बालपणीचा गाव
सहज वाटे धावत जावे
गावाच्या आठवणीत क्षणभर थांबावे
तो गाव मज आठवे
सुर पारंब्या, मन जेथे झुलवे
ती आंब्यांची न्याहारी
त्या रात्रीच्या गप्पा
धुंडाळला लपंडावात
वाड्याचा हरेक कप्पा
त्या संध्याकाळच्या वेळी
गप्पा न् रानापर्यंत फेऱ्या
रसाळ रानमेवा तो
रानातल्या झाडावरील साऱ्या
लाडिक हट्टाने घेतलेल्या
त्या वाण्याकडील गोळ्या
नव्या कोऱ्या लोणच्यासोबत
त्या धबाडक्या पोळ्या
त्या भुताखेतांच्या गोष्टी
ते गोधडीसाठीचे भांडणे
मिळता पांघराया गोधडी
भावंडांना चिडवून रडवणे
सारे हरवले आता हे,
सर्व आहे मज ठावे
तरीही मन पुन्हा पुन्हा
गावाकडेच धावे
वाचने
1048
वाचनखूण
प्रतिक्रिया
1
छान...