Skip to main content

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

लेखक प्रास यांनी रविवार, 15/07/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे.

दाल तडका

लेखक आचारी यांनी रविवार, 15/07/2012 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - १) १ वाटी तुरीची दाळ (यासोबतच हरभरा किवा मसूर / मुग दाळहि घालू शकता) २) ५ लसून पाकळ्या (बारीक चिरून घ्यावे) ३) १ इंच आले (बारीक चिरून घ्यावे) ४) हिरव्या मिरच्या - ५ (बारीक चिरून घ्याव्या ) ६) फोडणी साठी - कडीपत्ता , जिरे आणि तेल ७) तडका साहित्य - गरम मसाला, लाल तिखट, २-३ लाल सुक्या मिरच्या. कृती - १) तुरीची दाळ कुकरमध्ये शिजवून घ्यावी. २) एका कढई मध्ये थोडे तेल घालून चांगले कडक होऊ द्यावे त्यात आधी मिरच्या , कडीपत्ता , जिरे घालावेत. नंतर आले लसून घालून एक दोन वेळा परतून लगेच त्यात शिजलेली दाल घालून थोडेसे पाणी घालून उकळू द्या.

मंदी आली का हो !

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 15/07/2012 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
परवाची गोष्ट. आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा एका परीचिताकडे पाठवला. हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्‍या कंपनीत काम करतो. म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात." मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये. निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे. म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्‍या मित्राकडे. त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक.

कविता व भावगीत

लेखक शरद यांनी रविवार, 15/07/2012 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागील एका लेखात विषय आला होता " कविता व भावगीत यात फरक करता येतो का ? आणि तसा फरक असेलच तर तो कशामुळे उद्भवतो ? आता हे शक्य आहे की चांगला कवी सुरेख भावगीत लिहू शकेल आणि श्रेष्ठ भावगीतकार सुरेख कविताही लिहून जाईल. दोन उदाहरणे म्हणजे मंगेश पाडगावकर आणि शांताबाई शेळके. उलटे उदाहरण म्हणजे आरती प्रभूंचे. त्यांच्या अनेक सुन्दर कविता रसिकांच्या मनात घर करून असतात पण भावगीत ? लक्षात आले का मला काय म्हणावयाचे आहे ? पण हा फरक अधोरेखित करावयास आज एक छान उदाहरण देतो. काळ साधारणत : साठ एक वर्षांपूर्वीचा.

गुवाहाटीच का बरे --

लेखक शकु गोवेकर यांनी रविवार, 15/07/2012 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
गुवाहाटी व बागपत पाठोपाठ गुजरात व छ्त्तीसगड येथे कालच घडलेल्या या घटना -- विडीओ नेट वर १) गुजरात मधील धाओड भागात एका नराधमाने महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार करुन त्याचा विडिओ नेट वर अपलोड केला व सीडी काढुन त्या वितरित केल्या २) छत्तीसगड मधिल विलासपुर ते रतनपुर मार्गावरिल खुन्टाघाट येथे फिरावयास गेलेल्या जोड्प्याना बंदुकिच्या धाकाने कपडे काढावयास लावुन नग्न होण्यास भाग पाड्ले व तश्या अवस्तेत एस एम एस काढ्ला गेला व हा एस एम्स वितरीत केला ३) बंगलुरु येथे सात वर्षाच्या मुलीचे मंजुनाथ नावाच्या युवकाने शील अपहरण केले या व अशा बातम्या वाचुन मन विषन्न होते रामदास फुटाणे यांनी एका कवि

गुवाहाटी आणि बागपत

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी शनिवार, 14/07/2012 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसात आपल्याच देशात अशा काही घटना घडल्या आहेत ज्यामुळे कोणाही सुसंस्कृत भारतीयाची मान शरमेने खाली जाईल आणि संतापाचे अंगार दाटून येतील.आणि दुर्दैवाने आपण त्याविषयी काहीही करू शकत नाही म्हणून हळहळ व्यक्त करण्याशिवाय फारसे काही करू शकणार नाही. घटना १: स्थळ: गुवाहाटी.

ललिताचं लळित

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 14/07/2012 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
"तू ललित का लिहीत नाहीस?' बारावीत आमच्या एका (साहित्यिक) वर्गमित्रानं मला हा प्रश्‍न केला होता. ललित अशा नावाचा लेखनाचा काही प्रकार असतो, हे तेव्हा मला प्रथम कळलं होतं. तो स्वतः चांगलं ललित लिहितो, असा त्याचा दावा होता. अर्थात, कॉलेजच्या "सहकार' मासिकातही त्याचं लेखन छापून आणेपर्यंत त्याची मजल होती, त्यावरून तो निश्‍चितच मोठा साहित्यिक असावा. तर सांगण्याचा उद्देश काय, की लिखाण म्हणजे एकतर कथा, कादंबरी, नाटक किंवा कविता, एवढंच मला माहीत होतं. गेला बाजार प्रवासवर्णन.

' खिडकीमधुन गच्ची तुझी......!'

लेखक जेनी... यांनी शनिवार, 14/07/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
कटलेल्या पतंगाकडे त्याच्यासोबत नाराज होऊन बघणारी , त्याच्या मदतीने उंच आकाशातले तारे मोजणारी, त्याला भिजवणारी ,त्याच्यासोबत भिजणारी ,त्याच्या मनातली असंख्य गुपितं जपणारी, दारुच्या बाटल्या लपवून घेऊन त्याच्या कटात स्वतःला सामील करुन घेणारी ,रात्रीच्या अंधारात त्याच्यासोबत दिवसभरातला उन्हं सावल्यांचा खेळही थांबवणारी ......गच्ची . ठाण्याच्या आनंद टॉकिज मागे असणार्‍या तीन ते पाच मजली इमारतीच्या गर्दीत आमच्याही इमारती वसलेल्या . जागेच्या भयाण, न सुटलेल्या प्रश्नाला जागलेल्या.