Skip to main content

दिसली समद्यांना ...

लेखक आतिवास यांनी शनिवार, 27/09/2014 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
आयने हाक मारली, लगीच उटले आज. शाण्यासारखं पटापट आवरलं. दोन वेण्या घालून दिल्या आयने. साळंत जाऊन पयल्या रांगेत बसली. परारथनेला डोळे बंद. समदी बोल्ले. गुर्जीनी सांगितलेले पाडे बराबर लिवले. पाटीवर बेश मोर काडला. गुर्जी हसले. अंक्या, भान्या, निम्मी .. समदी होती. रोजच्यावानी. गुर्जी म्हन्ले, “आज आन्जी एकदम शहाणी मुलगी झालीय.

अम्मा

लेखक धर्मराजमुटके यांनी शनिवार, 27/09/2014 20:54 या दिवशी प्रकाशित केले.
मुख्यमंत्रिपदावर असताना ६६.६५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष कोर्टाने दोषी ठरविले असून चार वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हा खटला तब्बल १८ वर्षे चालला. "भारतात देर आये लेकीन दुरुस्त आये" हाच न्याय चालतो हेच खरे. नेहमीप्रमाणे आंधळ्या अनुयायांनी तोडफोड, हिंसाचार सुरु केलाय. कोर्टाच्या निकालाचा धाक सर्वसामान्य जनतेला वाटत नाही काय ? किंवा त्याचा आदर करावासा वाटत नाही काय ? अण्णा डिएमके आणि डिएमके दोघे एकाच माळेचे मणी असल्यामुळे एकूणातच तामिळनाडू राज्य देखील यादवीच्या उंबरठ्यावर उभे आहे असे म्हणावेसे वाटते.

आयर्नमॅन : कौस्तुभ राडकर

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 27/09/2014 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
आजच लंकावी - मलेशिया येथे पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकरने विक्रम प्रस्थापित केला. अत्यंत कठिण अशी ही स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याचे नववी वेळ आहे. हा पराक्रम करणारा तो एकमेव भारतीय असून, जगातील सर्व खंडांमध्ये भाग घेऊन ही कामगिरी करणार्या मोजक्या दुर्मीळ ट्रायथलीट्समध्ये त्याने स्थान मिळवले आहे. आयर्नमॅन विषयी : आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे, व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथ्लॉन या क्रीडाप्रकारातिल ही स्पर्धा जगभरात विवइध ठिकाणी भरवली जाते.

कुणी जाल का सांगाल का

लेखक संजय क्षीरसागर यांनी शनिवार, 27/09/2014 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
विरहाची व्यथा प्रियकरानं आणि तीही गाण्यातून सांगावी असा योग दुर्लभ. कवी अनिलांची ही अन्योक्ती अलंकारातली कविता, कोकिळेकडे संकेत करत विरहवेदना इतकी नज़ाकतीनं मांडते की नुसत्या काव्यार्थाशी जरी समत्व साधलं तरी रसिक दाद देईल. एकेक ओळ, एकेक शब्द, लयीचा असा काही तोल सांभाळत लिहीलायं की क्या कहेने! म्हणजे एक तर काव्यविषय वेगळा तरीही अत्यंत तरल, त्यात विरहाची विविधांगांनी अशी काही मांडणी की जान कुर्बान. त्यात कहर म्हणजे वसंतरांवचा चिरतरुण आवाज. जणू काही स्वतःचीच कविता असल्यासारख्या हुकुमतीनं त्यांच वेदनेची तरलता व्यक्त करणारं गाणं. जरा कालावधी सापडायचा आवकाश की वसंतराव शब्दाचं सोनं करणार.

चावडीवरच्या गप्पा – महाराष्ट्राची बिपी

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 27/09/2014 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
chawadee “नमस्कार मंडळी! महाराष्ट्राची सनसनाटी बिपी बघितली की नाही?” बारामतीकर चावडीवर प्रवेश करत, बऱ्याच दिवसांनी चावडीवर जमलेल्या सर्वांकडे बघत, मिश्किल हसत. “अहो बारामतीकर, काहीही काय बरळताय? बिपी कसला बघताय आणि बघायला सांगताय ह्या वयात!

स्वायत्त महाराष्ट्र

लेखक विजुभाऊ यांनी शनिवार, 27/09/2014 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेनी परवा महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिन्ट प्रकाशीत केली. यात महाराष्ट्राच्या विकासा बद्दल बरेच मुद्दे आहेत. पायाभूत सुविधा ,मुलभूत गरजा , प्रशासन , प्रगतीच्या संधी अशा अनेक अंगाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार केलेला आहे. यात काही ठिकाणी उदा: प्रशासन : यात राज्याचे परराष्ट्र धोरण हे वेगळे विधान आहे. यात म्हंटले आहे की. विकासात्मक व्यापार वृद्धीसाठी राज्याची थेट, स्वतंत्र व सक्रिय भूमिका
आज जागतिकीकरणामुळे सगळे देश एकमेकांशी जोडले गेले आहेत. या देशांतील राष्ट्र सरकारांपेक्षा राज्य सरकारांना कधी नव्हे ते जास्त महत्त्व आले आहे.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ७

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 27/09/2014 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
२९ जुलै १८५४ ला जॉन रे ने नौदलाच्या सेक्रेटरीला आपल्याला मिळालेली सर्व माहीती संकलीत करुन संदेश पाठवला. रिपल्स बे, जुलै २९ या वर्षीच्या वसंत ऋतूतील बुथिया आखाताचं सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या मोहीमेवर माझी वाटचाल सुरु असताना पेली उपसागरात माझी काही एस्कीमोंशी भेट झाली. त्यांच्यापैकी एकाकडून पश्चिमेच्या दिशेला एका मोठ्या नदीपलीकडे गोर्‍या लोकांची एक तुकडी उपासमारीने प्राणाला मुकल्याचं मला कळून आलं.

बखरींची सांगी अन पुराणातली वांगी

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 26/09/2014 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
तर्क क्रमांक (अर्ग्यूमेंट) १) मुळात अबकडकालीन पुरावेच कमी आहेत. त्यामुळे निष्कर्ष आणि संदर्भ केवळ नंतर उपलब्ध झालेल्या बखरीतुन आणि दस्तावेजातुनच मिळु शकतात. जर तत्कालीन (प्रमाण) दस्तावेजच फक्त मान्य करायचे झाले तर बर्‍याच राजांचे अस्तित्वच नाकारायला लागेल आणि खुद्द अबकड-राजांबद्दल फार कमी माहिती मिळते. आणि मग त्या प्रवाहात तुम्हाला बर्‍याच सरदारांचे अस्तित्व किंवा त्यांच्या कर्तुत्वाकडे डोळेझाक करावी लागेल. बखरीतील स्वतःला पाहिजे तेवडीच माहिती सलेक्टीव्हली नाकारणे बाकी स्विकारणे न्याय्य (फेअर) नाही. म्हणून बखरींमधील सर्व माहिती स्विकारली पाहिजे.

काय रे देवा… (संदीप खरे यांची माफी मागून )

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/09/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
आता पुन्हा निवडणुका येणार तेच उमेदवार हात जोडत येणार मग आपण खोटं खोटं हसणार मग मधेच डोक्यात प्रश्न येणार हे आज इथे कशाला येणार ? काय रे देवा.… मग तो पडलेला प्रश्न विचारता नाही येणार मग आम्ही तो गिळणार मग गिळूनही तो पुन्हा विचारावासा वाटणार मग समोरच्या उमेदवाराच्या डोळ्यातही तो दिसणार तो निर्लज्ज असेल तर त्यावर हसणार त्याच्याही मनाला टोचत असेल तर नजर चुकवणार मग नसताच बघितलं तसं तर बरं झालं असतं असं वाटणार आणि ह्या सगळ्याशी त्याचं काहीच देणं घेणं नसणार मग त्यावेळी नेमकी दुसरी प्रचारटोळी येणार मग त्यात मागच्या वेळी निवडून दिलेला उमेदवार असणार मग त्याने तेव्हा बरीच आश्वासनं दिलेली

Blue Print

लेखक सुहास.. यांनी शुक्रवार, 26/09/2014 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
काल चेपुवरचा मेलबॉक्स फुल झालाय, आज सकाळपासुन मेसेजेस, गबोल्यावर काही चर्चा, काही मेल्स चालु आहे. मी शक्य तसा प्रयत्न करतोय उत्तरे देण्याचा !! काही अभिनंदन पर, काही प्रश्नार्थक, काही खोचक, काही उगा टवाळी करणारे, काही सिरियसली जाणुन घेणारे, काही मनात आधीचीच अढी असुन ही अभ्यासाने परिपुर्ण, अश्या अनेक जणांना उत्तरे दिली आहेत. सर्वात महत्त्वाचे .. मी मिपावर मनसेचा किंवा कुठल्याही पार्टीचा प्रचारक म्हणुन कधी च काही लिहीले नाही.