मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जम्मू- कश्मीर मदत कार्य अनुभव- १

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्वप्रथम मिपा संस्कृतीला मन:पूर्वक अभिवादन! मिपा टीम आणि मिपावरील सर्व मान्यवर लेखक- वाचकांना मन:पूर्वक नमस्कार. आज मिपावर लिहायला सुरूवात करताना आदराची भावना मनात आहे. आजवर मिपावर असंख्य दर्जेदार, अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख वाचले. अशा मिपावर लेखन करताना सर्वांना पुनश्च अभिवादन करावसं वाटत आहे. हे लिहिण्याची सुविधा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद किंवा मिपा भाषेत धन्स! :) पूरग्रस्त जम्मू- कश्मीरमध्ये मदत कार्यात थोडा सहभागा घेता आला; त्याबद्दल काही लिहू इच्छितो.

संभाषण

अविनाशकुलकर्णी ·
लेखनविषय:
ब-याच लोकाना संभाषण करताना एखादे वाक्य वा शब्द वारंवार वापरण्याची सवय असते. ते वाक्य वा शब्द आल्याशिवाय त्यांचे संभाषण वा गप्पा पुर्ण होत नाहित.. एम.आय.डी सी. त असे अनेक नमुने होते.. एकाला बोलताना.." पण मी काय म्हणतो" असे म्हणायची सवय होति.. एकाला " मला एकच कळत" तर एकाच्या वाक्यात "च्यायला" शब्द आलाच पाहिजे असा नियम होता.. एक जण कायम "हरी हरी" म्हणत असे काहिना "शिट यार" तर काहिन फ** इट" अशी ईंग्रजीत म्हणायची सवय असते १ ना २ असे अनेक नमुने आपणास हि माहित असतिल.. एव्हढेच नव्हे तर आपणहि एखाद्या शब्दाचा वा वाक्याचा कायम उपयोग करत असतोच म्हणा...

काही असे लोका नावडे...पण मज गमते मनोहर...

समीरसूर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आजची (पुण्यातली) सकाळ मस्त आहे. हवेत सुखद गारवा आहे; कोवळे-कोवळे ऊन थंडीची लज्जत आणखी वाढवतेय. आज कार्यालयात कामदेखील कमी आहे. सकाळी कंपनीच्या बसमधून कार्यालयात येतांना 'आशिकी'चे "मेरा दिल तेरे लिये, धडकता हैं..." ऐकले. मस्त वाटले. या गाण्याचा ठेका मला खूप आवडतो. एकदम शाळेतल्या वयात गेल्यासारखे वाटले. दिल बाग बाग हो गया. नंतर एकदम "तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे..." वर उडी मारली. अल्ताफ राजाचा तो निराकार आवाज ऐकून कॉलेजचे दिवस आठवले. मध्येच मला बायकोचा फोन आला. मी असा गाण्यांमध्ये रममाण झालेला असतांना तिचा फोन हमखास येतो.

काही प्रसंग

सुज्ञ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही प्रसंग. वेळ: तुमच्या मनात येईल ती … स्थळ: तुम्हाला वाटते तेच. प्रसंग पहिला सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात. एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं.

कमल घर (एक वात्रटपणा)

शरद ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कमल घर चार एक वर्षांपूर्वी मी "उपक्रम"वर हायकूवर एक लेख लिहला होता.नेहमीच्या ५-७-५ या तंत्राची माहिती दिल्यावर कवी श्री. राजेश घासकडबी यांनी एक पृच्छा केली कमल घर बघ कमल घर कमल बघ ह्याला हायकू म्हणावयाचे का ? माझा यावरचा प्रतिसाद थोडा दीर्घ व अवांतर असल्याने प्रतिसाद म्हणून न देता एक नवीन चर्चा विषय म्हणून मांडला होता. चर्चा का हे पुढे वाचल्यावर लक्षात येईल. फारा वर्षांपूर्वी सत्यकथेत एका लेखिकेची एक कविता प्रसिद्ध झाली. त्यावेळी कवीमंडळात ही एक फार मानाची गोष्ट होती. आता आम्हाला कळली नाही, पण हे काही नवीन नव्हते. नेहमीचीच ओरड. खरी गंमत पुढील अंकात. त्या लेखिकेने पत्रच लिहले.

तसे देव मोकळेच असतात..!!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
सध्या देव एकटेच असतात काल सहज त्याची आठवण आली तिला आणि ती अशी येथे दूर ...दूरदेशी आणले तिने जुजबी देव नाही असे नाही लंगडा बाळकृष्ण एकटाच घरी सोबत विठ्ठल रुखमाई आणि शंकराची पिंड त्याच्या समोर नंदी तेवढीच एकमेकाची एकमेकाला सोबत नाही असे नाही रात्रीच्या अंधारात त्याना दिसणार मात्र काहीच नाही कालच कशी कुणास ठाऊक आभाळातील ढग बघून तीही उदास ,खिन्न आणि आली आठवण देवाची दिसून गेले उदास देवघर किती दिवस प्रसाद सोडा किती महिन्यात त्याना कोणी आंघोळ देखील घातली नाही कसे करमत असेन त्यांना..?

मराठी अस्मिता, आपण आणि राजकारण

वेल्लाभट ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
"नाही यार नाही. हा नाही. अरे तो ठीक आहे पंतप्रधान म्हणून. महाराष्ट्रात हा नाही पाहिजे. अरे तो मराठी माणसाचा, आपला, असा पक्ष नाहीये मित्रा.... तो महाराष्ट्रात मराठी माणसाला पोरकं करेल, अरे मारून टाकेल तो आपल्या अस्मितेला...." अगदी कळकळीने काल रस्त्यावर एक माणूस दुस-या माणसाला सांगत होता. या सगळ्या विचारांत काहीसं तथ्य असलं जरी, तरी बरचसं नाही आहे. मुंबईतला एक मुख्य पक्ष हा पहिल्यापासून मराठी माणसाचा पक्ष राहिलेला आहे. मराठी माणसाला मुंबईत कधीच पोरकं केलं गेलं असतं. पण त्याला बळ दिलं, त्याचा दरारा प्रस्थापित केला तो या पक्षाने. दंगलींच्या वेळी मराठी माणसाला मुंबईत आधार होता तो याच पक्षाचा.

पुण्याचे उणे

विटेकर ·
(श्रीरंग जोशी यांनी चेपुवरील एक ढकल संदेश खफवर टाकला आहे पुण्याची महती सांगणारा ! त्यावरुन थोडे चिन्तन घडले, त्यातून हे मुक्तक प्रसवले आहे.) पुण्याची मुम्बई झाली आहे हो ! छाती फुटेस्तोर पळावे लागते आज काल पुण्यात देखील! आय टी वाल्यांनी वाट लावली आहे पुण्याची ! हिन्जवडी आणि हडपसर या दोनी दिशांना २४ तासाचा जाम करुन ठेवला आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. इतके की, आता त्यांना देखील ते परवडेनासे झाले आहेत. मला व्यक्तिशः सकाळ संध्याकाळ दिड तास-दिड तास प्रवास करावा लागतो. आणि विकेण्डला देखील मुंबै च्या लोकांनी पुणे जाम करुन ठेवले आहे. पुणे हे मुंबई नसल्याने हा असला भार पुण्याला पेलवत नाही.

चिनी चित्रकार आणि नेपाळी छायाचित्रकार

आगाऊ म्हादया...... ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सकाळी माझी भलतीच निराशा झाली, सारसबागेत दीपोत्सव असतो दर वर्षी...सुंदर आकारात मांडलेल्या पणत्या ही खरच मेजवानी असते डोळ्यांना, खास करून पहाटे ४-६ या वेळेतल्या अंधारात. त्यातूनही त्या प्रकाशात मधेच अनेक प्रसन्न, गोड चेहरे पाहून अधिकच छान वाटायला लागतं. पणत्या लावण्यासाठी लोकं मध्यरात्री २ पासून जागा धरून ठेवायला कमी करत नाहीत. आणि नंतर मात्र creativity चा जो काही कस लावतात ना...कमाल!! पण आजचा चित्र वेगळच होतं, तोच canvas ठेऊन चित्रकार बदलल्यासारख बदललेलं चित्र...चिनी लोकांचं आपल्या बाजारपेठेतल आक्रमण. ५० रुपयाला मिळणारा तो हॉट एअर बलून. सगळीकडे तेच तेच आणि तेच. एका दिवाळीत चित्र बदलल.

आल्प्सच्या वळणांवर - भाग ६ - इंटरलाकेन आणि विल्डर्सविल

मधुरा देशपांडे ·
आल्प्सच्या वळणांवर - भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५ सकाळी उठून बाहेर पाहिले तर वरुणराजा कोसळत होते. घरातून बागही दिसत नव्हती एवढे दाट धुके होते. थोडा वेळ वाट बघुयात नाहीतर पडू बाहेर, असा विचार करून आवरले. यापूर्वीचा आमचा अनुभव बघता संपूर्ण सहलीत जर पाउस आलाच नसता तर खरं तर आश्चर्य वाटले असते.