Skip to main content

उत्कंठावर्धक 'बेबी'

लेखक उडन खटोला यांनी रविवार, 25/01/2015 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
'बेबी'हा सिनेमा २३ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला ,तो काल पाहिला .'अ वेडनस्डे' आणि 'स्पेशल २६ 'सिनेमानंतर दिग्दर्शक नीरज पांडे यांचा 'बेबी'हा जबरदस्त चित्रपट आहे . 'बेबी' हे एक अंडरकव्हर युनिट आतंकवाद नष्ट करण्यासाठी कार्यरत आहे. या युनिटचा मुख्य फिरोज खान (डॅनी डेन्जोंगपा) आणि अजय सिंह राजपूत (अक्षयकुमार) त्याच्या विश्वासातील काऊंटर इंटेलिजेन्ट एजेंट असतो. पाच वर्षांत दहशतवाद नष्ट करण्याचे त्यांच्या युनिटचे लक्ष्य असते. दुसरीकडे, सीमेवर बसलेला मास्टर माइंड आतंकवादी मौलाना मोहम्मद रहमान (पाकिस्तानी अभिनेता रशीद नाज) भारतात राहाणार्‍या मुस्लिमांना जिहादी बनवण्यासाठी प्रयतत्नशील आहे .

येल विश्वविद्यालय, अमेरिका परीसर

लेखक बेमिसाल यांनी रविवार, 25/01/2015 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
1 विश्वविद्यालया कार्यालया समोरचा हा रस्ता. 2 विश्वविद्यालयाचे विजिट सेंटर 3 ही एक खूप प्राचिन ईमारत आहे.

वसंत पंचमी - एक आनंदोत्सव

लेखक विवेकपटाईत यांनी रविवार, 25/01/2015 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
काल वसंत पंचमी होती, सकाळी गल्लीत एके ठिकाणी सरस्वती पूजा होत होती. बर्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आठवली, गाडीतून दिल्लीला परतत होतो. सकाळची वेळ होती. खिडकीतून बाहेर बघत होतो, सर्वत्र दूर दूर पर्यंत शेंतात पिवळ्या फुलांनी नटलेली सरसों दिसत होती. अचानक धुक्याचा परदा चिरत सूर्य नारायणाने दर्शन दिले. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात, धरती न्हाऊन निघाली. असे वाटले जणू धरतीमातेने सुर्वर्ण गालिचाच पांघरलेला आहे. ते अद्भुतरम्य, अस्मरणीय दृश्य पाहून रात्रभर थंडीने कुडकुडनार्या प्रवासींचे चेहरे ही आनंदाने उजळून निघाले.

शंका: बेळगाव महाराष्ट्रातच हवे ही मागणी नक्की कशासाठी?

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 25/01/2015 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, बेळगाव प्रश्न या विषयावर इथे पूर्वी चर्चा झालेली असणार यात तिळमात्र संदेह नाही. परंतु मला या भांडणाचा उलगडा अद्याप झालेला नाही, म्हणून पुन्हा एकदा हा मुद्दा मांडतो. बहुतांश आयुष्य महाराष्ट्राबाहेर (जरी भारतातच) काढलेले असल्यामुळे महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्न हा मला एक निरुद्योगी (किंवा मतलबी) लोकानी जाणूनबुजून धुमसत ठेवलेला मुद्दा वाटतो. याची कारणे खालीलप्रमाणे: १. आजच्या भ्रमणध्वनी, उपग्रह वाहिन्या, आंतरजाल या सुविधांनी युक्त अशा जीवनाने भौगोलिक सीमा हा प्रकार (निदान देशांतर्गत तरी) रद्दबातल ठरवलेला आहे.

गुंतता ह्रदय हे.....

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 25/01/2015 04:28 या दिवशी प्रकाशित केले.
लेकी सुनांच्या संसारात आईवडील मायेपोटी गुंतलेले असतात. एकमेकांना असलेल्या व्यावहारिक गरजांचे धागे जरी ह्या गुंतण्यात असले तरीही, आपल्या माणसांविषयीच्या प्रेमाचे रेशमी धागेच ह्या भावनिक गुंतण्यांत अधिक असतात. बरेचदा असे दिसते की नात्यांचे रेशमी बंध व्यवहार, व्यवसायांच्या काट्यांमधे अडकून दुखावले जातात. मग तयार होतो एक विचित्र गाठींचा गुंता...... माझ्या गप्पा ह्या लघुकथेमधे मला असेच काहिसे दाखवायचे होते. पण ते इतक्या सगळ्या शब्दांच्या गुंत्यामधे न अडकता. एखाद्या कवितेसारखे...

अल्लाल शेती

लेखक दादा पेंगट यांनी रविवार, 25/01/2015 02:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी झाडीपट्टीत राहतो. महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे चार जिल्हे म्हणजे झाडीपट्टी. कोकणानंतर सर्वाधिक पाऊस इकडेच पडतो म्हणतात. तसेच तलावांची साखळीच आहे आमच्याकडे. त्यामुळे धानाचे पीक प्रामुख्याने घेतले जाते. आमच्याकडे मोठे उद्योगधंदे वगैरे नाहीत. मोठी शहरे नाहीत.(आमचे चंद्रपूर त्यातल्या त्यात थोडे मोठे म्हणता येईल.) शेतीवरच सगळी भिस्त आहे. आमची फार शेती नाही. शेतीवर आता पोट नसले तरी कधीकाळी शेतीचा मोठा आधार होता. यंदा माझ्या घरी पावसाळी धानाचे 2 एकरात 16 हजार एकूण खर्चात 57 हज़ार एकूण उत्पन्न मिळाले. म्हणजे 41 हज़ार निव्वळ नफ़ा. एकरी 20.5 हज़ार फक्त.

शरयत

लेखक आतिवास यांनी रविवार, 25/01/2015 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी साळा. कालच्याला अब्यास न्हौता, लई खेळ्ळो. तीन पायाच्या शरयतीत नुस्ती पडापड. तोंडात चम्चा अन चम्च्यात लिंबू ठिवून पळायचीबी येक शरयत. सोपी नसतीय. पन माजा पैला नंबर आला. आज साळंत झेंडा उबारला. समदी झ्याक ‘जनगणमन’ बोल्ली. कोणकी आजीबाई आलत्या, तेंनी कायबाय सांगितलं. समजलं नाय काय मला, तरीबी म्या टाळया वाजिवल्या. मंग बक्शीसं दिली. अंक्याला लब्बर, भान्याला पटटी. गुर्जीन्नी मला बोलिवलं. म्या आज्जीबाईच्या जवळ ग्येली. त्या म्हन्ल्या, “बाळ, तुला मोठेपणी काय व्हायचं आहे?” “शरयतवाली” म्या बोल्ली. त्या हसल्या. म्हन्ल्या, “आमचीही शर्यतच चालू आहे कधीपासून.

चायनीज भेळ

लेखक hitesh यांनी शनिवार, 24/01/2015 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ:  २० मिनिटे लागणारे जिन्नस:  पाव किलो कोबी चायनीज शेव - मला वाटले होते हे मैद्याचे असेल. पण पाकिटावर चक्क तांदळाची चकली असे लिहिले आहे. चटणीसाठी - लाल टोम्याटोचा कीस , कांद्याचा कीस , शेजवान चटणी , टोम्याटो सॉस , थोडे तेल , मीठ , लाल तिखट क्रमवार पाककृती:  आधी चटणी करुन घ्यावी. चार चमचे तेल गरम करुन त्यात कांद्याचा कीस , टोम्याटोचा कीस , शेजवान चटणी , सॉस , तिखट व मीठ घालुन परतावे. लालभडक मस्त चटणी तयार होते. नुसतीच शेजवान चटणी च सॉस मिसळुनही दाट व तिखट चटणी होऊ शकेल. कोबी किसून घ्यावा. त्यात चायनेज शेव व चटणी मिसळावी.

वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 24/01/2015 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
शब्दात गझल वेड्या गावेल का कधी रे? मोजून फक्त मात्रा साधेल का कधी रे? करतोस काय गप्पा नुसत्याच काफियांच्या? वगळून आशयाला चालेल का कधी रे? नाही मनात श्रद्धा, अन् हात जोडलेले दगडात देव आहे वाटेल का कधी रे? खुर्चीच माय झाली स्वार्थांध मानवाची सत्तेशिवाय त्याचे भागेल का कधी रे? टाळून याचकाला, अभिषेक सावळ्याचा वेड्या, विठू तुलाही पावेल का कधी रे? व्हावे 'विशाल' आता, कोतेपणा गळावा वृत्ती मनामधे ही बाणेल का कधी रे? विशाल...
काव्यरस