Skip to main content

बावन्नकशी अभिनयाचा राजकुमार ’फारुक शेख’ !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 21/01/2015 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
नववी - दहावीचा काळ , खासकरून दहावीचा काळ थोडा विचित्रच होता, किंबहुना तो तसा असतोच. विचित्र एवढ्यासाठी की बरोबरच्या कुठल्याही मित्राला अगदी सुटीच्या दिवशी जरी विचारले,"चल बे, पिक्चर टाकु आज" , तर एकच उत्तर मिळायचे ... "नाही बे, दहावीचे वर्ष आहे. अभ्यास कसला डेंजर आहे. आई-बाबा हाणतील धरुन पिक्चरला जातो म्हण्लं तर." मला हे थोडंसं विचित्रच वाटायचं कारण माझ्या आई-वडीलांनी मला कधीच अभ्यासाला बस म्हणून तंबी दिल्याची आठवत नाही. परीक्षेला गुण कमी पडले म्हणून शिव्या किंवा मार बसल्याचे आठवत नाही. (एक बारावी सोडली तर कधीच ७०% च्या खाली आम्ही उतरल्याचेही आठवत नाही ही गोष्ट अलाहिदा).

भेटवस्तू

लेखक शिरीष फडके यांनी बुधवार, 21/01/2015 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
भेटवस्तू पूर्वीच्या काळी दळणवळणाची फारशी साधनं नव्हती. एका गावातून दुसर्या गावात जाण्यासाठी बरेच दिवस लागायचे. कधी कधी तर कित्येक महिने प्रवासात जायचे. त्या काळी मुलगी एका गावातून दुसर्या गावात लग्न करून जाणं म्हणजे मुलगी फार दूर गेली असं आईवडिलांना वाटायचं. कारण कधी कित्येक दिवस, कधी कधी कित्येक महिने, कधी तर कित्येक वर्षं आईवडिलांची आणि मुलीची भेटच व्हायची नाही. जी काही भेट व्हायची ती पत्रातूनच. अशाच एका आईवडील आणि त्यांच्या लाडक्या मुलीच्या बाबतीतली ही एक छोटीशी गोष्ट. मुलीचं नुकतंच लग्न झालं आहे. लग्न होऊन ती दुसर्या गावात (सासरी) नांदायला गेली आहे.

दे दणादण

लेखक निनाद यांनी बुधवार, 21/01/2015 06:04 या दिवशी प्रकाशित केले.
बंधन पद स्वीकृति त्वरे त्वरण परित्याग कर्तव्यार्थ असे शोषण प्लावन हे सहाधिकारी ते प्रवण समयसारणी हे निकट हे स्तरण पोतनिहाय नव्हे संवृत वर्गीकरण आकाशग मग कुंडल तंतु भारण पेशीभारण अभ्यंतर सयंत्र रोपण बंधन हे मूक कुंडलित अनुकूलन प्रतिपिंड ऋणाग्र भाव का अकरण ग्राभित विदरण का विरुप निःशोण रक्त विलयक नि प्रवाह प्रतिरुपण संमीलनीत स्फुल्लिंग निग रोपण विद्रधि युद्ध-संरूपणात हो संपादन वेदन प्रतितलीत बिंदुचे साक्षांकन कंकोळ असे कंप्रता नियंत्री धारण अभिनति दे अर्धपद्धति दे दणादण

गर्तेत जाणारे जागतिक अर्थकारण : अशक्तांबरोबर सशक्तांचाही कपाळमोक्ष अटळ आहे

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी बुधवार, 21/01/2015 01:49 या दिवशी प्रकाशित केले.
जगाची अर्थिक विभागणी हे जग अर्थिक दृष्ट्या सर्वसाधारणपणे "आर्थिकदृष्ट्या सबळ आणि देणेकरी उर्फ सधन पुढारलेले देश आणि म्हणुनच दादा देश" आणि "आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि घेणेकरी उर्फ विकसनशील / अविकसित देश आणि म्हणूनच दादा देशांवर कमीजास्त प्रमाणात अवलंबून असलेले देश" असे विभागलेले गेलेले आहे. अर्थकारणाचे राजकारण आणि राष्ट्रिय कर्जे जगातल्या सर्व देशातल्या सर्व जनतेला आपली आर्थिक स्थिती उत्तरोत्तर वर वर जावी असे वाटते... विकसित / अविकसित देशांच्या जनतेत याबाबत तत्वतः फरक नाही.

आर्ट ऑफ द स्टेट - भाग ०२

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 20/01/2015 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आर्ट ऑफ द स्टेट भाग -०१ http://misalpav.com/node/29885 ' हेम्या, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी, मी खुप घाबरलो होतो, माझी फॅमिली, पोरी त्यांचं भविष्य, मी घाबरलो होतो रे खुप, माफ कर मला हेम्या माफ कर' भाग -०२ 'माफी अन बिना शिक्षेची, माणसांवरचा विश्वास कधीच उडालाय रे माझा, शिक्षा करणारच तुला, तसा नाही सोडणार, घाबरु नकोस शिक्षा पैशाचीच असेल आणि आयुष्यातुन उठवणार नाही तुला एवढं लक्षात ठेव.' - एवढं वाक्य दिसलं, अन माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली, जाग आली तेंव्हा मी बेडवर झोपुन होतो, बायको समोर बसुन होती, अन दोन्ही पोरी तिला बिलगुन उभारल्या होत्या.

राधा कृष्ण

लेखक शिरीष फडके यांनी मंगळवार, 20/01/2015 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
राधा कृष्ण राधा आणि कृष्णाचं नातं काय? या प्रश्नाबद्दल बरेच वाद आहेत. कुणी म्हणतात, राधा केवळ कृष्णाची भक्त होती. कुणी म्हणतात ती केवळ त्याची प्रेयसी होती. पण राधा-कृष्ण हे पती-पत्नी असण्याबद्दल बर्याच शंका-कुशंका आहेत. थोडक्यात काय तर राधा ही कृष्णाची प्रेयसी किंवा भक्त होती आणि याचे संदर्भ बर्याच ग्रंथात सापडतील. कृष्णाची पत्नी कोण हा प्रश्न समोर आला तर उत्तरादाखल पुढील नावं येतील – रूक्मिणी, सत्यभामा, जांबवती, नग्नजित्ति, लक्षणा, कालिन्दि, भद्रा आणि मित्रवृन्दा. तशा कृष्णाच्या सोळा सहस्र पत्नी होत्या. पण कृष्ण-राधा हे पती-पत्नी नव्हते, मग त्यांचं नेमकं नातं काय? ते कितपत योग्य?

नारायण धारप यांच्या भयकथा !!!

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 20/01/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
भयकथांचे जे भोक्ते आहेत त्यांना नारायण धारप हे नाव माहीत नाही असे होणार नाही. मराठीत जे मोजके भयकथाकार आहेत त्यात नारायण धारप हे पितामह ठरावेत. अंगावर सरसरून काटा येईल अशी शैली आणि मांडणी हे धारपांचे वैशिष्ट्य. त्यांचीच "चंद्राची सावली " ही गोष्ट वाचतांना लहानपणी सर्वजण घरात असूनही अंगावर शहारे आले होते. स्वतः विज्ञानात पदवीधर असल्यामुळे त्यांची भीतीची मांडणीदेखील अतिशय शास्त्रोक्त अशी असावी. जवळपास सर्व पुस्तकात असलेला समान धागा म्हणजे चांगल्या शक्तींचा वाईटावर विजय. त्यामुळे भीतीदायक वातावरणनिर्मिती करूनही शेवटी एक दिलासा असायचा.

सुख म्हणजे दुसरे काय असते ?

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 20/01/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
माझं समुद्राचं वेड, त्याच्याशी असलेलं नातं तसं खुप जुनं आहे. अगदी सातवी आठवीत असल्यापासुनचं. अगदी सुरुवाती-सुरुवातीला, सकाळच्या वेळी समुद्राच्या कुशीतून हळुवारपणे वर येणार्‍या किंवा त्याच्या मिठीत सामावून जाणार्‍या, मालवणार्‍या दिनकराचे दर्शन हा खरेतर मुळ हेतु असायचा. आणि मग एकदा का सुर्योदय अथवा सुर्यास्त होवून गेला की तेव्हा कुठे त्या समुद्राकडे लक्ष जायचे.... जसं तारुण्याचे वेध लागले तसे सुर्यनारायणाची ओढ कमी व्हायला लागली.