Skip to main content

शिवजयंतीची 'वरात'

लेखक महेश_कुलकर्णी यांनी सोमवार, 21/02/2011 14:53 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : शनिवार १९ फेब्रुवारी २०११, संध्याकाळ ठिकाण : छोटेसे तरुण गणेशोत्सव मंडळ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची सरकारी जयंती (अनेक तिथी असल्यामुळे नक्की कोणते ते नमूद केले). सर्व शिवभक्तांमध्ये उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण.

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग ७

लेखक अवलिया यांनी सोमवार, 21/02/2011 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - http://misalpav.com/node/16851
मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय !

ब्यांका कशा फसवतात?

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 21/02/2011 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली बर्‍याच ब्यांका ग्राहकाभीमुख सोयी देत असतात. पण त्याचबरोबर त्या ग्राह्कांकडून काही चार्जेस देखील वसून करतात. बहुतेक सर्व ब्यांकांमध्ये कोअर ब्यांकींग असते. सर्व शाखा एका मध्यवर्ती सर्व्हरशी सलग्न असतात. या मुळे एखादी ठरावीक ब्रान्च वगैरे संकल्पनाना अर्थ रहात नाही. एटीएम मुळे तर तुम्ही कोणत्याही ब्यांकेच्या एटीएम मधुन पैसे काढू शकता पण त्याच वेळेस या ब्यांका पैसे भरण्यासाठी सरचार्ज लावतात. उदा: पुण्यातील एका शाखेतून पुण्याबाहेरच्या शाखेत कॅश भरायची आहे.

कुर्‍हाडीचा दांडा

लेखक गंगाधर मुटे यांनी सोमवार, 21/02/2011 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
कुर्‍हाडीचा दांडा काही दिवसापूर्वी मला माझ्या एका मित्राने एक बातमी सांगितली. "महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेला शेतकरी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झाला आहे." खरे तर ही दु:खद बातमी. ज्याच्या कुणाच्या नशिबात हा भोग आलाय, त्याच्याबद्दल हळहळ आणि मनात सहानुभूती निर्माण करणारी बातमी. पण ही बातमी ऐकताना मला मात्र अजिबात दु:ख झाले नाही किंवा ऐकल्यावर माझ्या मनाच्या कोणत्याच कोपर्‍यात तीळभरही सहानुभूती निर्माण झाली नाही, उलट ही बातमी मला आनंदच(असूरी?) देऊन गेली.

विनील, नक्षलवादा विषयी महत्त्वाचे

लेखक आळश्यांचा राजा यांनी सोमवार, 21/02/2011 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ लक्ष वेधण्यासाठी नवीन धागा आहे. हेच मी श्रामोंच्या धाग्यावरील प्रतिसादात दिलेले आहे. http://www.youtube.com/watch?v=_11_ufkDP4o इथे मलकनगिरीतील आदिवासी स्वयंस्फूर्तीने विनीलला नक्षल्यांच्या तावडीतून सोडवण्याचा निर्धार करीत असलेले दिसेल.हा त्याच कट ऑफ भागातील व्हिडीओ आहे. मध्यमवयीन आदिवासी स्त्री तीस वर्षांच्या विनीलचा उल्लेख "मोर बापा" - माझा बाप असा करतेय. बघा. जो जनतेचे रक्षण करतो पोषण करतो धारण करतो तोच पिता साक्षात मानावा जन्म देतो निमित्त केवळ हे त्या बाईने कुठे वाचलेले नाही. तरीही तिला हे वाटले.

मैत्री...

लेखक कोमल यांनी रविवार, 20/02/2011 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोन मनांना सांधाणारा पूल म्हणजे मैत्री.. ग्रीश्मातालं शेवंतीच फूल म्हणजे मैत्री.. अवघड वळणावर मारलेला 'कट' म्हणजे मैत्री.. आयुष्यातली गोड्गुलाबी पहाट म्हणजे मैत्री.. तुटत्या तार्र्याकड़े मागितलेली इच्छा म्हणजे मैत्री.. रिकाम्या बेंच वर केलेली प्रतीक्षा म्हणजे मैत्री.. परिक्षेआधी मारलेली नाईट म्हणजे मैत्री.. प्रिंटआउट वरून झालेली फाईटही मैत्रीच.. गालावरचा अश्रु अन खळी सुद्धा मैत्री.. हाडाहुन राकट अन मनाहुन हळवी अशी ... ही तुझी माझी मैत्री...
काव्यरस

अनाथ लेकरायची माय

लेखक उग्रसेन यांनी रविवार, 20/02/2011 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथ लेकरांची माय सिंधुताई सपकाळ. दोन हजारापेक्षा अनाथ मुलांना सांभाळणारी. घरातून हाकलून दिल्यानंतर वणवण फिरणारी. आपल्या पोटच्या मुलीला दुस-याकडे सोपवून मोठ्या जिद्दीने अनाथ मुलांना सांभाळणारी. अशी ही माय गावोगाव आपले अनुभव सांगत असते. आपण काय जगतो त्या कष्टांचा पाढा वाचते. आयाबायांना जगायची हिम्मत देते. त्यायचे अनुभव ऐकतांना डोळे भरतात. तीन वर्ष भीक मागावी लागली. स्मशानात झोपावं लागलं. काय नी काय अनुभव. वक्तृत्त्व पाहिल्यानंतर बहिणाबायची आठवण येते. आता कितीतरी पुरस्कार आणि कितीतरी मोठं काम चालू आहे. अनुभव कथन संपल्यानंतर लेकरांसाठी जमले तशी मदतीची हाक भरते.