Skip to main content

ट्रॅप - ५

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 05/01/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीतील साऊथ ब्लॉक परिसरातील ऑफीसमधल्या आपल्या डेस्कवर बसून कॅप्टन नितिन देशमुख आपल्या समोरील कागदाच्या कपट्याकडे रोखून पाहत होता. आतापर्यंत किमान तीनवेळा त्याने तो कपटा वाचला होता. त्यावर एकच वाक्य लिहीलेलं होतं. The Man on the terrace winked at the lady beside and thrown flowers at her! एखाद्या सामान्य माणसाने ते वाक्यं वाचलं असतं तर त्याला एखाद्या कथेतील प्रसंगाचं वर्णन वाटलं असतं. पण कॅप्टन नितिनला मात्रं त्या वाक्याचा अर्थ बरोबर कळला होता. "गुड मॉर्निंग कॅप्टन!" एक मधुर स्वर त्याच्या कानावर आला. त्यासरशी त्याची समाधी भंग पावली. त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं.

घर- घर

लेखक चिनार यांनी सोमवार, 05/01/2015 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून स्वत:साठी घर शोधण्याची मोहीम सुरु आहे. आजकाल घराला 'Flat' असे म्हणतात. पुण्यासारख्या शहरात जर Flat बुक केला असेल तरच त्या माणसाने आयुष्यात काहीतरी मिळवलय असे मानले जाते. कारण भेटणारा प्रत्येक दुसरा माणुस तुम्हाला ' काय, कसे सुरु आहे? ' हे विचारून झाल्यावर 'काय Flat वगैरे बूक केला कि नाही अजुन? 'असा प्रश्न विचारून जातोच.आणि त्याचे उत्तर जर 'हो' असेल तर पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला काहीही अर्थ उरत नाही. Flat घेतल्यावर माणसाचे 'बरं चाललंय ' हे उत्तर खरं असुच शकत नाही. तो बिचारा ईएमआय आणि डाउन पेमेण्ट या 2 शब्दान्नी पुरता मेटाकुटीला आलेला असतो.

माझेच (म्हणणे) खरे

लेखक नाखु यांनी सोमवार, 05/01/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
वि.कुं ची क्षमा मागून्.आणि खरे काकांना दंडवत घालून (शीर्षकात खरे शब्द वापरू दिल्याबद्दल) वाचनापूर्वी (गर्भीत) सूचना :काव्यरस व लेखन विषय नजरेखालून घालावा नंतर पश्चाताप नको. नेहमी प्रमाणे यावरील खुलाश्यास वा स्पष्टीकरणास आम्ही बिलकुल बांधील नाहीत तेव्हा अपेक्षा करून मुखभंग करून घेऊ नये. :-| :| =| :-| वि.सू.

अंधार क्षण भाग ५ - निष्ठा (लेख २४)

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 05/01/2015 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
अंधार क्षण भाग ५ - निष्ठा मध्ययुगीन युद्धांमध्ये आणि दुस-या महायुद्धामध्ये असलेला एक अत्यंत महत्वाचा फरक म्हणजे धर्म हा मुद्दा दुस-या महायुद्धात अजिबात महत्वाचा नव्हता. नाझींच्या ज्यू द्वेषाचं कारण धार्मिक नसून वांशिक होतं. हिटलरला तर कुठल्याही धर्माबद्दल आस्था नव्हती. पण धार्मिक मुद्दे जरी महत्त्वाचे नसले तरी एखाद्या विचारसरणीवर पराकोटीची निष्ठा हे दुस-या महायुद्धाचं वैशिष्ट्य होतं. एस्. एस्. प्रमुख हेनरिख हिमलरसारख्या कट्टर नाझींसाठी सोविएत रशियाविरूद्ध पुकारलेलं युद्ध म्हणजे कम्युनिझम किंवा साम्यवाद आणि राष्ट्रीय समाजवाद या दोन विचारसरणींमधला टोकाचा संघर्ष होता.

ओंकारेश्वर प्रवासाचे निमित्ताने-एकूण ४ पैकी भाग ३

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 05/01/2015 08:22 या दिवशी प्रकाशित केले.

रूपमती महालातील जलाशयातील वरच्या कमानींचे प्रतिबिंब. बाजबहाद्दुर महालातील पुष्करणी.

आजचा मुख्य स्थलदर्शनाचा कार्यक्रम मांडवगड उपाख्य मांडूचा होता. त्यामुळे आता नाश्ता करून आम्हाला निकडीने प्रवासास सुरूवात करायला हवी होती. तासा दीड तासातच आम्ही मांडूस पोहोचलो. किल्ल्याचे सर्वसारणतः तीन भाग पडतात. रेवाकुंड ह्या तिसर्‍या खंडापासून आम्ही सुरूवात केली.

लोकमान्य - एक युगपुरुष

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी सोमवार, 05/01/2015 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य बाळगंगाधर टिळक. काही भारतीयांची नावे घेतली की माझे मस्तक आपोआप आदराने झुकते, त्यातलं हे महत्त्वाचं नाव. लोकमान्य. दुसरं काहीही नाही. संत नाही, महंत नाही, महात्मा नाही, देवमाणूस नाही, किंवा तत्सम काहीही नाही. लोकमान्य. लोकांना मान्य असलेला तो लोकमान्य. बास्स.

माझेच जगणे खरे.....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी रविवार, 04/01/2015 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वप्रकाशित... नमस्कार मंडळी आमचे आंतरजालीय मित्र कविवर्य श्री श्री श्री अमेय पंडित यांची शार्दूलविक्रीडित या वृत्तातली "परदु:ख" ही अप्रतिम कविता वाचली आणि आमच्या सुप्त प्रतिभेसही धुमारे फुटले (ही उच्च भाषा वाचुन कुणी अंतर्बाह्य ’फुटले’ असेल तर त्याला आम्ही जबाबदार नाही). वृत्त जपण्याचा, निभावण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलेला आहे. काही चुकले असेल तर असो, त्याने काय फ़रक पडतो? ज्यांना ही कविता (विडंबन) कळणार नाही, त्यांनी सरळ घरी जाऊन कार्टून नेटवर्क किंवा गेला बाजार ’झी मराठी’च्या मालिका बघाव्यात.
काव्यरस

कोटीच्या कोटी उड्डाणे !!!!

लेखक चिनार यांनी रविवार, 04/01/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मनोरंजन" या शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते.कोणाला काय आवडेल किंवा कोणाचे कशाने मनोरंजन होईल ह्याला काही नियम नाही.मराठी किंवा हिंदी सिनेमांच्या बाबतीत तर ही गोष्ट तंतोतंत लागू पडते.  म्हणूनच तर "प्यासा" च्या देशात "दबंग" सुद्धा हिट होतो. चला एकवेळ मान्य करू की दबंग मध्ये सलमान खान तरी होता . पण मराठी प्रेक्षकांनी ऐकेकाळी  अलका कुबल चे सिनेमे सुद्धा डोक्यावर घेतले होते. हिचे सिनेमे बघून तर गांधीजींची सुद्धा सहनशक्ती संपून त्यांनी हिंसाचाराचा मार्ग अवलंबला असता.

ओरिगामी प्रदर्शन वॄत्तान्त

लेखक सुधांशुनूलकर यांनी रविवार, 04/01/2015 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: || ‘वंडरफोल्ड २०१४’ मार्च-एप्रिल उजाडला की ओरिगामी मित्रच्या सदस्यांची लगबग सुरू होते. पुणे-मुंबईकर मित्रांची फोनाफोनी, याहू ग्रूपवरचे संदेश (आणि आता व्हॉट्स अॅप संदेश) वाढायला लागतात. त्या वर्षीच्या ओरिगामी प्रदर्शनाच्या - ‘वंडरफोल्ड’च्या नियोजनाला सुरुवात होते. एखाद्या सामाईक संकल्पनेवर चर्चा होते आणि सगळे मित्र (म्हणजे यात मैत्रिणीसुद्धा आल्या..) ‘बोटं सरसावून’ कामाला लागतात. वर्षभरात झालेल्या नव्या सदस्यांनाही यात आवर्जून सामील केलं जातं.

लोकमान्य - एक युगपुरूष

लेखक श्रीरंग यांनी रविवार, 04/01/2015 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळक : जाज्वल्य राष्ट्रवादी विचारांनी एका संपूर्ण पिढीला भारून टाकणारे, स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायला प्रव्रुत्त करणारे एक तेजस्वी व्यक्तिमत्व. महाराष्ट्राने ज्यांच्यावर निस्सिम प्रेम केलं, नव्हे ज्यांची अक्षरशः भक्ती केली अशा महानायकाचा जीवनपट येणं अतीशय स्वागतार्ह आहे. चित्रपट उलगडत जातो तो मकरंद (चिन्मय मांडलेकर) या पत्रकाराच्या नजरेतून. लोकमान्यांच्या सापडलेल्या एका दुर्मिळ ध्वनीफीतीच्या प्रक्षेपण समारंभाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेला मकरंद त्यांचे विचार ऐकून अंतर्मुख होतो. "तरुणांनी स्वतःची प्रगती अवश्य करावी.