Skip to main content

शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 25/01/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो. बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे: १. आजच्या भ्रमणध्वनी, उपग्रह वाहिन्या, आंतरजाल या सुविधांनी युक्त अशा जीवनाने भौगोलिक सीमा हा प्रकार (निदान देशांतर्गत तरी) रद्दबातल ठरवलेला आहे.

गुंतता ह्रदय हे.....

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 25/01/2015 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेकी सुनांच्या संसारात आईवडील मायेपोटी गुंतलेले असतात. एकमेकांना असलेल्या व्यावहारिक गरजांचे धागे जरी ह्या गुंतण्यात असले तरीही, आपल्या माणसांविषयीच्या प्रेमाचे रेशमी धागेच ह्या भावनिक गुंतण्यांत अधिक असतात. बरेचदा असे दिसते की नात्यांचे रेशमी बंध व्यवहार, व्यवसायांच्या काट्यांमधे अडकून दुखावले जातात. मग तयार होतो एक विचित्र गाठींचा गुंता...... माझ्या गप्पा ह्या लघुकथेमधे मला असेच काहिसे दाखवायचे होते. पण ते इतक्या सगळ्या शब्दांच्या गुंत्यामधे न अडकता. एखाद्या कवितेसारखे...

अल्लाल शेती

लेखक दादा पेंगट यांनी रविवार, 25/01/2015 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी झाडीपट्टीत राहतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे चार जिल्हे म्हणजे झाडीपट्टी. कोकणानंतर सर्वाधिक पाऊस इकडेच पडतो म्हणतात. तसेच तलावांची साखळीच आहे आमच्याकडे. त्यामुळे धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आमच्याकडे मोठे उद्योगधंदे वगैरे नाहीत. मोठी शहरे नाहीत.(आमचे चंद्रपूर त्यातल्या त्यात थोडे मोठे म्हणता येईल.) शेतीवरच सगळी भिस्त आहे. आमची फार शेती नाही. शेतीवर आता पोट नसले तरी कधीकाळी शेतीचा मोठा आधार होता. यंदा माझ्या घरी पावसाळी धानाचे 2 एकरात 16 हजार एकूण खर्चात 57 हज़ार एकूण उत्पन्न मिळाले. म्हणजे 41 हज़ार निव्वळ नफ़ा. एकरी 20.5 हज़ार फक्त.

शरयत

लेखक आतिवास यांनी रविवार, 25/01/2015 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी साळा. कालच्याला अब्यास न्हौता, लई खेळ्ळो. तीन पायाच्या शरयतीत नुस्ती पडापड. तोंडात चम्चा अन चम्च्यात लिंबू ठिवून पळायचीबी येक शरयत. सोपी नसतीय. पन माजा पैला नंबर आला. आज साळंत झेंडा उबारला. समदी झ्याक ‘जनगणमन’ बोल्ली. कोणकी आजीबाई आलत्या, तेंनी कायबाय सांगितलं. समजलं नाय काय मला, तरीबी म्या टाळया वाजिवल्या. मंग बक्शीसं दिली. अंक्याला लब्बर, भान्याला पटटी. गुर्जीन्नी मला बोलिवलं. म्या आज्जीबाईच्या जवळ ग्येली. त्या म्हन्ल्या, “बाळ, तुला मोठेपणी काय व्हायचं आहे?” “शरयतवाली” म्या बोल्ली. त्या हसल्या. म्हन्ल्या, “आमचीही शर्यतच चालू आहे कधीपासून.

चायनीज भेळ

लेखक hitesh यांनी शनिवार, 24/01/2015 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  पाव किलो कोबी चायनीज शेव - मला वाटले होते हे मैद्याचे असेल. पण पाकिटावर चक्क तांदळाची चकली असे लिहिले आहे. चटणीसाठी - लाल टोम्याटोचा कीस , कांद्याचा कीस , शेजवान चटणी , टोम्याटो सॉस , थोडे तेल , मीठ , लाल तिखट क्रमवार पाककृती:  आधी चटणी करुन घ्यावी. चार चमचे तेल गरम करुन त्यात कांद्याचा कीस , टोम्याटोचा कीस , शेजवान चटणी , सॉस , तिखट व मीठ घालुन परतावे. लालभडक मस्त चटणी तयार होते. नुसतीच शेजवान चटणी च सॉस मिसळुनही दाट व तिखट चटणी होऊ शकेल. कोबी किसून घ्यावा. त्यात चायनेज शेव व चटणी मिसळावी.

वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 24/01/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे? मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे? करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या? वगळून आशयाला चालेल का कधी रे? नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले दगडात देव आहे वाटेल का कधी रे? खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे? टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे? व्हावे 'विशाल' आता, कोतेपणा गळावा वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे? विशाल...
काव्यरस

स्वच्छ भारत अभियान की पब्लिसीटी स्टंट ??

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 23/01/2015 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे. मा.

पोपटी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 23/01/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. पावसाळा संपुष्टा आलेला असतो पण अजुनही ओलसर असलेल्या जमीनीमुळे व हवेतील थंड अशा अनुकुल वातावरणामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या व विविध शेंगा, वांगी, मिरच्या, नव अलकोल भाज्यांची भरभराट होऊ लागते. आमच्या उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही ह्या सिझन मध्ये पर्वणी आणतात. बाजारपेठेतही ह्या भाज्यांच्या राशी रांगोळीप्रमाणे रचलेल्या दिसतात. ह्या भाज्या आणि थंडी ह्यांचा मिलाप झाला की पोपटी पार्टीचे आयोजन जिथे तिथे होताना दिसते.

जा री जा री ओ कारी बदरीया.......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/01/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी कसं होतं ना? एखादा संगीतकार , एखाद्या चित्रपटात एका वर चढ एक सुंदर गीते देवून जातो. मग प्रेक्षकाची - श्रोत्याची अवस्था "देता किती घेशील दोन कराने" (इथे "ऐकता किती ऐकशील दोन कानाने" असे वाचायलाही हरकत नाही ;) ) अशी होवून जाते. पण या सगळ्या आनंदात बरेच वेळा असेही होते की अत्युत्तम असे काही ऐकताना त्याच चित्रपटातील एखादे साधेच पण नितांत सुंदर असलेले गाणेही नकळत दुर्लक्षीत होऊन जाते. आता हेच बघा ना. श्री. एस.एम.श्रीरामलु नायडू या यंडु गुंडू वाटणार्‍या नावाच्या माणसाने १९५५ साली युसुफसाब उर्फ दिलीप कुमार आणि मीनाकुमारी यांना घेवून 'आझाद' नावाचा एक तद्दन मसालापट काढला.

गप्पा

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 23/01/2015 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज्जी हे बघ मिकी काय म्हणतो आहे! काय म्हणतोय? पोळ्यांची कणीक मळता मळता तिने स्वैपांकघरातून ओरडून विचारले. टीवी लाव म्हणतो आहे। तेला कार्टून बगायचे आहे. मिकीला की तुला? नाय, मिकीला! चल गप्पिष्ट कुठला. असा आजीचा काहीना काही संवाद दिवाणखान्यात एकटाच खेळणा-या दीपशी स्वैपांकघरातून तार स्वरात ओरडून सुरू होता. ओरडून घसा दुखला तशी भराभरा हातातले काम संपवून ती दिवाणखान्यात आली. आज्जी, हे बग, मी डंपर, डिगर सगळे बाहेर काढले. आज्जी हा मानूसला आत बसव नां ए आज्जी फ़ायर ईंजीन वी वौ वी वौ अस कां करतं? अरे त्याला लवकर जायच असत ना, म्हणून लोकांना रस्त्यातून बाजूला करायला आवाज करतं वी वौ वी वौ ....