Skip to main content

पुन्हा बालविवाह?

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 01/02/2011 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच ही बातमी वाचली http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7403585.cms काही दिवसांपूर्वी एका समाजातील मान्यवर मनुष्याशी चर्चा झाली. हल्लीच्या नववी दहावीत असलेल्या पोरापोरींच्या वागण्यामुळे त्यांची लग्न परत पाच आठ वर्षाचे असतांना लावावी का असा तो समाज विचार करत आहे. त्यासमाजाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर असलेला पगडा फार आहे. मिपाकरांना काय वाटते?

भावड्या उत्तरं लिहितो

लेखक भीडस्त यांनी मंगळवार, 01/02/2011 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/16226 - भावड्याची खुषखबर तसेच बुलककार्ट देखील भावड्याने अशी धमाल सुरुवातीलाच उडवल्यानंतर आमच्या त्याच्याकडून अपेक्षा चांगल्याच वाढल्या. आणि भाउमहाराजांनीही पुरेपुर अपेक्षापूर्तीचं दान आमच्या पदरात भरभरून टाकलं. एकदा हिंदी गृहपाठासाठी निबंध लिहायचा होता. भावड्याने आयत्या वेळी कुणाचातरी निबंध उतरून काढला. सरांकडे तो निबंध तपासण्यासाठी गेला. सरांनी निबंध तपासला.

असंच, आपलं कहीतरी.....

लेखक नरेशकुमार यांनी मंगळवार, 01/02/2011 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक मुलगा होता. असाच कुठेतरी भटकत असताना त्याला एक सुंदर बगीचा दिसला. त्यात काही मुले आनंदाने खेळत बागडत होती. मुलाची सुद्धा इच्छा झाली कि तिथे जाऊन आपण खेळावे. त्याने त्या बागेत प्रवेश केला. थोडा वेळ खेळून झाल्यावर त्याचे कुणाबरोबर तरी भांडण झाले. मुलगा हिरमुसले तोंड करू परत घरी आला. त्याची बागेत खेळायला जाण्याची इच्छा होती. पण आता कसे जायचे याचा तो विचार करू लागला. काही वेळाने त्याला त्याच्या एक मित्राने एक सुप्पर आयडिया दिली. दुसर्याच दिवशी तो पुन्हा बागेकडे निघाला. वाटेत जाताना त्याने एक मुखवटा विकत घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर चढविला.

वॅलेंटाईन भेट प्रवास...

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 01/02/2011 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
थोडेशे मनोगत : गद्य लिखान लिहायला गेलो तरी पद्य म्हनुनच लिहिले गेले होते हे सगळे ... निम्मित्त कवितेचा धागा असला तरी गद्य लिखान करणार्‍या समस्त मंडळीचा हेवा वाटुन गेला मात्र .. असो वाचायला लेख.. कथा आवडत असणारा मी कवितेचे काहीच कळत नसताना कविताच का करत असतो कायम हे कोडे मात्र ४ वर्षे झाले मलाच उलगडतच नाहि कधी असो मुळ विषयावर येतो .. येथे कथा आहे एका दूर गेलेल्या सखी आणि प्रियकराची .. साधी .. सरळ आठवण पण खुपच मनाला उत्तेजीत करुन जाते .. पहिली कविता खुपच साधी असली तरी थोड्या फार प्रमाणात ती खरीच आहे.

पण...बंड करणार नाही...

लेखक अमोल देशमुख यांनी मंगळवार, 01/02/2011 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
(मा.सलिलदांच्या कवितेतील काही ओळी त्यांची क्षमा मागुन) भ्रष्ट्राचाराचे कितीही पेव फुटूदे माफीयांना येथे राज्य करु दे घोटाळ्यांची मोठी रास पडुदे काळ्या धंद्यांचे रान माजुदे पण मी मोर्चाही नेणार नाही अन संपही करणार नाही नेत्यांना माझा देश लुटू दे काळ्या पैशांनी बॅंक भरु दे महागाई गगनाला भिडु दे लोकशाहीचा खुनही होवुदे पण मी मनातल्या मनात कधी दंगाही करणार नाही अन याचा निषेध सुध्दा साधा कधी नोंदवणारही नाही मी मनातल्या मनात कुढत माझे आयुष्य जगेन आता भ्रष्टाचार हाच धर्म भ्रष्टाचारी नेते आमचे धर्मगुरु आणि आम्ही त्यांचे अंध अनुयायी..................... खरच सामान्य जनता किती हतबल आहे, सारं काही सहन क
काव्यरस

वॅलेंटाईन भेट प्रवास

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 01/02/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा वॅलेंटाईन भेट प्रवास गद्य म्हणुन लिहायला घ्यायचा असे ठरवले होते तेंव्हा, पण संपुर्ण गद्य आपोआप च पद्य म्हणुनच लिहिले गेले, त्या प्रवासातील एक कविता छान वाटली म्हणुन येथे देत आहे, बाकीचे गद्य विभागातच लिहित आहे.
काव्यरस

उडान (२०१० )

लेखक टारझन यांनी मंगळवार, 01/02/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
उडान णमस्कार्स , संबंधितांना टिप : हा लेख उडवायचा असल्यास किमान एकदा सुचित करावे . कारण कळल्यास आजन्म ऋणी राहु. मस्तकलंदर या मुलीने ह्या विषयावर लिहायला प्रवृत्त केल्याने तिचे औपचारिक आभार. डिस्क्लेमर : ह्या प्रकाराला चित्रपट परिक्षण म्हणता येणार नाही. नव्हे तो आमचा प्रांत ( शिवाय जात / धर्म ) नव्हे. काल रात्री जरा फावला वेळ मिळाला. सहज मुव्हीज चं फोल्डर ब्राऊझ करत होतो. सगळे छाणछाण चित्रपट पाहुन झाले होते. " १२७ आवर्स " हा चित्रपट पहाणार होतो .. पण त्याच्या शेजारीच मला "उडान" दिसला.