Skip to main content

कातरवेळ..

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 23/08/2012 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
प्राचीला गच्ची जोडण्याचा आमचाही एक प्रयत्नः आठवांचे सूर, अश्रूंचे पूर, लागे हूरहूर, जीवालागी.. नि:शब्द बोलणे, हळूच ते स्मरणे, अव्यक्त भावना, हृदयात... मनात तू, स्पंदनात तू, जीवघेण्या श्वासात तू, ध्यानीमनी... दिशा सांजावल्या, गोकुळे बहरली, परि एकलेपण, कातरवेळी...!! - सुधीर बागुल, मस्त कलंदर
काव्यरस

दु:खाचे निखारे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 23/08/2012 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले गालावर अमुर्त दु:ख ओघळले कोवळे ना दिशा, ना आकार ना झंकार माहित ओठांत अव्यक्त शब्द अडकले सगळे सोनेरी दर्प घेवून अवतरली किरणे मायेचा अर्क दवबिदुंत पाझरे आसवांच्या मोत्यांची मजजवळ तोरणे हलकाच स्पर्श ओलसर, दु:खाचे निखारे कोमेजलेला गंध, झिजलेला वृ़क्ष ओघळणारे मेघतांडव नेत्रात लुप्त ना दिशा, ना आकार ना झंकार माहित भिजल्या डोळ्यासही ना काही वाटले ------ शब्दमेघ

जुलूस

लेखक नगरीनिरंजन यांनी गुरुवार, 23/08/2012 17:37 या दिवशी प्रकाशित केले.
सहावी संज्ञा, Intuition किंवा आतला आवाज या प्रकाराला काही शास्त्रीय आधार आहे की नाही, कोण जाणे? आजकाल तंत्रज्ञानाने इतकी मोठी झेप घेतलेली आहे आणि ते इतक्या प्रकारे, इतक्या वेळा मनावर आदळले जाते की कधीकधी स्वत:चा आतला आवाज खोटा वाटायला लागतो. इतकी भरभराट होत असतानाही चुकचुकणारी माणसं नैराश्याची बळी वाटायला लागतात, काहीतरी जुन्याच्या आठवणींनी उसासणार्‍यांना सरसकट वायफळ नॉस्टॅल्जियाचे रोगी समजले जाते आणि इतक्या मोठमोठ्या गोष्टी बोलणार्‍यांसमोर साध्या-साध्या शंका विचारण्याची लाज वाटू लागते. मुळात माझ्यासारख्याच अनेक लोकांना स्वतंत्र विचार करण्याचं शिक्षण मिळालेलंच नाहीय.

स्टफ्ड चिकन ब्रेस्ट

लेखक गणपा यांनी गुरुवार, 23/08/2012 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, काय श्रावण सुटला की नाही अजुन? ज्यांनी सोडला असेल त्यांनी ही पाककृती करुन पहायला हरकत नाही आणि जे अनंतचतुर्द्शी पर्यंत थांबणार आहेत त्यांनी नुसती पहायला हरकत नाही. नेहमी त्याच प्रकारच चिकन खाऊन कंटाळलेल्या जीवांसाठी हा थोडासा बदल. कमी तिखट, चीज यांमुळे मुलांच्या आवडीचं तर पालेभाजी, पौष्टिक अळंबी मुलांच्या पोटत गेल्यामुळे 'पालक' पण खुश.

सर्वोच्च

लेखक जयनीत यांनी गुरुवार, 23/08/2012 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्याफार यशाने एक मनुष्य हुरळून गेला. त्याला झाली ' ग ' ची बाधा. त्याची वर्तणूक आंतरबाह्य बदलली. लोक त्याला मग टाळू लागले. त्याने मनात विचार केला, जग माझ्या यशा वर जळू लागले. हळू हळू तो संपूर्णपणे एकाकी झाला. असंच कुठे तरी त्याने ऐकले. ' मनुष्य एकाकीच असतो यशाच्या सर्वोच्च शिखरावर ' आता त्याच्या मनात तो सर्वोच्च असल्या बद्दल कुठलीही शंका उरली नाही. अन तो हर्षवायुने मरून गेला. (समाप्त)

पं. विष्णु दिगंबर पलुस्कर - कर्तृत्व आणि प्रवास

लेखक gaikiakash यांनी गुरुवार, 23/08/2012 00:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार- काल २१ आगष्ट, बरोबर ८१ वर्षापूर्वी म्हणजे २१ आगष्ट १९३१ ह्या दिवशी पं. विष्णु दिगंबर पलुस्कर निधन पावले. त्यांच्या आयुष्याचा आढावा घेणारा एक लेख लॉस एन्जेलिस येथील श्री. शशीकांत पानट यांनी लिहिला आहे तो आपल्या वाचनार्थ येथे प्रसिध्द करीत आहे. ह्या निमित्ताने त्यांनी केलेल्या भव्य कार्यासाठी त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे एव्हढाच उदेश्य! धन्यवाद, आकाश हा लेख येथे प्रकाशीत करण्यारिता श्री. शशीकांत पानट यांची पूर्वपरवानगी घेतलेली आहे. ----------------------------------------------------------------------------------------
पं.

स्त्रियांना नक्की काय हवे असते?**** (आधारित स्वैर अनुवाद)

लेखक राजघराणं यांनी बुधवार, 22/08/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रियांना नक्की काय हवे असते? हे नेहमी लक्षात ठेवा! (स्त्रियांनो) जरा यावर विचार करा. (पुरुषांनो) कथेची मजा घ्या. **** तरुण आर्थर राजाला शेजारच्या साम्राज्याच्या राजाने पकडले होते आणि कैद करून ठेवले होते.**** **** त्या राजाने आर्थरला ठार मारले असते; परंतु तो त्याच्या तरुणाईने आणि आदर्शांनी प्रभावित झाला होता. त्यामुळे राजाने त्याला सोडून देण्याचा निर्णय घेतला, अर्थात... जर त्याने एका खूपच कठीण प्रश्नाचे उत्तर दिले तर. आर्थरकडे उत्तरावर विचार करण्यासाठी एक वर्ष होते.