Skip to main content

कडाई गोश्त

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 26/08/2012 03:11 या दिवशी प्रकाशित केले.
Kadai-Gosht
साहित्यः मटण १/२ किलो डालडा तुप २ डाव कांदे ४ नग टोमॅटो ४ नग मीठ चवीनुसार आलं ४ इंच काळीमिरी ७ ते ८ शाहिजीरं १ लहान चमच

वासंती भाटकर आणि स्त्री-मुक्ती

लेखक पैसा यांनी शनिवार, 25/08/2012 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच वर्षांपूर्वीची हकीकत आहे. तेव्हा मी प्राथमिक शाळेत जात होते आणि रत्नागिरीजवळच्या बसणी नावाच्या एका खेड्यात रहात होते. हे इतकं लहान खेडेगाव होतं, की रत्नागिरी फक्त ५ मैलांवर असून तिथे जायला थेट रस्ता नव्हता. मधे साखरतरची खूप मोठी खाडी होती. रत्नागिरीला जायचं तर आधी बैलगाडीने तरीपर्यंत जायचं, मग तरीने खाडी ओलांडायची आणि मग बस मिळायची. गावात दुपारी १२ वाजता वगैरे पेपर यायचा. म्हणजे महाराष्ट्र टाईम्स. सगळ्यात मोठी करमणूक म्हणजे रेडिओवरची खरखरत्या आवाजातली सुशील दोशीची कॉमेंट्री नाहीतर सिलोन रेडिओवरची बिनाका. त्यासाठी आम्ही बुधवार रात्रीची वाट बघायचो.

(आपले) स्वातंत्र्य, (इतरांचे) चारित्र्य आणि (तथाकथित) संस्कृती

लेखक रमताराम यांनी शनिवार, 25/08/2012 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच फेसबुकवर एका ग्रुपवर नटनट्यांच्या शिर्डीप्रेमाचा विषय निघाला होता. गप्पा तशा खेळीमेळीत चालू असताना अचानक एक नवा सदस्य अवतीर्ण झाला नि त्याने काही स्टेटस् टाकले ते वाचून अख्खा ग्रुप हादरला. एकदोघांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, स्त्री सदस्यांनी त्याच्या विधानाला तीव्र आक्षेप घेतला. परंतु महाराज अजिबात बधले नाहीत. एकामागून एक अशी तिरस्करणीय विधाने करणे चालू होते. यात त्यावर आक्षेप घेणार्‍या सदस्यांवर वैयक्तिक शेरेबाजीही चालू होती. सारा रोख स्त्रियांच्या - चित्रपटात काम करणार्‍या नट्यांच्या - चारित्राबद्दल होता. त्यांची विधाने आठवली तरी अंगावर शहारे येतात.

लबाड सभ्य

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 25/08/2012 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो.

<बद्ध लेखक>

लेखक लंबूटांग यांनी शनिवार, 25/08/2012 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा इवलं -इवलं ठावं रोज पाडी लेख उत्तरं सोपी कुणा देईचिना आपली ती तंगडी दरवेळी वरती किती पडलो तेही आठवेना टाकतो त्या जिलब्या, ज्ञानाचा देखावा रेग्युलरली जिणे काही झेपेचिना वेळेची ती त्यक्ती कामाचा कंटाळा डेडलाईनी काही केल्या चुकेचिना एकहार्ट पैसा काल रोब मरून सांगतोय काय नक्की कळेचिना अचाट अध्यात्म, पुचाट विचार जगतो ते लिहितो कोणा पटेचिना उपप्रतिसादी ओशट या जिलब्या लेख झाला जुना तरी संपेचिना वाचकाचा खात्मा, बद्ध हा लेखक आपटली डोकी, तरी थांबेचिना

अजि म्यां ब्रह्म ऐकिले........

लेखक बॅटमॅन यांनी शनिवार, 25/08/2012 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
पृष्ठप्रांगण अर्थात ब्याकग्रौंड : शुक्रवारी अर्थात २४ आगष्टास संध्याकाळी ६ वाजता केसरीवाड्यात प्रत्यक्ष लोकमान्य टिळकांचा आवाज असलेली ध्वनिफीत ऐकायला मिळणार आहे अशी बातमी ईईई सकाळात बुधवारी वाचली. मग म्हटले प्रत्यक्ष लोकमान्यांचा आवाज ऐकायला गेलेचि पाहिजे. गेलो मग केसरीवाड्यात. प्रसंग होता २१ सप्टेंबर १९१५ रोजी केसरीवाड्यातील गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या एका गायन समारंभाचा. बालगंधर्व, भास्करबुवा बखले आणि मास्तर कृष्णराव असे एकसे एक डॉन डॉन लोक बोलावले होते, लै गर्दी जमली होती.

कविता आणि स्तोत्रांची आवड

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 24/08/2012 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचे पुस्तक किंवा कवितेचा एखादा ब्लॉग वाचणे हा माझ्याकरता नितांतसुंदर अनुभव असतो. लहानपणी केव्हा या आनंदाची गोडी लागली ते आठवत नाही पण एक पक्के लक्षात आहे - गणितातील प्रमेय सोडविल्यावर झालेल्या शब्दातीत आनंदाची तुलना आतापर्यंत फक्त एकाच आनंदाने झाली आणि ती म्हणजे "कवितेतील सौंदर्यस्थळ" अचानक गवसणे. खरोखर अंतःस्फुरणाने उतरलेली प्रत्येक कविता ही वाचकाच्या मनाशी सूक्ष्म संवाद साधते याबद्दल मला यत्किंचीतही संदेह नाही.

(गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व)

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 24/08/2012 13:53 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा - http://misalpav.com/node/22536 ही रचना) तर्ककुतर्की खंडनमंडन अभिनिवेशी मतप्रतिपादन चिल्लरसांख्यी बथ्थडगोडी सूज्ञजनांचे अरण्यरूदन छद्मसाधुत्व अतिबोभाटा गुरूपदप्राप्ती आटापीटा आंजासंस्थळ फुकटचव्हाटा सद्वस्तुप्राप्ती घडेना घंटा! निराकाराची धुंद समाधी भ्रांतप्रचिती वृथाउपाधी चित्तदशेची भगेंद्रव्याधी भक्ती साधी, भक्ती साधी .... तळटीपा: साधी - सरळ, सोप्पी, सुसाध्य
काव्यरस

संस्कार

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 24/08/2012 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवा घडलेल्या एका प्रसंगानं डोक्यात ठाण मांडून ठेवलंय. त्यानंतर दररोज तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय म्हणून तुमच्यासमोर मांडतोय. बिल्डिंगमधून मी, माझा ८ वर्षाचा मुलगा आणि त्याची आजी असे बाहेर पडत होतो. मुलगा नेहमीप्रमाणे धावत सर्वात पुढे होता. बाहेर आल्या आल्या त्याला वर्तमान पत्रातून येणारी पत्रकं असतात तसला एक कागद (इथल्याच कुठल्यातरी बिजनेसच्या जाहिरातीचा) पडलेला दिसला. त्याने तो उचलला. मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अंगावर ओरडलो "जमिनीवरचा कचरा कशा उचलतोस?" त्याची आज्जीपण त्याला समजावत म्हणाली "अरे असं जमिनीवर पडलेले कागद तू कशाला उचलतोस?