Skip to main content

आमच्या गावातील एक आश्चर्य

लेखक मंदार कात्रे यांनी रविवार, 28/10/2012 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे . लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली. पण गणितात मात्र प्रचंड हुशार!

अरे माझ्या देवा... Oh My God..

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
ओह माय गॉड.. अरे देवा ... असे आपण कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी, कितीतरी गोष्टीत सतत वापरत असतो. आता या मागील किंतु, हेतू, परंतु हा विविधांगी, माणसानुरूप, कालानुरूप बदलत असतो, हा भाग निराळा. अमुक काही झालं , कि हे देवा, अस्सं झालंच कसं? काय करणार देवाची करणी.. याच देवाच्या करणीवर आक्षेप घेणारा असा अभिनय मांडलाय 'परेश रावल' यांनी वरील "ओह माय गॉड" या चित्रपटात. उत्तम सादरीकरण, दिग्दर्शन, सर्वांचा आपापल्या वाटेला अभिनय. पण मूळ खांब म्हणजे परेश रावल. देवाची भूमिका साकारलीय दस्तुरखुद्द 'अक्की" म्हणजे आपला अक्षय कुमार याने. तर हि कथा एक हिंदी नाटक " किशन वि.

उद्रेक भीषण स्फोटाचा

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
उद्रेक भीषण स्फोटाचा (१६-जुल-२०११) -- पण भावनांचा कधी होणार मुंबई अमुची पुन्हा हादरली ? (प्रत्येकाच्या मनात आज हा प्रश्न नसून उद्गार बनले आहेत). प्रत्येक मुंबईकराच्या मनात हा प्रश्न आणि त्याच नेहमीच 'टिपीकल' उत्तर, आता 'कॉमन' होऊ लागलं आहे. आता हें 'कॉमन' का होत चाललंय? हें तुमच्या सारख्या सुज्ञास सांगायची गरज नको. मुंबईकर खरोखरच निगरगट्ट, कोरडे, कोडगे होत चालले आहेत का ? त्यांच्या भावना मृत चालल्या किंवा मेल्या आहेत का ? स्फोट झाला ? कुठे? कधी? कसा ?, असा आहे का, ठीक आहे. मुंबई पुन्हा लागली आपल्या कामावर दुसऱ्या दिवशी !

बाप्पा मोरया रे

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे चरणी ठेवीन हो माथा....(असली गाणी ऐकायला मिळाली की समजावं बाप्पा येतोय हो लवकरच) गणेश चतुर्थी जवळ आली की सर्व वातावरण कसं आनंदाने भरून जातं. सगळीकडे ही लगबग सुरु होते पहा. मग सर्वांना मनापासून म्हणावसं वाटत, "आला पहा माझा तो श्री गणेशा, सा-यांचा तारणहार तूच प्रथमेशा; चाहूल लागली तुझी गजवदना, लगबग झाली सुरु तुझ्या रे स्वागता". (सौजन्य: "आमोद - एक आनंद कल्लोळ", के डी.) मग मखरापासून सुरुवात ते अगदी सजावटीतल्या एखाद्या डोंगराच्या शिखरापर्यंत, नुसता आनंदाचा कल्लोळ माजतो, हें पाहून सुखद वाटत. देवासाठी काय करू अन काय काय करू, असं सर्व गृहिणींना वाटत.

लोकल पारायण

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवसाला देव पावतो तसं अक्षरशः आजकाल देवा पाव रे आणि मला ती अमुक लोकल वेळेवर मिळू दे रे बाबा. मुळात लोकलमध्ये चढलो म्हणजे तू पावलास नाहीतर तुझी अवकृपा का रे देवा !, असं काहीसा झालय माणसांच इथल्या. मुंबई, चाकरमान्यांची राजधानी म्हणावी. जो लोंढा येतो तो इथेच. अरे अरे कुठे चाललास रे ! कुठे म्हणजे काय मम्बयीला रे. का हो कहा जात हो, अरे गुड बख्त बम्बई नाही मालूम का, हम उहा जात हे . सर्रास हे आजकाल कानी पडतं, वृत्तपत्रात वाचायला मिळतं, टी.व्ही वर पाहायला मिळतं.

संधिप्रकाश आणि सांजवेळ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 27/10/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातल्या २४ तासात आपण काय काय करत असतो......पोटापाण्याच्या सोयीसाठी नोकरी....विद्यार्थीदशेत शिक्षण.....माणूस तोच असला तरी प्रत्येक क्षणाला त्याचे रूप बदलत असते.

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ : उज्जैन –बजरंग गड – शिवपुरी

लेखक सारथी यांनी शनिवार, 27/10/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952 “ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967 “ पुणे ते पानिपत ” भाग ३ : असीरगढ - ओंकारेश्वर – रावरखेडी : http://www.misalpav.com/node/22988 सहावा दिवस : ०८ जानेवारी २०१२ उज्जैन – शाजापूर – सारंगपूर – ब्यावरा नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता मोहीम निघाली.

खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

लेखक अनघा आपटे यांनी शनिवार, 27/10/2012 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही आऊचा काऊ तो ह्याचा मावसभाऊ असतो पण त्याच्याबद्दल याला काहीच माहित नसतं सांगायला जावे तर ह्याचे लक्षच नाही आणि तरी म्हणे आम्हा बायकांनाच काही कळत नाही सकाळी तास न तास वाची पेपर एवढे काय वाचतो तेच मला कळत नाही गहू तेलाचे भाव मात्र याला कधी माहित नाहीत आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही पाठवावे याला कधी भाजीबाजारात घेऊन यावा ह्याने ढीगभर शेपू अन कांद्याची पात घरातल्यांच्या आवडी निवडी याला ठाऊक नाहीत आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही रात्र रात्र जागून पाहतो टी.व्ही. axn स्टार स्पोर्ट्स आणि स्टार मुव्ही सारखी तीच हाणामारी बघून कंटाळा क

सातकापी वड्या

लेखक अनघा आपटे यांनी शनिवार, 27/10/2012 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ वाटी दूध, १ वाटी दही, १ वाटी तूप, २ वाट्या हरबरयाच्या डाळीचे पीठ, एक वाटी साखर, १ वाटी पिठी साखर कृती: प्रथम एक जाड बुडाच्या कढईत पिठीसाखर सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून मध्यम आचेवर ढवळत राहावे. काहीवेळाने मिश्रण कडेने सुटू लागेल. त्यानंतर कढई खाली उतरवावी. मिश्रण चांगले घोटून घ्यावे. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा एकदा चांगले ढवळून घावे. आता मिश्रण घट्ट होऊ लागेल. वड्यांच्या ट्रे ला तुपाचा हात फिरवून घ्यावा आणि त्यात हे घट्ट झालेले मिश्रण थापावे. वरून मनाप्रमाणे बदाम, चारोळी, पिस्ते याने सजावट करावी. थोड्या गार झाल्यावर वड्या कापाव्यात.