Skip to main content

हिरा हरपला - भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे देहावसान!

लेखक अनिता यांनी सोमवार, 24/01/2011 09:34 या दिवशी प्रकाशित केले.
निशब्द ..... ** आपल्या सर्वांचे लाडके मा. पं. भीमसेन जोशी यांचे निधन झाल्याची बातमी आताच याहु वर वाचली. त्यांना दिलेल्या "भारतरत्न" ह्यापुरस्काराने त्या पुरस्काराचीच शोभा वाढली. त्यांच्या बहुढंगी गायनामुळे आणि भारदस्त आवाजामुळे ते चिरकाल आपल्या स्मरणात राहतील. अशा ज्येष्ट आणि श्रेष्ठ प्रभूतीला माझी मिसळपाव परिवारातर्फे श्रद्धांजली. - हंस http://www.misalpav.com/node/16435 ** आवाहन! मित्रहो, इथे संगिताचे शौकिन आणि जाणकार खूपच आहे.

थिअरी

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 24/01/2011 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
काल २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. काल मिसळपाववर त्यासंबंधी अनेक लेख येतील अशी अपेक्षा ठेवून होतो. परंतु कोणालाही, विशेषत: सशस्त्र लढे हेच स्वातंत्र्य मिळण्याचे कारण आहे असे मत असलेल्यांना, त्यांची आठवण झाली नाही.

[कोडे] स्त्रीमुक्ती आणि जीवशास्त्र

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 24/01/2011 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली. असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे वचन इथे खोटे ठरले. हे एक नवे कोडे मला पडले आहे. कुणी तज्ञ खुलासा करतील काय? संदर्भ -http://discovermagazine.com/2005/oct/sex

[कोडे] स्त्रीमुक्ती आणि जीवशास्त्र

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 24/01/2011 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषाची बुद्धिमत्ता एक्स या गुण सूत्रामूळे आईकडून येते असे नवे संशोधन सांगते. स्त्री मध्ये दोन एक्स असतात. म्हणजे स्त्री बुद्धिमत्तेची डबल वाहक झाली. असे असूनही, म्हणजे डबल बुद्धिमत्ता असूनही ती पुरुषप्रधान व्यवस्थेची बळी ठरली. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे वचन इथे खोटे ठरले. हे एक नवे कोडे मला पडले आहे. कुणी तज्ञ खुलासा करतील काय? संदर्भ -http://discovermagazine.com/2005/oct/sex

किल्ल्यांवरची हागणदारी...!

लेखक हेम यांनी रविवार, 23/01/2011 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
तिनेक दिवसांची जोडून सुट्टी आली की हौशा- नवशा- गवशा तथाकथित ट्रेकर्स लोकांची धिंगाणा घालायला काही हॉटट्ट डेस्टिनेशन्स ठरलेली आहेत. नाणेघाटाची गुहा, हरिश्चंद्रगड आणि रतनगड! ...त्याच्यात पावसाळ्याचे दिवस असतील तर ही सगळी झुंबड डॉट कॉम राजमाचीला लॉग इन असते! त्यांचा गोंगाट, प्लास्टीक कचरा आणि एकूणच वर्तणुकीचा पारंपारिक त्रास सगळ्यांना नेहमीच होतो आणि हे प्रमाण वाढतंच रहाणार आहे. आणखी एक त्रासाचा प्रकार गेल्या पावसाळ्याअखेरीस आम्ही रतनगडला अनुभवला तो म्हणजे या गडावर मुक्कामी असलेल्यांच्या प्रातर्विधीचा!

स्वप्न

लेखक नाहिद नालबंद यांनी रविवार, 23/01/2011 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
निळे, जांभळे, केशरी, तांबडे मेघ मेघात मिसळले होते हाती हात एकमेकांचे बोटात बोट गुंफले होते नयनांशी नयन दोघांचे काहीतरी बोलले होते घेता जवळी साजणाने लाजूनी शहारले होते चुंबिताना अधर माझे स्वप्नी पाहिले होते - नाहिद नालबंद
काव्यरस

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

लेखक गंगाधर मुटे यांनी रविवार, 23/01/2011 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला धोतर फ़ाटेपाव्‌तर सोटे खाऊन आला ...॥१॥ गाढवाम्होरं भगवद्‌गीता वाचून काय होते? माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला उसण उतरेपाव्‌तर लाथा खाऊन आला ...॥२॥ मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला ...॥३॥ पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला ...॥४॥ अरधकच्चं ग्यान लई,
काव्यरस

'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत

लेखक अप्पा जोगळेकर यांनी रविवार, 23/01/2011 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे. असे मराठी घर नसेल, असा मराठी उंबरा नसेल, असे मराठी मन नसेल की जे पानिपतच्या पराभवाच्या आठवणीने कातर होणार नाही. अर्थातच या महायुद्धाच्या इतिहासाला ही जी उंची लाभली आहे ती प्राप्त करुन देण्याच्या श्रेयाचे हक्कदार नि:संशयपणे श्री. पाटील हेच आहेत. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही हे विशेष.