Skip to main content

काकाच्या सासर्‍याला आजोबा म्हणावे का?

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 23/11/2011 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10831210.cms सध्या महाराष्ट्राच्या दोन राजघराण्याच्या पुतण्यांमधे शाळकरी पोरांना शोभेशी भांडणे चालू आहेत. अदापः ह्यांना शेतीतले काय कळते? कधी नांगर तरी पाहिलाय का? राठा: ह्यांना क्रिकेटमधले काय कळते? ह्यांचे बापजादे क्रिकेट खेळायचे का? अदापः होयच मुळी! माझे आजोबा भारताच्या टीममधे होते? राठा: साहेबांचे सासरे तुमचे आजोबा कसे? उद्या तुम्ही दारासिंगला आजोबा म्हणाल. अदापांचे उत्तर वाचायला उद्याचा मटा नक्की वाचा.

बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा

लेखक विदेश यांनी बुधवार, 23/11/2011 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा दूर गेली फूल पाने एकटा मी हा असा जन्मता मी खूष झाले का बरे गणगोतही जीव होता पुरुष माझा नवस जन्माचा तसा देवही ना जाणतो तो मुकुटचोरी जाहली मी सदा डोकावतो झोळीत माझ्या का असा मॉलमध्ये जात असता खूप असतो खूष मी लांब असताना भिकारी मीच बघतो का खिसा श्वानही वर मान करुनी आज भुंकेना मला राव असता मान होता आदबीचा या बसा

वीर शिवाजी - कलर्स

लेखक सचिन यांनी मंगळवार, 22/11/2011 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
आज चॅनेल सर्फिंग करता करता एक धक्कादायक अनुभव आला. मिपावाचकांना याविषयी सांगणे आवश्यक वाटले, किंबहुना सर्वांच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणून........... कलर्स चॅनेलवर "वीर शिवाजी" नावाची एक मालिका चालू आहे.रोज ८.३० ते ९.०० सायंकाळी. महाराजांच्या बद्दल आजपर्यंत कधीही वाचण्यात / ऐकण्यात न आलेल्या अशा अतर्क्य घटना त्यात दाखविल्या आहेत. माझ्या मते शिवचरित्राला अक्षरशः विटंबित करण्यात आले आहे. या चॅनेल द्वारे ही मालिका जगभरात प्रसारित होत असणार... उदाहरणादाखल : (१) मियां रहीम नावाच्या कुठल्याश्या खानाच्या गोटातील एक बाई शिवाजी राजांना मारायचा कट करते आहे.

अखेर

लेखक अज्ञातकुल यांनी मंगळवार, 22/11/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
मी अडखळलो धडपडलो ठायी ठायी सांभाळ मुला रे सांगुन गेली आई ती प्राणपणाने लढली घन तिमिरात कष्टात गुंतली अथक राबली बाई मायेत गुंफुनी ऊब; गाइली अंगाई भेटलो कधी तिज अखेर; आठवत नाही वाढता वाढता वय गढले संसारात मन शिणले; अवचित वृद्ध पाहिली माई हरवल्या सावल्या हरले ऋण ओघात मी जडलो अंधारात जखडलो उणा पोरका आत ठरवून न ठरवूनही न घडले कांही निसटल्या क्षणांनो सांगा मज; मी कसा होउ उतराई.... .............अज्ञात
काव्यरस

दिलीप प्रभावळकरांचा !

लेखक दिपोटी यांनी मंगळवार, 22/11/2011 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक आणि रंगभूमीला दिलेल्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार या दोन अत्यंत मानाच्या पुरस्कारांपाठोपाठ ज्येष्ठ अभिनेते-लेखक श्री दिलीप प्रभावळकर यांना आता त्यांच्या 'बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी गेल्या सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला. या निमित्ताने त्यांच्या अभिनयकारकीर्दीचा घेतलेला हा धांडोळा ...