Skip to main content

प्रतिक्रीया.. की अवांतर??

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 11/02/2011 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा. माझा हा मिपा वरील नेहमीचा प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकवण्याची आवश्यकता नाही.. तुम्हा टूकार लोकांकडून मार्गदर्शन मिळावे अशी तर अज्जीबात ईच्छा नाही.

कामापुरता नर

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी शुक्रवार, 11/02/2011 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
एखादं मधमाशांचं पोळं भरात आलं की त्या झाडाखाली जमिनीवर काही मधमाशा मृतावस्थेत आढळतात. त्या नर माशा असतात. नरांचं काम संपलं की राणीमाशी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवते. किंवा सरळ त्यांना रक्षक माशांकडून मारले जाते. ती मात्र आपली अंडी उबवण्यातच धन्यता मानते. किती हा विरोधाभास! म्हणजे ज्या नरांमुळे आपल्या उदरी नवी पिढी जन्म घेणार आहे, त्या पित्यांनाच यमसदनास पाठविण्याचा हेतू काय? कोळ्याच्या मादीने आपलं अंडं उराशी बाळगून कोळीष्टक विणलं की त्यात गुरफटला जातो तो अंडे फलित केलेला नरच. तिच्या लेखी त्याचं ‘काम’ संपलेलं असतं. तसा तो देहयष्टीनं तिच्यापुढे लिंबू टिंबूच असतो म्हणा.

आठवण...( की विसर??)

लेखक हरिप्रिया_ यांनी शुक्रवार, 11/02/2011 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा मिपा वरील पहिलाच प्रयत्न ...सर्वांची मते,सूचना ऐकण्यास उत्सुक आहे.. तुम्हा दिगज्ज लोकांकडून मार्गदर्शन मिळावे ही विनंती निशब्द रात्री जेव्हा जागून निघतात, आणि आपण पाहिलेलीच स्वप्न जेव्हा आजूबाजूला पिंगा घालू लागतात, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... जुनेच message जेव्हा नव्याने वाचते, जुनेच क्षण आठवून जेव्हा एकटीच हरवते, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... डोळ्यांच्या कडा जेव्हा ओल्याच राहतात, अर्धवट स्वप्नातही तुलाच पहिल्याचा दावा करतात, कस सांगू तुला तेव्हा तुझीच आठवण अनावर असते... आता मीही शिकणार आहे माझ्या मनाला दगड बनवायचं, तुझ्या सारखाच न बोलता

संस्कृत भाषा

लेखक महेश काळे यांनी शुक्रवार, 11/02/2011 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधायचे आहे भारताची जनगणना आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि या महिन्यात स्वयंसेवक पुन्हा एकदा तुमच्या कडे येतील तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची माहिती परत घेतली आणि नोंदवली जाईल. माहिती भरतांना तुमची मातृभाषा जी काही असेल ती तुम्ही लिहिलाच पण "अवगत असलेल्या भाषा" मध्ये संस्कृत भाषा न विसरता लिहा आणि पूर्ण जरी नाही तरी आजही आपण ती भाषा वापरतो.

फ्लाईट ९

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 11/02/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईट ९ १९८२ सालचा २४ जूनचा दिवस. ब्रिटिश एयरवेजचे फ्लाईट ९ लंडन च्या हीथ्रो विमानतळावरून निघाले होते. ही फ्लाईट मुंबई, चेन्नई, कौलालम्पूर, पर्थ अशा मार्गे मेलबर्नला जायची होती. हे एक बोईंगचे ७४७ जातीचे विमान होते. चार इंजिने असलेले हे भले मोठे विमान ब्रिटिश एयरवेजच्या ताफ्यात अनेक वर्षांपासून होते. फ्लाईट उत्तमरित्या चालली होती. विमान निरनिराळ्या ठिकाणी थांबत प्रवासी उतरवत घेत होते. आता विमानाने भारतीय उपखंड जवळपास सोडला होता. आता भारतीय समुद्रावरून मलेशिया इंडोनेशिया या मार्गावरून मार्गक्रमण सुरू झाले.

अवंतिका बाईंची समाजसेवा

लेखक मनीषा यांनी शुक्रवार, 11/02/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
आज अवंतिका बाईंची फार म्हणजे फारच लगबग चालू होती . आपला अवजड देह ( शक्यं तितक्यां) चपळाईने हालवतं त्या कामे उरकीत होत्या . सकाळी सकाळी त्यांनी आधी निर्मलाबाईंना नाश्त्याचा मेन्यू सांगितला. रामूला घराची साफ - सफाई नीट करण्याच्या सूचना दिल्या. ही महत्वाची दोन कामे उरकल्या नंतर नाही म्हणले तरी त्यांना थोडासा शीण आला होताच . म्हणून त्यांनी निर्मला बाईंना आलं घालून चहा करायला सांगितला. तेव्हढा चहा घेण्यापुरत्या काय ते त्या जरा सोफ्यावर विसावल्या . नंतर लगेच माळ्याला बागेच्या निगराणी संबंधी सूचना देण्यासाठी स्वतः बंगल्याच्या (चार ) पायर्‍या उतरून बागेत आल्या .