भाववाढ आणि नियंत्रण
नुकताच ऋषिकेश यांनी दिशाहीन विरोधी पक्ष असा धागा काढला होता. त्यात आणि त्यावरील चर्चेत वाढलेली आणि वाढती महागाई हा खूप मोठा प्रश्न आहे आणि त्यावर सरकारने नियंत्रण आणणे आवश्यक आहे असे मिपाकरांचे मत दिसले.
मला व्यक्तिश: सरकारने भाववाढ आटोक्यात आणावी हे म्हणणे पटले होते. परंतु मी त्यावर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केला तेव्हा मला वाटत असलेले भाववाढ आटोक्यात आणावी हे मत चुकीचे असल्याचे वाटू लागले. इतकेच नव्हे तर भाववाढ नियंत्रण करावे हे माझे मत दळभद्री समाजवादाचे आपल्यावर जे ४० वर्षे संस्कार झाले त्यातून आलेले होते हेही लक्षात आले.
मिसळपाव
बागडीचे खरेखुरे फ़ोटो काही आज उपलब्ध नाहीत. पण या फ़ोटोवरून ’बागड’ या शब्दाचे स्वरुप आणि ती ब्रिटीशांनी उभी केलेली २३०० किमी लांबीची बागड किती विलक्षण असेल याची कल्पना येवु शकेल.
आता ही प्रचंड बागड उभे करण्याची ब्रिटीशांना का गरज भासली असेल? हे जाणुन घेण्यासाठी आपल्याला थोडा त्या काळाचा आढावा घ्यावा लागेल.