Skip to main content

मैत्री

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
खळखळणारे पाणी भिडे कातळाला सांगे गुज मनीचे त्या स्थितप्रज्ञाला तोही मग हलकेच घेई कवेत त्याला पाणीही मग सरसावे आलिंगनाला हळुवार बोलणे त्यांचे वाटे खळाळता झरा शुभ्र लाटाही मग उठाती त्यांच्या साथीला चाले संवाद त्यांचा क्षणोक्षणी, दर एक ऋतूत निसर्गही मग देई दाद त्यांच्या मैत्रीला
काव्यरस

सहज

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहज असे वाटले कि स्वप्नांच्या गावी फिरून यावे .. थोडेसे आठवणींचे गाठोडे घेऊन एकटेच बाहेर पडावे .. निवांत स्वतः स्वतःला शोधून पाहावे. काही तरी जुने फिरून नव्याने मिळते का पाहावे .. नाही जरी मिळाले तरी जुने विश्व पुन्हा एकदा अनुभवावे .. म्हणून मग आठवणींचे गाठोडे उघडून बसले नि - त्यात कधी हरवून गेले माझे मलाच कळले नाही. स्वप्नांच्या गावी जाण्याची गरजच जणू उरली नाही. जुनीच स्वप्ने पुन्हयांदा नवी वाटू लागली. मला पण माझी भीती वाटू लागली. पण स्वप्नेच ती किती वेळ सुखावण्याची ताकद असणार त्यांच्यात ?? परिस्थितीचे भान दिल्याशिवाय ती तरी कशी सत्यातून जाणार ? मी पण मग हट्टाला पेटले.

आठव

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
मन मोहरले आज फिरुनी तुझ्या सवे क्षण आठवती ते पहिल्या शहाऱ्याचे ते पाहणे तुझे स्तब्धपणे ... आठव आज येते सहज अनाहूतपणे
काव्यरस

जीव माझा गुंतला आहे

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे निम्मा रस्ता इतक्यातच संपला आहे पुढच्या वळणावर राहू परत उभे हातात हात घालून जाऊ सोबत दोघे जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे सावर सगळे काळजीने, आयुष्य जग आनंदाने पुढचा रस्ता खुप खडतर आहे जीवाला जप तुझ्या, त्यात जीव माझा गुंतला आहे फिरुनी सोबत जगण्यासाठी उमेद ठेव जराशी उमेदिसोबत शारीर न झुकणार आहे जीवाला जप तुझ्या त्यात जीव माझा गुंतला आहे

सखा

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
मनात ही हूर हूर आज प्रियासाठी रागावू नकोस मन वेडे तुझ्यासाठी तू अन तूच तर सखा का आरसा माझ्या मनाचा ?? घे पूर्ण आनंद या जगण्याचा, तुझ्या-माझ्या मैत्रीचा क्षण मौलिक हे मिळणारे, घे जागून तू मुक्तपणाने जग येईल कवेत तुझ्या, तू घे भरारी आनंदाने

तो क्षण

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक तो क्षण आठवे माझे श्वास स्तब्ध गोठवे दिवस अन रात ती एकमेकांसवे अवीट असे ते गावे गोडवे कालचक्र फिरुनी उलटे क्षणोक्षण वाटे हे माझे हवे वास्तवाची जाणीव होता अस्तित्वही मग चटकावे तुझे जाणे असे घडावे हूरहूर मनास सतावे कधी या पक्ष्याने पिंजऱ्यातून उडावे ?
काव्यरस

बालपणीचा गाव

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
सहज वाटे धावत जावे गावाच्या आठवणीत क्षणभर थांबावे तो गाव मज आठवे सुर पारंब्या, मन जेथे झुलवे ती आंब्यांची न्याहारी त्या रात्रीच्या गप्पा धुंडाळला लपंडावात वाड्याचा हरेक कप्पा त्या संध्याकाळच्या वेळी गप्पा न् रानापर्यंत फेऱ्या रसाळ रानमेवा तो रानातल्या झाडावरील साऱ्या लाडिक हट्टाने घेतलेल्या त्या वाण्याकडील गोळ्या नव्या कोऱ्या लोणच्यासोबत त्या धबाडक्या पोळ्या त्या भुताखेतांच्या गोष्टी ते गोधडीसाठीचे भांडणे मिळता पांघराया गोधडी भावंडांना चिडवून रडवणे सारे हरवले आता हे, सर्व आहे मज ठावे तरीही मन पुन्हा पुन्हा गावाकडेच धावे
काव्यरस

वादळ

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
आज मला खूप मोकळं मोकळं वाटत होतं. गेल्या कित्येक दिवसांपासून मनाची सुरु असलेली घालमेल संपली होती एकदाची !! गेले काही महिने जे आम्ही वेगळे राहत होतो त्याचं फलित आज एका कागदावर काळ्या अक्षरात माझ्याकडे आलं होतं. मला खरच हे हवं होतं का ? त्याने एकदा तरी मला विचारायला हवं होतं. पण तो त्याचा स्वभावच नव्हता. माझ्याही अंगवळणी पडलं होतं सगळं. मला नक्कीच नको होतं, हे असं अर्ध्यात डाव मोडून जाणं. पण डावच तो !! एकटी मी तरी कसा मांडू शकणार होते ? अन्यथा आत्ताच्या, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, मी त्याची वाट पहात राहिले नसते.

चाहूल

लेखक navinavakhi यांनी बुधवार, 23/11/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
हुरहूर मनी दाटता चाहूल तुझी लागता क्षणात वाटे आला वारा अलवार केस उडवणारा तुझा तो तनगंध करे मज बेधुंद हळुवार तलम स्पर्श फुलवे मनी हर्ष कधी जातील विरह क्षण कधी संपतील हे वर्ष
काव्यरस