्यांसारख्या घटना प्रत्यक्षात घडलेल्या असतानाही आपण असे लोक मुळात स्वामी कसे झाले याचा विचार करत नाही, व नंतर आपणच पुजलेले त्यांचे पाय शेणाचे आहेत हे कळलं की आश्चर्याने चकचकीत होतो. माणसाला देवत्व द्यायचं आणि त्याने माणसासारखं वागलं की अचंबा व्यक्त करायचा... हे नाटक का खेळलं जातं, हे मला नेहेमी पडलेलं कोडं आहे. टी व्ही वर ब्रेकिंग न्यूज, खबर नाही आली, भक्ताला बिलकुल अटक नाही झाली. मूर्खपणा म्हणजे काही, गुन्हा नाही केला. पोलिसांनी गजाआड त्याला नाही केला!
काव्यरस