Skip to main content

आयडीया ३जी सेवा तक्रार - सल्ला हवाय

लेखक jaydip.kulkarni यांनी सोमवार, 16/07/2012 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही महिन्यांपूर्वी आयडिया ची ३जी सेवा (८५० रुपये मासिक शुल्क आणि ३ जीबी वापर मर्यादा) ऍक्टिवेट करण्यासाठी विनंती केली.दुसऱ्या दिवशी कस्टमर केअर एक्झिकेटिव्ह ने मला ती सेवा ऍक्टिवेट झाल्याचे सांगितले आणि मी इंटरनेट वापरायला सुरुवात केली , पण मिळत असलेली सर्विस अतिशय खराब होती .

कुठे करू पावसाळ्यातली रम्य सफर?

लेखक विनीत संखे यांनी सोमवार, 16/07/2012 20:22 या दिवशी प्रकाशित केले.
सायबानु लिहिण्यास श्रम ह्यासाठी की मला फ्यामिलीसोबत (२ मोठे आणि एक छोटुकली) मुंबईच्या जवळपास पावसाळ्यात (ऑगष्ट मध्ये) रम्य सहल करायची आहे. २ दिवस तीन रात्र. छोटुकली ११ महिन्यांची आहे. त्यामुळे सहलींचे पर्याय कमी सापडतात. गाडीची व्यवस्था मला करता येईल... वीस पंचवीस हजारांचे बजेट आहे (बायको पंधरात बघतेय ... त्यात "रम्य"पणा कमी व्हायची भिती असल्याने मी बजेट वाढवलंय) काही मी शोधलेले पर्याय ... १. लोणावळा अ‍ॅम्बी वॅली - इथे बुकींग कशी करतात हो? २. महाबळेश्वर ३. माथेरान - (बाळाला घेऊन घोड्यावर किंवा पायी चालता येईल का?) ४. पांचगणी - फिरण्यालायक काय आहे इथे? ५.

किशोर कुमार: मराठी गाणी आणि एक अनोळखी पैलू

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 16/07/2012 16:29 या दिवशी प्रकाशित केले.
मला आवडणार्‍या कलाकार आणि खेळाडू यांच्या स्वभावाची नेहेमीच्या छबीपेक्षा वेगळी आणि चांगली बाजू शोधण्याचा प्रयत्न करणं हा माझा जुना छंद. किशोर कुमार या माझ्या आवडत्या गायकाच्या स्वभावाबद्दल आणि एकूणच आयुष्याबद्दल आतापर्यंत अनेक गोष्टी ऐकीवात आणि वाचनात आल्या. तेव्हा त्याच्याबद्दल काही वेगळी गोष्ट सापडते का हा विचार मनात अनेक दिवस घोळत होता. शिवाय त्याचं प्रमुख कार्यक्षेत्र हिंदी चित्रपटात पार्श्वगायन आणि अभिनय असल्यानं त्याने गायलेल्या मराठी गाण्यांबाबत उत्सुकता होतीच. लहानपणी सचिनचा 'गंमत जंमत' हा चित्रपट पाहिला होता. त्यात अनुराधा पौडवाल यांच्या साथीनं एक द्वंद्वगीत गायल्याच आठवत होतं.

आशा

लेखक sneharani यांनी सोमवार, 16/07/2012 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
नावच कशाला हवं एखाद्या नात्याला ऋणानुबंध समज हवं तर..... हिर्‍याच्या तेजासम असणारा जिव्हाळा - त्याला नात्याच्या नावाचं कोंदण हवच कशाला? हिराही चमकतो की मग तो सोन्याचांदीच्या कोंदणात असला काय किंवा नसला काय.... अशा जिव्हाळ्याच्या हिर्‍यामधून आशेची किरणं परिवर्तित होतात... अन् मग रंगबेरंगी स्वप्नं आकार घेतात स्वप्नं सत्यात उतरताना आशेची किरणं सदोदीत साथ देत राहतील ही कदाचित पण नशिबाची साथ मिळायला लागतेच की... म्हणतात की लाख शिंपले उघडले की एखादा अनमोल मोती सापडेल इतके प्रयत्न करूनही नाही सापडला तर "नशीब" खोटं ठरत पण शिंपली उघडण्याची आस अन् त्या प्रत्येक क्षणात असणारी आशा सत्य होतीच ना? अगदी तसच
काव्यरस

हे सगळे गेले कुठे?

लेखक स्मिता. यांनी सोमवार, 16/07/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात कोणत्या मित्र-मैत्रिणीला प्रत्यक्ष भेटून मनसोक्त गप्पा केल्या आहेत असा प्रश्न विचारल्यास फार कमी लोकांना ठाम उत्तर देता येईल. मात्र त्यात जीमेल वरच्या लिखित गप्पा किंवा स्काइपवरच्या ऑडिओ-व्हिडिओ गप्पांचा पर्याय टाकला तर बहुतेकांना ठाम उत्तर देता येईल. मी स्वतः या दुसर्‍या गटातली म्हणजे बहुसंख्यांपैकी आहे.

इशारा..

लेखक स्पंदना यांनी सोमवार, 16/07/2012 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
सोकावालास का रे? अलिशान मंदिरात राहून? डॉलबी आरत्यांच्या गजरान कानाचे पडदेही फाटले असावेत. बहिरा झालायस का? सांजसकाळच्या छप्पन भोगांनी अ-पचन झाली असावीत अन धुपादिपांच्या आडून काही दिसतही नसाव आधी बरा होतास चार तुळ्यांनी कसबस पेललेल शिखर आत्ता पडतय की मग तुला चांगला जागृत ठेवत होत. एखादा गुळाचा खडा अन अधीमधी चव पालटिला चार फुटाणे बरचस चलाख ठेवत असावेत तुला कधी उमलली तर दिसणारी गुलबक्षिचि फुल तरतरी आणून जायची कापऱ्या आवाजातल्या स्तोत्रांना भुकेला होतास तेंव्हा चल उठ चल परत माळरानावर कुठेतरी शेताच्या बांधाला बस पुन्हा शेंदूर फासून अन त्यावर रेखलेले डोळे रोखून

का ग धरिला

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 16/07/2012 08:42 या दिवशी प्रकाशित केले.
जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला मी दिला होता सखे, चन्द्र तुझिया हाती फेकुनी पाण्यामधे, कवडसा का ग धरिला पाहिली होती सखे तू बेवफाई माझी श्वासातल्या जाणिवांचा, भरवसा का ग धरिला ओलावा शोधित, फिरलीस वणवण सखे संग ऐसा कोरडा, गरमसा का ग धरिला मखमली पाकळ्यानी लपविले मी कफन पदर त्याचा रेशमी, तलमसा का ग धरिला जीवघेणा शूल- अबोला असा का ग धरिला ग्रीष्मजैसा पोळण्याचा, वसा का ग धरिला
काव्यरस

काल

लेखक संजय क्षीरसागर यांनी सोमवार, 16/07/2012 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
सजगता किंवा अवेअरनेस म्हणजे वास्तव आणि कल्पना यात तारतम्य करण्याची आपली क्षमता (The ability to differentiate between a fact & fiction). आपला अवेअरनेस जितका जास्त तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं. अस्तित्वात `काल' असं काही नाही, ज्याला आपण वेळ म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर (कल्पनेनं) पृथ्वीच्या सरळ वर आकाशात गेलो आणि पृथ्वी आपल्याला खाली दिसायला लागली तर सूर्य सतत प्रकाशमान आहे आणि पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्यामुळे दिवस आणि रात्र होते हे लक्षात येइल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही.