मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भविष्य......

मुक्त विहारि ·
"अरे, मी काय म्हणतो.उद्या मला यायला काही जमणार नाही" "कारे" "उद्या, काही मंडळी, भविष्य जाणून घ्यायला येणार आहेत.आता आपण म्हणजे काय? एक नंबरचे ज्योतिषी." "बरं ठीक आहे.ती तर रात्री येणार नाहीत ना?मग आपल्या कार्यक्रमांत खंड नको.मी असेनच इथे." "तरी पण जमणार नाही.कारण उद्या आपले आय.पी.एल. नाही का? उद्या आपले महाराज खेळणार बघ.आपले भविष्य काय वाया जाणार नाही.बेट लावतो का?" "ओ.के. तू बघ आय.पी.एल. मी आपला एल.पी. झिंदाबाद." -------- "काय रे!

प्रमोशन

vikramaditya ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आनंद आपल्या कॅबिनमध्ये शिरला आणि एसीची थंड हवा खात शांत बसुन राहिला. आज तो ऑफ़िसमध्ये जरा लवकरच आला होता. समोरच्या कागदांची त्याने चाळवाचाळव केली. पण त्यात त्याचे लक्ष नव्हते. तो एका खास फोनची वाट बघत होता. घड्याळाचा काटा जसा जसा पुढे सरकु लागला तसा तो बेचैन झाला. अखेर त्याचा फोन वाजला. अमेरिकेहुन बॉबचा फोन होता. "ॲन्डी?" " येस, बॉब, थॅंक्स बॉब. शुअर बॉब." त्याने फोन ठेवला आणि टेबलावर जोरात हाथ आपटला. "येस्स, आय मेड इट!" त्याने लगेच पुजाला फोन लावला. "पुजा, इट्स थ्रु" "कॉंग्रॅटस" पुजा जवळ जवळ ओरडलीच.

व्यक्त : कारण आणि परिणाम

वडापाव ·
लेखनप्रकार
माणसाचं शरीर हा एक भव्य कारखाना आहे. या कारखान्यात बाहेरून कच्चा माल मागवला जातो, जो श्वासाच्या, अन्नाच्या, आणि कुठल्याही प्रकारच्या अनुभवाच्या रूपाने येतो. त्यावर प्रक्रिया होते. अन्नाचं पचन होतं. श्वास मंदज्वलनासाठी ऒक्सिजन पुरवतो. आणि अनुभवावर बेतलेली विचारप्रक्रिया मनात सुरू होते. या प्रक्रियांच्या अंताला आपल्या शरीराकडे बरीच उत्पादनं तयार झालेली असतात. काही वापरण्यासाठी, म्हणजे कृती करण्यासाठी; तर काही उत्सर्जित करण्यासाठी - ज्यांना आपण टाकाऊ म्हणतो. पण खरंच ती टाकाऊ असतात का? टाकाऊ म्हणजे नेमकी कुठल्या प्रकारची उत्पादनं असतात ही?

आदि कैलास,ओमपर्वतदर्शन आणि पार्वती सरोवर परिक्रमा.भाग-७

खुशि ·
सहावा दिवस. गालागढ ते बुधी. २२ किमी. उंची १०६०० फूट. आजही कालच्याप्रमाणेच नाश्त्याचे पार्सल घेऊन प्रस्थान ठेवले. आज हवा कुंद होती, ढगाळ वातावरण होते. पण निसर्ग इतका सुंदर की त्रास अजिबात वाटत नव्हता. थोड्याच वेळात त्या सुप्रसिद्ध ४४४४ खडांज्या समोर ठाकल्या. सुरुवातीला छोट्या टेकडीवर एक सुबकसे मंदिर होते. दर्शन घेतले. तिथे एक गंमत दिसली. देवळाच्या मागच्या बाजूला एका उंचवट्यावर दोन खांबांना एक आडवी तुळई बांधलेली होती आणि तिला मोठी घंटा टांगली होती. तिचे प्रयोजन समजले नाही. कदाचित गावकर्‍यांशी संपर्क साधण्यासाठी ती योजना असावी. खडांज्या उतरायला सुरुवात केली. मोठे कठीण होते ते उतरणे!

भविष्य (शतशब्दकथा)

खेडूत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
''गेली साडेचार वर्षं तुम्ही आमच्या वाहिनीवर साप्ताहिक भविष्य सांगितलेत. अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम होता- टीआरपी पण मस्तच ! पण म्हणतात ना , प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. आता जरा चेंज पाहिजे असं ग्रोवरसाहेब. . आय मीन लोकं म्हणतायत.'' ''पण एव्हढं वर्षं पूर्ण झालं असतं तर . . . '' ''कसं आहे काका, मला पण असंच वाटतं, पण माझ्या हातात नाही हो ते! म्हणाल तर त्रिवेदीला सांगून आमच्याच समूहात हिंदी च्यानलवर प्रयत्न करूयात.'' ''नको. . . हिंदीत नको. '' ''मग वास्तुशास्त्र, अंकशास्त्र असं काही कराल ?'' ''छेछे , भलतंच काय?'' ''ठीकाय तुमची इच्छा!

केमिकल लोच्या

फुंटी ·
लेखनविषय:
कोण रे तू? मासाच्या गोळ्यात अडकलेला तू , त्या मांसाच्या फ्रेशनेस वर अवलंबून आहेत तुझी इथली वर्ष , बाकी नियती वगैरे सगळेच खेळ मासातल्या काही सूक्ष्म तंतूंचे अशाच दोन मांसाच्या गोळ्यांच्या असंख्य अदृश्य शक्तीपैकी एक सूक्ष्म अंश तू , कसल्या भ्रमाचे ,कल्पनांचे मनोरे नाचवायला निघालाहेस?? विश्व वगैरे अस काही नसत तुझ्या कवटीच्या बाहेर.... येडा कुठला ....

नाही देखिले पंचानना

सुबोध खरे ·
हि गोष्ट मी गोव्यात असतानाची आहे. गोव्याच्या वास्को येथील नौदलाच्या रुग्णालयात काम करीत होतो. मी तेथील अधिकाऱ्यांच्या वसाहतीत राहत असे. दाबोळी विमानतळाच्या अगदी जवळ असलेली हि वसाहत अतिशय सुंदर आहे. दोन मजली इमारतीत चार घरे. खालच्या घरांना पुढे आणि मागे अंगण आहे. बाजूला मोटारीसाठी गैरेज आणि वरच्या मजल्यावर राहणार्यांना गैरेजच्यावर एक गच्ची. घरे सुद्धा सुटी सुटी आहेत. वसाहतीत रहदारी अशी नाहीच. त्यामुळे मुले फार सुखात आपल्या छोट्या सायकलींवर फिरत असत. त्यांची शाळा पण त्याच वसाहतीत आहे. त्यामुळे मुले दोन मिनिटात शाळेत पोहोचत.

आळस

वडापाव ·
लेखनप्रकार
मला जराही धीर धरवत नाही यासाठी मी स्वतःला आधी दोष द्यायचो. आता नाही. अभिमान आहे मला मी उतावळा असल्याचा. माणूस सतत धावत असतो, पळत असतो. समोरची ट्रेन सुटली आणि तिच्यानंतर अजून एक ट्रेन येणार असली तरी मनातून एक आवाज उमटतो जो ओरडून ओरडून आपल्याला ती सुटणारी ट्रेन पकडायला सांगतो, आणि मग आपण जीवाची पर्वा न करता ती ट्रेन पकडायला धावत सुटतो. का? कारण समोर दिसणारी संधी सोडायला मन कधीच धजावत नाही. मनाला अनुभवाची भूक असते आणि प्रत्येक अनुभव एक वेगळीच शिकवण देऊन जात असतो. ही भूक भागवायची, वाढवायची प्रत्येक संधी मन हेरत असतं. आपल्याला मागे धरून ठेवतो तो शिकण्याचा आळस.

काळसारं (लघूकथा)

दशानन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तिने आपले हात धुतले न्हाणीमध्ये, चुलीवर आमटी गरम करायला ठेऊन, बाजूला ठेवलेली भाकरी ताटात घेतली, जरा वेळाने गरम आमटी वाटीत ओतली आणि भाकरीचा एक तुकडा मोडून त्यात बुडवला. बाजूची चिमणी रॉकेल संपल्यामुळे मंद मंद होत वीजू लागली होती, एकदाची ती विजली, तिने खस करून चुलीतले जळते लाकूड बाहेर काढले, झोपडी अगदी लाल रंगात उजळुन गेली.. तिने आपले हात ताटात धुतले व धडपडत बाहेर आली. बाहेर गच्च अंधार पसरला होता, दूरवर कोठेतरी एखादा फड जळत होता! तिने आपले त्याच्याकडे पाहिले न पाहिले आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली.. "शेण पडो, त्याच्या तोंडात!" आपली वळकट सरळ करून ती झोपी गेली. "अंग, रुक्मीअक्का..

मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव

माहितगार ·
मिपा नोड क्र. 28707 अन्वये समीरसूर यांचा मंदिर काढा.. एका प्रस्तावावर चर्चा चालू आहे. धार्मीकस्थानांच्या मर्यादांबद्दल त्या चर्चेत उमटणार्‍या सूरांपेक्षा माझा सूर काही निराळा असतो असे नाही. पण त्याचवेळी चुकत माकत का असेना भारतीय मंदिरांनी स्थानिक संस्कृतींच्या वैवीध्यपूर्ण जोपासनेत मोलाचा हातभार लावला आहे. अर्थात भारतात नवीन मंदिरे बनवण्यात फारसे काही नवीन साधेल असे नाही.