Skip to main content

स्वच्छ भारत अभियान की पब्लिसीटी स्टंट ??

लेखक Sanjay Kokare यांनी शुक्रवार, 23/01/2015 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत साकार करण्याकरता माननीय पंतप्रधान यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषना केली.सामान्य नागरीकापासुन मोठमोठ्या सेलीब्रेटी, नेत्यापर्यंत पर्यंत स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद मिळत असल्याबाबत बोलल्या जात आहे, त्यांना मिडीया द्वारे बरीच प्रसिद्धपण मिळत आहे. पण ज्या महापुरूषांनी आपले पुर्ण जिवण स्वता झाडु घेउन, सतत रस्त्यावर उतरुन, रस्ता साफ करुन स्वच्छतेचा संदेश लोकांना दिला आज त्या महान पुरुषांच नाव भारत स्वच्छ अभियाना अंतर्गत डावलल्या जात आहे ही एक शोकांतीका आहे. मा.

पोपटी

लेखक जागु यांनी शुक्रवार, 23/01/2015 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
हवेत गारवा आला, थंडी पडू लागली की चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. पावसाळा संपुष्टा आलेला असतो पण अजुनही ओलसर असलेल्या जमीनीमुळे व हवेतील थंड अशा अनुकुल वातावरणामुळे भाज्यांचे मळे हिरवेगार होऊन त्यावर वालाच्या व विविध शेंगा, वांगी, मिरच्या, नव अलकोल भाज्यांची भरभराट होऊ लागते. आमच्या उरणमध्ये जांभळ्या कडेच्या मेदळ नावाच्या वालासारख्या चविष्ट शेंगाही ह्या सिझन मध्ये पर्वणी आणतात. बाजारपेठेतही ह्या भाज्यांच्या राशी रांगोळीप्रमाणे रचलेल्या दिसतात. ह्या भाज्या आणि थंडी ह्यांचा मिलाप झाला की पोपटी पार्टीचे आयोजन जिथे तिथे होताना दिसते.

जा री जा री ओ कारी बदरीया.......

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 23/01/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी कसं होतं ना? एखादा संगीतकार , एखाद्या चित्रपटात एका वर चढ एक सुंदर गीते देवून जातो. मग प्रेक्षकाची - श्रोत्याची अवस्था "देता किती घेशील दोन कराने" (इथे "ऐकता किती ऐकशील दोन कानाने" असे वाचायलाही हरकत नाही ;) ) अशी होवून जाते. पण या सगळ्या आनंदात बरेच वेळा असेही होते की अत्युत्तम असे काही ऐकताना त्याच चित्रपटातील एखादे साधेच पण नितांत सुंदर असलेले गाणेही नकळत दुर्लक्षीत होऊन जाते. आता हेच बघा ना. श्री. एस.एम.श्रीरामलु नायडू या यंडु गुंडू वाटणार्‍या नावाच्या माणसाने १९५५ साली युसुफसाब उर्फ दिलीप कुमार आणि मीनाकुमारी यांना घेवून 'आझाद' नावाचा एक तद्दन मसालापट काढला.

गप्पा

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 23/01/2015 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
आज्जी हे बघ मिकी काय म्हणतो आहे! काय म्हणतोय? पोळ्यांची कणीक मळता मळता तिने स्वैपांकघरातून ओरडून विचारले. टीवी लाव म्हणतो आहे। तेला कार्टून बगायचे आहे. मिकीला की तुला? नाय, मिकीला! चल गप्पिष्ट कुठला. असा आजीचा काहीना काही संवाद दिवाणखान्यात एकटाच खेळणा-या दीपशी स्वैपांकघरातून तार स्वरात ओरडून सुरू होता. ओरडून घसा दुखला तशी भराभरा हातातले काम संपवून ती दिवाणखान्यात आली. आज्जी, हे बग, मी डंपर, डिगर सगळे बाहेर काढले. आज्जी हा मानूसला आत बसव नां ए आज्जी फ़ायर ईंजीन वी वौ वी वौ अस कां करतं? अरे त्याला लवकर जायच असत ना, म्हणून लोकांना रस्त्यातून बाजूला करायला आवाज करतं वी वौ वी वौ ....

देवस्थाने आणि भटजी....

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 23/01/2015 01:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुळात माझे आणि देवाचे नाते फारच घट्ट. मी मागावे, हट्ट करावा आणि त्याने द्यावे, हा आमच्या दोघां मधला अलिखित नियम.देवाच्या दरबारात मध्यस्थाची गरज नसते, हा माझा अनुभव आणि आमच्यापेक्षा आमच्या बायकोचे देव जास्त ऐकतो, हा दुसरा अनुभव.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- २४

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 23/01/2015 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भाग.. आपण देवकी आणि यशोदा ह्या अवस्था फक्त महापुरुषांच्या बाबतीतच का पाहाव्या? माझ्या मते त्या अत्यंत सार्वत्रिक, सहज आणि मूलभूत आहेत. फक्त त्या कुणाला लाभतील,हा मात्र त्या (अगम्य) नशिबाचाच भाग आहे.. पुढे चालू... ======================================= पहिले सहा महिने संपले..दिवाळीची सुट्टीही झाली. आणि आंम्ही सर्व मुलं पळत पळत पाठशाळेत परत आलो. अगदी ठरल्या दिवशी! माझ्या घरून निघायच्या एक दोन दिवस अलिकडे तर.. आज्जीला, माझ्यावर शाळेतून कुणी चेटूक केलय की काय???

भुलेश्वर मंदिरातील पौराणिक शिल्पपट

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 22/01/2015 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर ह्याआधी यवतच्या यादवकालीन भुलेश्वर मंदिरावर असंख्य लेख तसेच छायाचित्रे येऊन गेलीत. पण इथल्या पौराणिक शिल्पपटांचे फारसे वर्णन आल्याचे मात्र अजिबात दिसले नाही. त्यामुळे ह्या लेखाद्वारे मी मंदिराचे इतर वर्णन न देता येथील काही पौराणिक शिल्पपट उलगडून दाखवण्याचा मात्र अल्पसा प्रयत्न करतोय. रामायण, महाभारतातील प्रसंगांच्या शिल्पपटांबरोबरच येथील काही आगळीवेगळी शिल्पेही आपण विचारात घेऊयात. भुलेश्वर मंदिरात रामायण आणि महाभारताचे प्रत्येकी तीन शिल्पपट आहेत. ह्या शिल्पपटांची मूळची जागा म्हणजे नंदीमंडप आणि सभामंडपातील दर्शनी भाग आणि त्याच्या काटकोनात डाव्या उजव्या बाजूंना.

सर्वोच्च न्यायालयाचा बीसीसीआय ला झटका

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 22/01/2015 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
पॅरिसमधील हत्याकांडाच्या धाग्यावर विषय क्रिकेटकडे वळला आणि त्यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही एक सरकारी संस्था नसून एक खाजगी संस्था आहोत व 'भारतीय क्रिकेट संघ' या नावाने ओळखला जाणारा व कोट्यावधी भारतीय ज्या संघाला आपल्या भारत देशाचा क्रिकेट संघ आहे असे मानतात, तो संघ भारत या देशाचे प्रतिनिधित्व करीत नसून बीसीसीआय या खाजगी संस्थेचे प्रतिनिधित्व करतो असा दावा काही जणांनी केला. या दाव्याला आधार म्हणून बीसीसीआयने काही वर्षांपूर्वी 'आपण एक खाजगी संस्था असून क्रिकेटचा संघ हा भारत या देशाचे प्रतिनिधित्व करीत नसून बीसीसीआय या खाजगी संस्थेचे प्रतिनिधित्व करतो.

शाईचे थेंब.

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 22/01/2015 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
शाईचे थेंब. कागदावर टाकले. उमटले काही विचार, चित्रही उमटले. एक एक ठिपका आकार घेत जातो, मनातला विचार धावतो त्याच्यामागे साचलेले काळे काही पसरत गेले, सांगत गेले काहीतरी नेहमीच माहित असलेलं (छ्या… नाही जमत.

सामंत

लेखक चाणक्य यांनी गुरुवार, 22/01/2015 17:02 या दिवशी प्रकाशित केले.
'गांधी येडा होता रे' सामंत नेहमी म्हणतो आणि मग फोडला पायजे...XXत दम...ईस्रायल... असं कायकाय बोलत राहतो दोन पेग चढवलेले असतील तर सामंत अध्यात्म, सेक्स, मायन संस्कृती, काश्मीर प्रश्न यावर पण बोलतो 'नेहरू एक्झॅक्टली कुठे चुकला' हे सांगतो मग तो. सामंतला ब-याच गोष्टींबद्दल माहिती असते ....वरवरची आणि माहिती नसलेल्या गोष्टींबाबत सामंत 'अमेरीकेचा गेम आहे सगळा' असं म्हणतो अमेरीका नक्की काय करते ते त्यालाही माहिती नसतं पण त्याने त्याला काही फरक पडत नसतो खरंतर, कुणालाच काही फरक पडत नसतो कारण 'अमेरीका गेम करते' म्हणल्यावर सगळे माना डोलावतात. सामंत बोलतो... माहिती असो वा नसो ...सामंत बोलतो आणि बेधडक आप