व्हायरस हंटर
त्याला विषाणू संशोधनातला 'इंडियाना जोन्स' म्हणतात. टाईम मासिकाने २०११ साली जगातल्या १०० सर्वात प्रभावशाली लोकांमध्ये त्याची निवड केलेली आहे.'स्टॅनफर्ड विश्वविद्यापीठाचे' सन्माननीय प्राध्यापकपद तो भूषवतो. आणि जिथे आधुनिक युगातील प्रगतीचा आणि सुखसुविधांचा गंधही नाही अशा आफ्रिका आणि आशियाच्या घनदाट वर्षावनांमध्ये अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत रक्ताचे नमुने गोळा करत फिरत असतो. तीन वेळा त्याला मलेरियाचा जीवघेणा संसर्ग झालेला आहे. तिसर्या वेळचा संसर्ग तर इतका भयानक होता कि साक्षात मृत्युच्या दारातून तो परत आलाय.
मी आहे!!
तुझा निरोप घेऊन
तीनदा 'येतो गं' म्हणून
जड पावलांनी मी निघालो
हळूच माझ्या मागे येऊन
खांद्यावर हात ठेऊन म्हणालीस...
"मी आहे!"
पाठ वळताच भयाण पोकळी जाणवू लागली
तुझ्याविना जगाची तसवीर मला भिववू लागली
जलतरंगाचा नाद व्हावा असा तुझा आवाज
पुन्हा कधी ऐकायला मिळेल
असं वाटू लागलं, तेव्हा
फोन आलाच तुझा, म्हणालीस...
"मी आहे!"
घरी आलो, अगतिकपणे बसलो खिडकीत
गाडी सुटली असेल का तुझी, असा खिन्न विचार करत
श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ चालला होता बाहेर
धावत येऊन तुला भेटण्याची ओढ दाटून आली
तुझा मेसेज आलाच, "मी निघालीये रे..."
वाटलं कळवावं का तुला,
गर्दीत आहे, सार्यात आहे...
मी तसाच पुढे निघालो…
जेव्हा जवळ काय घडतय, ह्याची जानिव होवुन, काहीच करता येत नाही त्या वेळी अगतीकता जानवते. न मिळालेली उत्तरं सतावतात, त्या वेळी स्वतवर राग काढन्याशिवाय काहीच करु शकत नाही.
मग एक मळीभ दाटून येते...
काव्यरस
सुट्टी आणि मी
[खालील लेख दुबई महारष्ट्र मंडळाच्या नवरंग या ई-मासिकात प्रकाशमान झाला आहे. तो इथे माझ्या मि.पा. मित्रांसाठी परत प्रकाशमान करत आहे ... चायला लेख आहे का बल्ब?? ;) ]
मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे "धिंगाणा" घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते.
साध्वाभास
आटपाट नगर होतं. तिथे एक साधू राहात होता. साधूला लोकांचं आयुष्य सुखकर करण्याची फार तळमळ होती. त्यामुळे राजासुद्धा त्या साधूचा भक्त झालेला होता. त्या साधूचं एक प्रसिद्ध वाक्य होतं 'जय साध्वाभास!' साधु म्हणजे चांगला आणि आभास म्हणजे आभासच, दुसरा काही अर्थ नाही. ह्या त्याच्या प्रसिद्ध वाक्याचं विश्लेषण करणारी काही पुस्तकेही काहींनी लिहिली होती.
असो, तर एक दिवस त्या साधूकडे एक बाई आपलं गार्हाणं घेऊन गेली. "साधुमहाराज, गेली २-३ वर्षं माझे पाय खूप दुखतात हो. तुम्ही काहीही करा आणि हे दुखणं थांबवा."
साधूने तिच्याकडे एकवार पाहिलं. आणि मनातल्या मनात म्हणाला, 'अरेच्या, हिचे पाय तर दिसतच नाहियेत.
वारूळ
पावलांचे मुंगळे निघाले
त्या वारुळातील योगी मंत्रामागून मंत्र उसवत राहील
तर नागवे होणाऱ्या शरीराची कुठली असेल पोळणारी जात?
मांडी घालून म्हणता येतात सहिष्णू शब्दरचना
त्याच वेळी निराकार जनावर वेटोळे (? ) घालून
रचत असते जहरोत्तम द्वंद्वगीत...
सहज मनाच्या गाभाऱ्यातील समईची जखम
रुंदावायला लागली की
एखादी पालखी हमखास येते
भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात
पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी
देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे
असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी
एक... दोन...
मिसळपाव

