Skip to main content

वाहनविश्व: भाग ४ इंटर्नल कंबशन इंजिन्स

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शनिवार, 10/01/2015 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचे भाग: वाहनविश्व : भाग १ प्रस्तावना वाहनविश्व : भाग २ इतिहास वाहनविश्व: भाग ३ संरचना आणि विभागणी

इंजिन्स :

इंजिनं हे स्वयंचलित वाहनाचं ह्रुदय असतं. ह्याच्याचं धडधडीचं रुपांतर वेगवेगळ्या यांत्रिकी यंत्रणा वापरुन गतीमधे केलं जातं.

निमोना

लेखक सविता००१ यांनी शुक्रवार, 09/01/2015 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
काल चतुर्थीचा उपास सोडण्यासाठी निमोना, पुर्‍या आणि सुधारस असा बेत होता. त्यातल्या निमोनाची पाकृ देतेय खाली. ही पाकृ कांदा-लसूण विरहित आहे त्यामुळे उपास सोडायला चालली. Smile मला ही माझ्या एका उ.प्रदेशीय मैत्रिणीने दिली. अफलातून होते. आणि थंडीच्या दिवसातच ही करतात कारण मटार सुरेख आलेला असतो.ती याला व्रत का खाना म्हणते. Smile तर चला- करूया निमोना. साहित्यः- एक किलो मटार चे दाणे धुवून, एक तमाल पत्र,प्रत्येकी फक्त २ लवंगा, वेलदोडे,मिरी दाणे, १ हिरवी मिरची, पाव इंच आल्याचा तुकडा, जिरे, हिंग,धनेजिरे पूड पाव चमचा, साजूक तूप (अति महत्त्वाचे, तेल नको) क्रुती: अत्यंत सोप्पी.

आपण यांना का खाल्लंत ?

लेखक तिमा यांनी शुक्रवार, 09/01/2015 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी, दूरदर्शनवर संध्याकाळी, 'आपण यांना पाहिलत का ?' या नांवाचा हरवलेल्या व्यक्तींचे फोटो दाखवणारा कार्यक्रम असे. त्यांत काही चेहेरे इतके भेसूर असत की माझ्या एका मित्राने, या कार्यक्रमाचे नांव, 'आपण यांना का पाहिलंत ?' असे ठेवले होते. पुढे अनेकवेळा बेचव वा विचित्र चवीचे अन्न खाल्यावर माझ्या मनांत, आपण यांना का खाल्लं ?' असा प्रश्न उभा रहात असे. तर अशा काही आठवणी सांगायचा बेत आहे. वाचक त्यांत आपापली भर घालतीलच. लहान असताना, आमच्या शेजारी एक ख्रिश्चन सदगृहस्थ रहात असत. एका ख्रिसमसला त्यांनी आमच्या घरी एक केक आणून दिला.

कार्टून्स आणि कॉमिक्स

लेखक पिंपातला उंदीर यांनी शुक्रवार, 09/01/2015 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
… १९९२ साल . बोलता बोलता शेजारचा नित्या मला म्हणाला ," काय येत तुमच्या सुपर कमांडो ध्रुव ला . आमचा नागराज विषारी फुंकर मारून दोन मिनिट मध्ये आडवा करेल त्याला ." मला पण चेव चढला . मी पण नागराज कसा घाणेरडा आहे हे सांगून तिथल्या तिथे परतफेड केली . शब्दाने शब्द वाढत गेला . बोलचाल बंद झाली . राज कॉमिक्स चे नागराज , परमाणु , डोगा हे कॉमिक्स नायक जाम प्रसिद्ध होते . पोरांनी आपले आपले हिरो निवडले होते . कंपू तयार झाले होते . दुसऱ्या नायकाचा चाहता हा शत्रू पक्षातला होता . नंतर मी गावातून बाहेर पडलो . नित्याशि संबंध संपला .

ही वाट भटकंतीची १३ : वेरुळ - अजिंठा (भाग १)

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 08/01/2015 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
२०१३ च्या हिमाचल सहली नंतर एप्रिल ची कोकण ट्रीप सोडली तर २०१४ नोव्हे संपेपर्यंत फिरण्यासाठी खुप कमी वेळ मिळाला. कारण तसे खास होतेच कन्यारत्नामुळे आम्हाला बाकी संपुर्ण जगाचा विसर पडला होता. या काळात मी मिपा वरती नव्हतो, नेट वरती कुठेच नव्हतो.. नाही म्हणायला कंपणीतील कंपल्सरी ट्रीप मुळे गोव्याची ट्रीप आणि गोवा आवडल्याने नंतर केलेला दुधसागर ट्रेक वगळता कुठलीही भटकंती या काळात झाली नाही. त्याची कसर भरुन काढण्यासाठी यावेळेस राजस्थानच फायनल केले गेले होते. पण बाळ लहान आहे नको असे ग्रुहमंत्र्याकडुन मिळालेले कारण (ग्रुहमंत्र्यांचा स्वता राजस्थान दौरा झाल्याने आम्हाला नेहमी प्लॅन बदलावा लागत आहे..

निसर्ग, शेती आणि शेतकरी

लेखक स्वधर्म यांनी गुरुवार, 08/01/2015 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच मिपावर उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं हा लेख वाचला. त्यावर भरपूर प्रतिक्रीयाही आल्या. त्यानिमित्ताने मनात आलेले काही विचार... शेतकरी हा एक अत्यंत अन्यायग्रस्त घटक अाहे अशी हाकाटी नेहमी एेकू येते़़. त्यात बर्याच प्रमाणात तथ्य आहेही. पण शेतकर्‍यांकडे परिक्षणाच्या दृष्टीने पाहिले तर बर्याच गोष्टी आश्चर्यकारकरित्या आपल्या समोर येतात. शेतकरी हे पूर्वी आपले व आपल्या कुटुंबाचे पोट प्रथम भरून मगच उरलेल्या उत्पन्नाची विक्री करायचे.

(लेखणीने)

लेखक सूड यांनी गुरुवार, 08/01/2015 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
काथ्याकुटास व्हावे तय्यार लेखणीने भक्षण घटीपळांचे करण्यास लेखणीने स्वविरोधी बोलण्याला मातीत लोळवावे माझे खरे म्हणावे नखदार लेखणीने मसीहा चितारण्याची अवगत कला करावी औक्षण जणू स्वत:चे करण्यास लेखणीने अफवादि निर्मितेला जेथे उभार तेथे पेरुन बीज यावे रुजण्यास लेखणीने भाकड-वृथा कथांच्या कक्षेमध्ये फिरावे अभिजात सृजनाला डसण्यास लेखणीने वाणी अरण्यरुदनि शिरजोर होई तेव्हा संपादकांनी यावे धरण्यास लेखणीने जेव्हा सदस्य करिति वादळ विराट तेव्हा द्यावे अभय म्हणावे पळण्यास लेखणीने -अंगावर उठे 'शबय शबय'

जडण-घडण १७

लेखक माधुरी विनायक यांनी गुरुवार, 08/01/2015 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस मुंबईच्या पावसाच्या लौकीकाला साजेसा कोसळत होता. आम्ही दोघांनी ठरलेल्या भागापर्यंत प्रवास केला आणि स्वतंत्रपणे कामाला सुरूवात केली. दुपारच्या जेवणाच्या वेळी भेट झाली, तेव्हा आणखी कोणीच ठरलेल्या ठिकाणी आलं नसल्याचं समजलं. आमचं जेवण झालं आणि त्यानंतर मित्राने बाहेरून ऑफीसमध्ये फोन केला. बरेच जण पावसामुळे आलेच नसल्याचं समजलं आणि दुपारनंतर आम्ही घरी गेलो तरी चालेल, असंही सांगण्यात आलं. तासभर सोबत काम करून परतायचं ठरवलं आम्ही दोघांनी. दिवसभरातल्या आणि इतर फुटकळ गोष्टींबद्दल बोलताना तास भरकन गेला.

श्री ग्रंथराज दासबोध अभ्यास

लेखक विटेकर यांनी गुरुवार, 08/01/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या ताण- तणावाच्या आणि धकाधकीची जीवनात आपल्याला थोडेसे मनः स्वास्थ्य, आंतरिक समाधान मिळाले तर हवेच आहे. पूजा-अर्चा, व्रत-वैकल्ये करण्यास विज्ञानवादी मन धजवत नाही आणि ते शक्य ही होत नाही. अशावेळी काही व्यावहारीक विचार सांगणाऱ्या आणि आचरणात आणण्यासारख्या 'ग्रंथराज दासबोधाचा' खूप उपयोग होतो, असा स्वानुभव आहे. दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनात नैराश्य प्रसंगी मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात घेऊन तो आचरणात आणण्याचे बल देतात. आत्मविश्वास वाढवतात.