Skip to main content

असतेस घरी तू जेव्हा.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 03/11/2012 13:37 या दिवशी प्रकाशित केले.
(संदीप सलील यांची माफी मागून सगळ्या हतबल पुरुषांसाठी नवीन स्त्रीसूक्त) असतेस घरी तू जेव्हा... जीव उंदराएवढा होतो..... कुत्रं लागल्यागत मागे... मी इकडे तिकडे पळतो.... भूत पाहून बोबडी वळावी बर्फाळ तसा मी होतो... तुझी नजरच खलास करते.. अन देहच आडवा होतो........ येतात शेजारी दारापाशी.... उत्साहाने उजळती तोंडे........ कुणी हळूच डोकावले घरी.... तर त्यालाही प्रसाद मिळतो.... तव भीतीत थरथरणार्या... मज स्मरती हजार वेळा........ मार खाऊनच बाहेर पडावे... हा असाच शेवट होतो..... तू संग सखे मज काय मम गुन्हाच नक्की कसला? आयुष्याचा हा एक त्रास न कळेना कधी हा संपतो?? जरी झालो तुझाच नवरा ना शूर मी अजुनी झ
काव्यरस

पाकी शेरनी!

लेखक हुप्प्या यांनी शनिवार, 03/11/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
पाकिस्तानातील एक पत्रकार, विचारवंत महिला मारवी सरमद ह्यांची ही एक झलक पहा http://www.youtube.com/watch?v=ZdLvNH_BkRk अजूनही अनेक उदाहरणे सापडतील. एकंदरीत पाकिस्तानात मुसलमानांप्रमाणेच हिंदू, ख्रिस्ती, बौद्ध, शिया, अहमदी हे बरोबरीचे नागरिक आहे हा मुद्दा अगदी आक्रमकतेने मांडणारी एक महिला. पाकिस्तानवरचा इस्लामी पगडा कमी करण्याकरता आपल्या परीने निर्भय प्रयत्न करणारी एक महिला विचारवंत.

शाहू मोडकांशी वार्तालाप- एक आठवण

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 03/11/2012 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
शाहू मोडकांशी वार्तालाप पुण्यात सुभाषनगर मधून चाललो होतो तेवढ्यात एक जुन्या पिढीतले वयस्कर गृहस्थ भेटले. अशीच ज्योतिषाच्या सर्व्हेनिमित्त ओळख. "तुम्ही परवा शाहू मोडकांच्या व्याख्यानाला आला होतात का? " मी नाही म्हणालो. मुंबईत होतो मी. " फार सुंदर झाले व्याख्या्न. काय गाढा व्यासंग! त्यांनी बोलाव आणि महाभारतातल्या श्रीकृष्णाने ऐकावं. ज्योतिषशास्त्राचं फार चांगलं विवेचन केलं. अध्यात्माची जोड हवीच तरच ते ज्योतिषशास्त्र. तुम्ही भेटा की मुंबईत. शिवाजी पार्कला राहतात. " मी नाही म्हणलं तरी भारावून गेलो. " हं आणि फोनवर अपॉइंटमेंट घ्या.

पराभव...

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शनिवार, 03/11/2012 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी जेव्हा उभा रहातो स्वतः विरुद्ध लढायला.. तेव्हा लक्षावधी विचारांच्या झुंडीच्या झुंडी घेरतात मला निमिषार्धात.. मी एकटा केविलवाणा दुर्बल.. सुळावर चढवलं जातय मला... विचारांचा एक एक बोचरा खीळा ठोकला जातोय माझ्या मेंदुत हृदयात, शरीराच्या प्रत्येक संवेदनशील भागावर प्रचंड अत्याचार...!!

मुली आणि आम्ही

लेखक वडापाव यांनी शुक्रवार, 02/11/2012 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आमच्या कॉलनीमागल्या मोठ्या रस्त्यावरच्या बसस्टॉपवर मी वाट बघत बसलो होतो. आता, बस स्टॉपवर बसचीच वाट बघता येते, असं नाही. मी कॉलेजवरून लवकर परतलो असल्याने तिथे येऊन बसलो होतो. ज्या मुलीची वाट बघत होतो, ती माझी मैत्रीण तयार व्हायला इतका काही वेळ लावते, की काही विचारू नका. वास्तवीक सकाळी अकराच्या सुमारास मोकळ्या रस्त्यावरून फेरफटका मारायला काय मोठी एवढी तयारी करावी लागते ते तिचे तिला ठाऊक. या मुली नेहमीच एवढा वेळ लावतात. मग त्यांना अगदी शिकवणीला जायचं असलं, तरी त्यांना निदान पाऊण तास आधीपासून तरी तयारी करावी लागते म्हणे.

अभिशाप जीवनाचा

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 02/11/2012 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
(गुलाम अली यांनी गायलेल्या 'जिंदगी को उदास कर भी गया' या गझलचा स्वैर भावानुवाद) आला ॠतू अनामिक, अवचित निघून गेला जगणे उदासवाणे, माझे करून गेला नशिबी वियोग आला, सार्‍या सवंगड्यांचा अश्रू उरात झरले, जडशीळ देह झाला हुलकावूनीच गेले, दुष्प्राप्य ध्येय होते चुकता दिशा जराशी, साथी विभक्त झाला मृत्यू समोर अंती, सपशेल हार झाली निर्जीव चेहरा ही, पुरता विदीर्ण झाला दुवा: www.youtube.com/watch?v=uEai_rz4s84
काव्यरस

मसाला मसूर डाळ

लेखक प्रियाकूल यांनी शुक्रवार, 02/11/2012 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
अख्खी मसूर डाळ ५-६ तास भिजवून ठेवा. त्याला मोड आणले तरी चालतील. नंतर ते कोरडे करून घ्या.एका काढीत तेल गरम करून त्यात मसूर तळून घ्या.दाणे दाबून पहा. क्रिस्पी झाले कि काढा.लगेच काळ मीठ आणि जिरेपूड लावून घ्या.प्रत्येक वेळी डाळ तळून काढली कि मीठ आणि जिरपूड लावून घ्या. तरच मीठ आणि जिरेपूड सगळीकडे लागते.आवडत असल्यास तिखट पण घालता येईल .मसाला मसूर डाळ तयार.झटपट अन खमंग.हि डाळ चिवडा,भेळ मध्ये छान लागते. तळताना तेल उडते तेव्हा जरा जपूनच तळा.:)

पांढर्‍या हत्तीच्या हट्टापाई आणखी पांढरा हत्ती!

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 02/11/2012 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या लाडक्या (सुदैवाने आता माजी) राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचे नवे प्रकरण! आपल्या गावच्या, अमरावतीच्या विकासाकरता खास हट्ट करून त्यांनी एक नवी गाडी सुरु केली जी अमरावती ते नागपूर अशी धावते. कागदोपत्री सर्वोच्च असणार्‍या पदावरील व्यक्तीचा हट्ट म्हणू रेल्वे मंत्रालयाने तो पुरवला खरा. पण तो चांगलाच तोट्यात चालतो आहे. मिळकतीच्या अंदाजाच्या जेमतेम ४ टक्के पैसे मिळत आहेत! प्रतिभाताईंनी आपली सुमार कारकीर्द निव्वळ अशिष्ट, वाईट गोष्टींकरताच चर्चेत येईल ही गोष्ट कटाक्षाने पाळली आहे असे दिसते आहे.

वाधल्या दाढी-मिश्या

लेखक खान यांनी गुरुवार, 01/11/2012 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कर मन्दलि, मी तसा मिसल्पवव्र नविनच अहे, पन बरेच वर्षान्पसोन मिसल्पव वाच्तोय. इथ्ले निर्निरल्य विश्यन्वर्चे सम्रुद्ध लिखन वचुन आपनहि काहि लिहाव या विचारने सदस्य झलो. कय लिहव, कह्शवर लिहव, यच विचर कर्तकर्त आततच मुखप्रुश्तआवर हई कवित वाच्ली, आनि ति वचून मलाहि काहि ओळी स्फुरल्या त्या इथे देत आहे.
काव्यरस