Skip to main content

पुन्हा एक पी आय ए अपहरण

लेखक लाल टोपी यांनी सोमवार, 08/04/2013 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
पी आय ए- पी के ३२६ अपहरणाचे प्रकरण आपण काही दिवसांपुर्वी वाचले असेलच आज पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच आणखी एका विमान अपहरणाची कथा पाहू. पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच घटनेची चर्चा करण्याचे कारण ही घटना वेगळ्या परीस्थितीत घडते आहे आणि तीला अतिशय वेगळ्या प्रकाराने हाताळले गेले आहे. २५ मे, १९९८ रविवारची संध्याकाळ, सुमारे ५.३० वाजता गदर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पी.के. ५४४ या विमानाने कराचीच्या दिशेने उड्डाण केले. पुढील १० मिनिटांत या विमानीतील तीन अपहरणकर्त्यांनी विमानावर ताबा मिळवला आणि विमान नवी दिल्लीकडे घेऊन जाण्यास फर्मावले.

सैर भैर

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 07/04/2013 14:48 या दिवशी प्रकाशित केले.
हि १९९१ सालची गोष्ट आहे मी डॉकयार्ड दवाखान्यात रात्रीच्या तातडीच्या सेवा विभागात कामावर(ड्युटी) वर होतो याचा एक भाग म्हणून आय एन एस आंग्रे मध्ये असलेल्या नौदल पोलिसांच्या कोठडीला भेट देऊन तेथे असलेल्या कच्च्या कैदेतल्या सैनिकांची तपासणी करणे हा होता. अशा तपासणीच्या वेळी मी हटकून प्रत्येक सैनिकास का अटक झाली आहे? काय परिस्थितीत ते झाले आहे याची शहानिशा करीत असे.( मनोविकार शास्त्रात काम केल्यामुळे मला त्यात जर जास्त रस होता). असे त्या कोठडीतील सैनिक पाहत असताना एक संभाजी माने( किंवा जाधव असेल )वय २५ वर्षे या सैनिकासमोर आलो.

दादांना झालय तरी काय???

लेखक वेताळ यांनी रविवार, 07/04/2013 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते श्री. अजितराव(दादा) पवार ह्यांनी आज सकाळी इंदापुर येथिल निबोंडी गावी झालेल्या सभेत एकदम वन्टास फुल्टु झालेल्या माणसासारखे भाषण केले. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली. त्यानी लाईट येत नसलेमुळे लोक मनोरंजन म्हणुन पोर जन्माला घालतात हाही शोध मांडला आहे. ह्या बाबत सविस्तर वृत मटा मध्ये आले आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19425252.cms अजितदादाना मुख्यमंत्री व्हायचे आहे,तिकडे युवराजाना पंतप्रधान व्हायचे आहे.

संमोहरमल

लेखक अज्ञातकुल यांनी रविवार, 07/04/2013 10:50 या दिवशी प्रकाशित केले.
भोर प्रभाती चंद्रकोर कोकीळ शीळ अन मनकवडी हळुवार स्पर्श झुळुकेचा लाघव पक्षांची लाडी गोडी गूढ साद अवती भवताली क्षितिजावर लाली थोडी पर्णफुलांवर वसंत सण अंगणभर जगणारी कोडी नील सरोवर प्रतिबिंबाविण थांग न त्या खोली वेडी मेघ ढाळतो ऋतू तयातुन जीवन हसण्याची नाडी मन हृदयी स्वप्ने जरतारी कुणी तरी नकळत धाडी व्योम प्राणमय लयलाटेवर सुख दु:खे कडवी जोडी काठ किनारे शब्दांचे रसरंग क्षणांच्या कावेडी पाऊलठसे संमोहरमल मृगजळी तरंगे तन होडी .....................अज्ञात
काव्यरस

॥ पगाराचा दिवस॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी रविवार, 07/04/2013 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल अगदी बर होत हातात पगार मिळत होता किती मिळाला पगार तिथल्या तिथ कळत होता पगाराचा दिवस तो सर्वांनाच प्यारा होता हातात पगार घेण्याचा आनंदच न्यारा होता पगाराच्या दिवशी दांडीबहाद्दर पण यायचे पगाराच्या रांगेमध्ये पुढे ऊभे रहायचे बायको पण विचारायची झाला का हो पगार? आणला आहे घरी की खेळलात सर्व जुगार मुलांना खाऊ आणायची हौस तुमची फिटली स्वतःसाठी मात्र आणली असेल बाटली आता मात्र तसे नाही ईसीएसने पगार जातो आपापल्या बँकेत खात्यावरती जमा होतो कधी जातो कधी घेतो ते पण कळत नाही हातात पगार घेण्याचे समाधान मिळत नाही

छायाचित्रण भाग २. कॅमेर्‍यांचे प्रकार

लेखक एस यांनी रविवार, 07/04/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे लेख - कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
कॅमेर्‍यांच्या रचनेतील चौकटीचे महत्त्व
आधुनिक कॅमेरे आणि त्यांचे खापरखापरखापरपूर्वज यांच्यात आज जमीनअस्मानाचा फरक दिसून येत असला तरी आजही छायाचित्रणाचे आणि पर्यायाने कॅमेर्‍यामागचे तत्त्व तेच राहिले आहे. आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे, कॅमेरा ऑब्स्क्युरा (Camera Obscura) हा सर्व कॅमेर्‍यांचा पूर्वज मानला जातो.

नवा जिल्बिवाला

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 07/04/2013 00:44 या दिवशी प्रकाशित केले.

समस्त अभ्यागत नवं तांब्याधारकांस कढई सह समर-पीत

:-p ब्लॉग माझा आहे तिथे, पीठही आहे भरपुर तिकडुन भरुन तांब्या इथे, जिलब्या तळिन चुरचुर नवि कढई दिसता माझे,हात लगेच उठतात तेल गरम असो/नसो,पटपट तांब्या फिरवतात. जरि काढल्या जिलब्यांवरती,फिरु लागल्या माश्या मी म्हणेन,''बघा की नुस्त,का वाजवता ताशा?'' मला(हि) लेखक/कवि व्हायचय,तांब्या जरा फिरवु द्या अखिल जिलबि पाडक संघाचं,राष्ट्रीय संमेलन भरवु द्या एकाच दिवशी टाकेन मी,दोन दोन पराती जिलब्या मि.पा. वरच्या प्रत्येक स्टॉलवर म्हणिन मी, ''मलाच घ्या'' नंतर मी पळुन जाइन,घेऊन माझा तांब्या... पळता पळता मनात म्हणिन,कुठं शिरलावतास रे ठोंब्या?
काव्यरस

मुंब्रा एक प्रतिक्रिया – दोन क्षणिका

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 06/04/2013 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीचेच आहे, दिल्ली असो वा मुंबई , अनिधीकृत बांधकामे होतात, इमारती पडतात, नेता- अधिकारी इत्यादी अश्रु ढाळतात - त्यांना पाहून मला काय वाटते मगर प्रेतांच्या ढिगार्‍यावर तो नोटा मोजत होता. कधी-कधी मगर हा अश्रु ही ढाळीत होता. मुंबईचे मृगजळ मुंबईच्या मृगजळात त्याला स्वप्नांची जागा भेटली. त्यास का माहिती ती त्याची कब्र होती.

दोन माता

लेखक राजा सोव्नी यांनी शनिवार, 06/04/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
माती आणि माता दोघिहि समान, माती अंकरुनी देई वन,धान्या , माता अंकरुनी देई पुत्र,कन्या, माती देई दऱ्या ,डोंगरा आकार, माता देई पुत्र,कन्या संस्कार , माती आणि माता यास समान द्या मान , दिल्याने मान जगती वाढेल आपुली शान.
काव्यरस

संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 06/04/2013 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
'पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल. ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे.