Skip to main content

Train To DAHANU

लेखक नावात्_काय्_आहे यांनी सोमवार, 22/04/2013 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
चायना मध्ये १ म्हण आहे , तशी ती चायनीज मध्ये आहे पण मराठीतच सांगतो . १० किलोमीटर फिरा किंवा १००० पुस्तक वाचा . तसं हे जर खरं मानलं तर आम्हाला इंजिनिरिंगमध्ये केटी नसती लागली .कारण भटकण्यात आमची ४ वर्ष गेली . हे कॉलेज मध्ये फिरणं किंवा फिरवण ,यामुळे भले हि ५% १०% कमी का पडले असेना .. :-) अक्कल मात्र आली नि पाझाळली पण . असो, १२ फेब्रूवारी , मोठ्या भावाच्या सासुरवाडीहून फोन आला , भावाच्या साल्याचा ( शिवी नाही आहे ;-) साला म्हणजे बायकोचा भाऊ ) साखरपुडा होता . तसं आधुनिक युगातले कुटुंब त्याला engagement म्हणतात .पण मी त्याला entertainment म्हणूनच पाहतो .( no offense please ) .

शिलाहारांचा कोप्पेश्वर-भाग ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 22/04/2013 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ ९०० वर्षे झाली हे देऊळ निसर्गाशी संघर्ष करत उभे आहे. उन, पाऊस, वारा, तापमानाचे चढउतार या सगळ्याशी टक्कर देत या देवळाचा गाभा (स्ट्रक्चर) अजुनही सुस्थितीत आहे. त्याचे आरेखन ज्या वास्तुविशारदाने केले आहे आहे त्याला मानावेच लागेल. ९०० वर्षात हे देऊळ गळत नाही ना कृष्णेच्या पाण्याने याला काही झाले.

भारत म्हणजे काय?

लेखक दासबोध.कॊम यांनी सोमवार, 22/04/2013 16:46 या दिवशी प्रकाशित केले.
-पू. संभाजीराव भिडे गुरुजी यांचे व्याख्यानाचा सारांश आज आपला स्वातंत्र्यदिन आहे पण भारतमाता मात्र पूर्ण स्वतंत्र नाही आहे; पण जेवढे स्वतंत्र आहोत त्याचा आनंद आहे पण आपल्या अंतःकरणात दुःख पाहिजे कि सिंधू स्वतंत्र नाहीये, तिबेट आपल्यापासून हरवलेला आहे, नेपाळ, अफगाणिस्तान, ब्रम्हदेश गमावलेला आहे, लंका आपली नाही याबाबत थोडा इतिहास सांगतो तुम्हाला " ज्याला आपण भारत म्हणतो त्या देशाचे नाव 'भारतवर्ष', 'आर्यवर्त' अशी नावे रूढ आहेत" आपली एक फार मोठी चुकीची समजूत आहे कि आपली इतिहासाची पुस्तके म्हणजे काही तरी भाकड साहित्य आहे.

बरसाली...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 22/04/2013 15:49 या दिवशी प्रकाशित केले.
बरसाली.. इटारसी नागपूर मार्गावरील एक लहानसं स्थानक. या स्थानकाला मुंबै-दिल्लीची ऐट नाही की तसा बडेजाव नाही. परंतु येथील विलक्षण निवांतपणा आणि अगदी नीरव शांतता मन मोहून टाकते.. सभोवताली अगदी भरपूर, नजर जाईस्तोवर हिरवागार झाडझरोरा.. झाडं अगदी फलाटावर आलेली. किंबहुना, झाडीतूनच थोडी साफसफाई करून स्थानक उभारलं आहे असं म्हणूया.. दिवसाकाठी एखाद-दुसरी पाशिंजर थांबेल तेवढीच काय ती जाग.. एरवी अगदी निसर्गरम्य नीरव शांतता.. barasaalii एफ वाय-एस वाय, किंवा फार तर टी वाय चं वय असावं..

फिर्याद

लेखक चाणक्य यांनी सोमवार, 22/04/2013 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
ही पुन्हा हवा आज, धुंदकुंद झाली ही पुन्हा मला आज, तुझी याद आली घनांचे पुरेपूर बरसून झाले आता कोण आसवांना, अवेळी साद घाली तु दिलास ना दगा, वाटते जगाला तुला ठाव स्वप्ने, कुणाची बरबाद झाली मी न कधी घेतले, नाव तुझे कोणापुढे दोन शब्द लिहिले, हाय ती फिर्याद झाली लपविले सदा मी, पाय भेगाळले माझे वाटले जगास माझी, चाल सुखात झाली ईतक्यात त्यांना माझे, एवढे रडू आले आता कुठे सांगण्यास, माझी सुरुवात झाली
काव्यरस

॥स्तवन धरणीमातेचे ॥

लेखक Bhagwanta Wayal यांनी सोमवार, 22/04/2013 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीदिनानिमित्त धरणीमातेचे स्तवन पाण्यापासुन निर्माण झाली । पंचभूते ही तिच्यात आली । शेषनागाने भार वाहिला । नमस्कार माझा धरणीमातेला । एक भाग भूमी तीन भाग पाणी । तिच्या अंतरी नवरत्न खाणी । सप्तसागराचा वेढा जियेला । नमस्कार माझा धरणीमातेला । सूर्याभोवती स्वतः फिरते । म्हणोन दिवस रात्र होते । स्नानसंद्यादी कर्म करण्याला । नमस्कार माझा धरणीमातेला । गिरी शिखरे पर्वत रांगा । गंगा यमुना भिमा चंद्र्भागा । भारत खंड पवित्र केला । नमस्कार माझा धरणीमातेला । उत्तम बीजे सुपिक माती । अन्न धान्य ही विपुल होती । जीवन देते सकळ विश्वाला । नमस्कार माझा धरणीमातेला । कितेक धातु लहान मोठे । तेलाचेही अनंत साठे

वसईच्या घंटेचा शोध

लेखक सुज्ञ माणुस यांनी सोमवार, 22/04/2013 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
वसईचा किल्ला (Vasai Fort) आजकाल जरा वेगळेच वेड लागले आहे. ट्रेक ला जाताना त्याचा पूर्ण गृहपाठ करायचा, म्हणजे इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्यात वर्णन केलेल्या ( आणि जादातर न केलेल्या) गोष्टींचा ठावठिकाणा शोधत हिंडत फिरायचे. मग अश्या वेळेस ठिकाण,अंतर, ऊन, इतर लोक ( आणि थोड्या फार प्रमाणात खर्च) या कशाचेही भान राहत नाही. छोटेसे उदाहरण देतो, मागील खेपेस भीमाशंकर ला गेलो होतो. इसवी सन चौदाशे सालच्या मंदिराची पूर्ण पाहणी केल्यानंतर त्याचे अजून डिटेल मिळवण्यासाठी हम्पी ला जायचा प्लान झाला.

आषाढी

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 22/04/2013 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
दाट दाटल्या जुन्या मैफिली काळ थांबला नाही शरिर जाहले जीर्ण मनी साचल्या सावल्या कांही बोल अबोलच आणि चाहुली पंख मिटून विदेही टिपुर चांदणे चंद्राविण नभ अवसेचे संदेही रूक्ष तरी शीतल वाटे एकांत दिशांना दाही छाया पडछाया माळावर वृक्ष जरी न तिथेही कोण सोसते पोसते सुखे घाव झेलते देही आभाळ अंबरी आषाढी माया ममता कविता ही ..............................अज्ञात
काव्यरस

वसंत ऋतू आला -

लेखक विदेश यांनी सोमवार, 22/04/2013 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी तू ओले केस फटकारत असताना आरसाच दिमाखात असतो पुडीतून हळूच डोकावणारा मोगरा प्रसन्न हसत असतो स्वत:शीच मान डोलावत खिडकीतून डोकावणारी अबोली काहीतरी पुटपुटत असते मनातल्या मनांत छानसे मिठी मारल्यागत लाजाळू तुझी पाठ पहात खुदकन लाजलेले असते आरशासमोर दोन गुलाब उमलत चाललेले मला दुरूनही दिसतात ओठावरचे निसर्गदत्त डाळिंबाचे दाणे पिळवटून ओठावर पसरायला पहातात दोन भुवयांच्या कमानीत जास्वन्दीचा लालभडक ठिपका विराजमान होत असतो पावडरच्या कणाकणात जाईजुईचा मंद सुगंध अहाहा, चेहऱ्यावर पसरतो हिरव्या साडीचोळीतले अनोखे रूप मनाची घालमेल वाढवते माझ्या कवितेतला वसंत बहरलेला असतो उन
काव्यरस

शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-२

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 21/04/2013 19:33 या दिवशी प्रकाशित केले.
शिलाहारांचे कोप्पेश्वर मंदीर......भाग-१ सिंघण यादवाने देवेगिरीला गेल्यावर शिलाहारांचे राज्य आपल्या राज्याला जोडले. सिंघण यादवांच्या काही शिलालेखात सर्परुपी भोजाला गरुडाने म्हणजे सिंघणाने पकडले असा उल्लेख आहे. त्याने कोपेश्वरच्या देवळाच्या चरितार्थाची सोय लावली मात्र ते पूर्ण करण्यास आर्थिक मदत केली नाही व ते बांधकाम अर्धवट पडले. नंतरच्या काळात केव्हातरी स्थानिक जनतेने देवळावर शिखर उभे केले पण ते मूळ देवळाशी अत्यंत विसंगत दिसते. पण एवढे काही वाईट नाही.