Skip to main content

(सख्या चला बागामधी)

लेखक अडगळ यांनी बुधवार, 26/01/2011 02:37 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तव बदललं तरी आठवणी पुसल्या जात नाहीत. कांदा उतरला म्हणतात.
काव्यरस

गुजरात दारूबंदी '' निव्वळ खुळचट पणा

लेखक निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी यांनी बुधवार, 26/01/2011 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण देशात दारू विकली जाते अगदी देशी म्हणून परवाना मिळतो. .मग फार पूर्वी गुजरातच्या त्यावेळच्या राज्यकर्त्यांना का म्हणून तेथील राज्यात दारूबंदी जाहीर करावीशी वाटली (म्हणजे ती राजकीय संतांची जन्म भूमी व क्रम भूमी )अरे पण ते राष्ट्र पिता म्हणजे सर्व देशच त्यांची कर्म भूमी मग काश्मीर प्रश्नासारखा ह्या राज्यात त्यावेळी वेगळा कायदा का म्हणून केला गेला . गुजरात मध्ये तेथील जनता दारू पीत नाही का ?

श्रीमद दासबोध अभ्यास : इ-मेल अथवा पत्राद्वारे

लेखक विटेकर यांनी मंगळवार, 25/01/2011 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
II श्रीराम समर्थ II श्रीमद दासबोध अभ्यासक्रम आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य ,समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा - अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजावत नाही आणि ते शक्य ही होत नाही. अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे. दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात, नैराश्य प्रसंगी, मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात.आत्मविश्वास वाढवतात.

रावणाला कोणी मारला ?

लेखक नाहिद नालबंद यांनी मंगळवार, 25/01/2011 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक शिक्षण अधिकारी एकदा एका शाळेत गेला सहजच एका वर्गात शिरला, एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला. बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला. "रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला सारा वर्ग शांत शांत जाहला प्रश्न् पुन्हा एकदा विचारला "मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला - "रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?" मास्तरांनी खुलासा केला - आमचा विद्यार्थी साधा भोळा गांधी अहिंसा ठाऊक त्याला कशाला कोण मारेल रावणाला ? अधिकारी आणखी वैतागला, मुख्याध्यापकांकडे गेला, झाला प्रकार सांगितला, "रावणाला कोणी मारला ? विद्यार्थी सांगत नाहीत" - म
काव्यरस

'द किंग'

लेखक प्रास यांनी मंगळवार, 25/01/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत.

शबद गुरबानी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 25/01/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

भेसळखोरांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्याला जिवंत जाळले

लेखक छत्रपति यांनी मंगळवार, 25/01/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पेट्रोल आणि डिझेलमधील भेसळ रोखण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळखोरांनी पेट्रोल आणि रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची क्रूर घटना मनमाडपासून जवळच असलेल्या पाणेवाडी परिसरात घडली. य़ात सोनावणे यांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाणेवाडी येथे भारतातील सर्वात मोठे पेट्रोल आणि डिझेलचे साठे आहेत. या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. ही भेसळ होत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना कळाली. आपल्या पथकासह सोनावणे या ठिकाणी गेले. त्यावेळी पेट्रोल-डिझेल माफिया यांच्या बाचाबाची झाली.

अननस + हनी केक

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 25/01/2011 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या त्सेंटा आजीला आता तुम्ही सगळे ओळखताच, मागच्या आठवड्यात तिने एका पुस्तकात ही रेशिपी वाचली आणि हे करुन पाहूच या असा धोशा लावला. ह्या वयातला तिचा उत्साह पाहून मी आणि आकिम आजोबा पण मदतीला लागलो.केक करताना तिने तिच्या ४० वर्षांच्या अनुभवातून जे बदल केले त्यामुळे तर केक उत्कृष्ट होण्यास मदतच झाली. अर्थातच केक अफाट, अफलातून इ. इ.

जरा हटके भरली वांगी

लेखक रश्मि दाते यांनी मंगळवार, 25/01/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंड्ळी आज तुम्हाला आम्च्या यु.पी वाल्यांची स्पेशल भाजी कशी करतात ते सांगते,आज संध्याकाळी ताडोबाला जायचे आहे १ १/२ दीवसाच्या जंगल भ्रमंती साठी, त्यासाठी भाऊरायाची खास फर्माईश होती,ही भाजी तुम्ही वांगी,कारली,तोडंली,भेंडी आणी लहान कांदे वापरुनही करु शकता,२-३ दिवस खराब होत नाही म्ह्नुन प्रवासात नेण्यासाठी बेस्ट ही भाजी शीज्त आहे हे गल्लीच्या कोपरयावरुन ही ओळ्ख्ता येते एवढा घमघमाट सुटतो,भाकरी,पराठे किवा पुरी बरोबर मस्त लागते आणी कारली वापरली असल्यास भातात चुरुन ............फ्क्त कारली घेत असाल तर मेथीदाणे वापरु नये भरली वांगी जरा वेगळ्या प्रकार आहे हा नेहमिच्या भरल्या वांग्या एवजी वांगी २५० ग्