Skip to main content

बँग बँग

लेखक श्रीरंग यांनी शुक्रवार, 03/10/2014 01:56 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच्या काळात, हिंदी चित्रपट हे डोकं घरी ठेवून बघायला जाण्याची गोष्ट आहे, व तत्सम कावा, डोकं वापरून चित्रपट बनवण्याची स्वतःची कुवत नसलेल्या बर्याच चित्रपटकर्त्यांकडून उघडपणे केला जाऊ लागला आहे. त्यांनी हाताशी धरलेल्या समिक्षकांनीपण "करमणूकप्रधान मसालापट" वगैरे विशेषणं लावून या निर्बुध्दपटांना उचलून धरण्याची केविलवाणी कसरत सुरू केली आहे. आजच प्रदर्शित झालेला बँग बँग हा प्रचंड खर्च करून बनवलेला चित्रपट याच मालिकेतील एक. असो.. आधी चित्रपटातील काही चांगल्या गोष्टी : १. हा चित्रपट "किक" इतका वाईट नाही. बस्स. यापलिकडे चांगलं म्हणावसं असं यात खरच काहीच सापडत नाही.

महाराष्ट्र/हरयाना विधानसभा निवडणुक (२०१४)

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 02/10/2014 20:37 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑक्टोबर २०१४ या दिवशी महाराष्ट्र व हरयाना राज्यांच्या विधानसभेची निवडणुक आहे. निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होतील. हरयानात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. गेली १० वर्षे काँग्रेस सत्तेत असून भूपेंद्रसिंग हूडा सलग १० वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याविरूद्ध जोरदार अँटीइनक्युम्बंसीचे वातावरण आहे. गेली ३-४ दशके हरयानाचे राजकारण देवीलाल, भजनलाल व बन्सीलाल या ३ लालांभोवती केंद्रीत झाले आहे. भजनलाल व बन्सीलाल कधी काँग्रेसमध्ये असायचे तर कधी काँग्रेसबाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापून काँग्रेसविरोधात लढायचे. देवीलाल कायमच काँग्रेसविरोधात असायचे. तिघेही अनेकवेळा मुख्यमंत्री झाले होते.

कुणी प्याल का पिलवाल का

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 02/10/2014 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी प्याल का पिलवाल का खिलवाल का तो चकणा | रात्री तरी पिऊ नको सोडू नको अपुला बाणा || धृ || आधीच संध्याकाळची पार्टी आहे लांबली | परत जाता अजून एक पेग देत थांबली || चकणा शिळा दिला जो मद्य सांडुन भिजला | आत्ताच हातातला ग्लास मी कुरवाळीला || १ || सांभाळुनी माझ्या जीवाला, मी जराशी घेतली | बोकाणा भरताना चकण्याचा, हिची चाहूल लागली || सांगाल का त्या महिलेला, कि जास्त नाही ढोसली || आणि उतराया नशा कोणी रात्र जागून काढली || २ || कुणी प्याल का पिलवाल का खिलवाल का तो चकणा | रात्री तरी पिऊ नको सोडू नको अपुला बाणा || धृ || (कवी अनिलांची क्षमा मागून)

रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी गुरुवार, 02/10/2014 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली... इथे अपेक्षित काय आहे ?? आर .ई.

उपवासाचे अनारसे

लेखक विजय पिंपळापुरे यांनी गुरुवार, 02/10/2014 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
उपवासाचे अनारसे साह्ञीत्ञ : वरई तांदुळ साखर अथवा गूळ खसखस तूप कृती : वरई तांदुळ तीन दवस भिजवावेत. मग उपसून कपाड्यावर अधवट वाळवावे. नंतर खलबयात चांगले बारीक कुटून घयावेत. यात जेवढ पीठ त्याचया निमपट साखर अथवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घयावे व झाकून ठवावे. नंतर दुसरया दिवशी नेहमी प्रमाणे अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. यावर खसखसलावावी व लालासर रंगावर तळून घयावेत

"स्वच्छ भारत अभियान" आणि आपण

लेखक निलेश यांनी गुरुवार, 02/10/2014 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची दीडशेवी जयंती. आजच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना‘चे उद्‌घाटन केले आहे. दिल्लीतील महर्षी वाल्मिकी मंदिरात पोहचून मोदींनी हातात झाडू घेऊन साफसफाई केली. या निमित्त भाषण करताना देशवासीयांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले. आपण सगळे आपले घर स्वच्छ ठेवतो. पण आपला परिसर स्वच्छ ठेवत नाही. अस्वच्छतेमुळे होणार्या आजारांमुळे आपले आरोग्य धोक्यात आले आहे. आपला पैसा, आपला वेळ वाया जात आहे. आपल्या नद्या या सांडपाणी वाहून नेणारी गटारे बनल्या आहेत. कचर्याचे डोंगरच्या डोंगर शहरांमध्ये तयार होत आहेत.

छायाचित्रणकला स्पर्धा ३ प्रवेशिका आणि मतदान....

लेखक संपादक मंडळ यांनी गुरुवार, 02/10/2014 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
छायाचित्रणकला स्पर्धा मालिकेतील तिसरं पुष्प, विषय ऋतु (Seasons) या विषायानुरूप आलेल्या या प्रेवेशिका. आजपासून ९ अक्टोबरपर्यंत सगळे मिपा सदस्य परीक्षक म्हणून या चित्रांना १,२,३ असे अनुक्रमांक देतील. मतांची सरासरी काढून अंतिम निर्णय प्रकाशित केला जाईल. अनवधानानं मुळ धाग्यातलं एखाद्या स्पर्धकाचं चित्रं या यादीत टाकायचं राहुन गेलं असेल वा एकाच सदस्याची दोन चित्रं आली असतील तर कृपया निदर्शनास आणून द्याव ही विनंती. धन्यवाद आणि शुभेच्छा!

लाल बहादुर शास्त्री जयंती......

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 02/10/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
laal bahadur shastri आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात

गांधीबाबा,त्याची अहिंसा आणी आपण ?

लेखक बाबा पाटील यांनी गुरुवार, 02/10/2014 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
गांधी....... काहीही म्हणा मित्रांनो,बापुने दिलेला अंहिसेच्या मंत्राला प्रत्यक्षातले अहिंसकच जास्त शिव्या घालताना दिसतात, आज जे जे गांधीच्या अंहिसेच्या आंदिलनाला शिव्या घालताना दिसतायेत त्यातिल किती जणांनी प्रत्यक्ष शस्त्र हातात धरले आहे,किंवा सशस्त्र आंदोलनाच्या बाता मारणार्‍यांपैकी कितीजणांनी आपल्या आजुबाजुला अथवा स्वतःवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध स्वतः सशस्त्र प्रतिकार केला आहे. मला खरच गंमत वाटते,माझ्या ६ वर्षाच्या लेकीला कळत की बापाचे पिस्तुल हातात घेताना ते पुर्ण रिकामे आहे की नाही हे विचारुनच त्याला हात लावावा,मग या गाढवांना का कळत नाही की अशा गोष्टींचे तोटे किती आहेत,बंद

आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 02/10/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
कौटूंबिक वातावरणात भावंडांच्या केव्हा न केव्हा आपापसात कुरबुरी होतच असतात. एखाद्याची बाजू घेताना अगदी आईवडलांवरही त्यांच्या न्याय्य निष्पक्ष वागण्यावर विश्वास न ठेवता पक्षपाताचे आरोप होत असतात पण कौटूंबीक वातावरणातली हि छोटी चहाच्या कपातली वादळं बहुतांश वेळा विस्मृतीच्या आड जातात आणि स्मृतीत राहतात ते कौटूंबिक प्रेमाने भारलेले क्षण. पण जेव्हा आपण सामाजिक परिस्थितीकडे येतो ज्या व्यक्ती समभाव आणि निष्पक्षतेने वागू इच्छितात अथवा तटस्थता बाळगू इच्छितात त्यांना केवळ पक्षपाताच्याच आरोपांना सामोरे जावे लागत नाही तर आपल्याच मंडळींच्या निष्ठूरतेस सहनही करावे लागते.