Skip to main content

जंगल पूर्वीचे आज महानगर झाले

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 30/05/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
जंगल पूर्वीचे आज महानगर झाले पहिल्या पेक्षा जास्त खतरनाक झाले. भरल्या पोटी वाघ करत नव्हता शिकार. बेधुंध कार आज कधीही घेते प्राण. तेंव्हा दरवळत होता सुगंध मलयज गिरीचा. पेट्रोलच्या वासाने आज कासावीस होतो प्राण. कांव कांव कावळ्यांचे घरटे उंच मीनारांवर अंगणातली चिवताई कुठे हरवली आज.
काव्यरस

तनू वेड्स मनू रिटर्न

लेखक पुणेकर भामटा यांनी शनिवार, 30/05/2015 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो काल तनू वेड्स मनू रिटर्न पाहिला, पहिला असा चित्रपट जो मला अगदी पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत आवडला. साधी आणि सुंदर कथा, मोजक्याच व्यक्तिरेखा, चांगले कलाकार, नैसर्गिक अभिनय, साधे संवाद, साधी लोकेशन्स, प्रसंगानुरूप गाणी आणि योग्य सादरीकरण. चित्रपटाची कथा सांगावी अशी नाही ती प्रत्यक्ष चित्रपटगृहात जाऊन अनुभवावी अशी आहे. चित्रपटात कुठेही ओढून ताडून केलेले विनोद नाहीत किवा प्रेक्षकांच्या भावना पिळवटून रडवाणूक नाही. शेवटचा प्रसंग तर अतिशय उत्कृष्ट रित्या हाताळला आहे.

शिक्षणाच्या नावानं चांगभलं !

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 29/05/2015 20:47 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षणाच्या नावानं चांगभलं ! ( मध्यंतरी R. H. Reeves या शिक्षणतज्ञाची ‘The Animal School’ ही कथा वाचनात आली. तशा बऱ्यापैकी माहित असलेल्या या कथेचे मराठीकरण आणि डिटेलीकरण करून आपल्या समोर ठेवत आहे! लवकरच आपल्याही मुलांच्या शाळा सुरु होतील! हे औचित्य साधून आपणही निरीक्षणं, नोंदी आणि आत्मपरीक्षण करायला काय हरकत आहे?) आधुनिक जगातील आव्हानांना समर्थपणे भिडता यावे म्हणून जंगलात, प्राण्यांसाठी एक शाळा सुरु करायचे ठरले. शाळा म्हटले कि अभ्यासक्रम आला! त्यांनी मग परंपरेला छेद देत, विविध क्षमतांचा विकास करणारा क्षमताधिष्ठीत अभ्यासक्रम सुरु केला.

जनातलं, मनातलं.

लेखक द-बाहुबली यांनी शुक्रवार, 29/05/2015 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
तो... जगं जिंकायची इच्छा मनात होती तेंव्हा कधी स्वतःला गमावायची वेळ येउ शकते याची पुसटशी शंकाही त्यावेळी आली न्हवती. तो उन्मादच वेगळा होता. मनात येइल ते करु जाण्याचा. याच आत्मविश्वासापोटी तर त्याने अख्खे जग जिंकायचा अघोरी प्रयत्न सुरु केला होता. त्याच्या व्यक्तीमत्वावर, शौर्यावर, हुशारीवर, महत्वाकांक्षेवर भाळुन अनेकांनी त्याला नुसती साथच न्हवे तर त्याच्यासाठी प्रसंगी प्राणाची आहुतीही दिली होती. अजुनही कित्येक तयार होते त्याच्या एका शब्दावर सर्वस्व पणाला लावायला. स्वतःपेक्षा तत्व मोठे हा धडा तर त्यानेच सर्वांना शिकवला होता. त्याआधारेच आत्तापर्यंत त्यांची वाटचाल झालेली होती.

कोकण वारी - २०१५

लेखक स्पा यांनी शुक्रवार, 29/05/2015 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कारम, मागच्या आठवड्यात दरवर्षीप्रमाणे कोकण दौरा झाला, यावर्षी उकाडा प्रचंड असल्याने ठरलेल्या प्लान मध्ये बरेच बदल झाले.मालवण /तारकर्ली करणार होतो, पण आयत्यावेळी ते रद्द केले. पर्यायी मार्ग मुंबई-पनवेल-टोळफाटा-मंडणगड-दापोली-दाभोळ बंदर –धोपावे(जेट्टी )- गुहागर(मुक्काम)- हेदवी-तवसाळ(जेट्टी)-जयगड-रीळ-मालगुंड-गणपतीपुळे- आरेवारे- रत्नागिरी- पावस –आडिवरे असा ठरला. सकाळी नेहमीप्रमाणे ५ लाच सगळी तयारी करून बाहेर पडलो. वातावरणात अजिबात गारवा नव्हता. पनवेल सोडून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो, रस्त्याची इतकी वाईट अवस्था कधीही पाहिलेली नव्हती, जी परिस्थिती २ वर्षांपूर्वी होती, तीच आजही होती.

चर्चा नको? वाद हवा??

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 29/05/2015 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
ज्यांना समस्येवर तोडगा नको असतो आणि समस्या तशीच कायम ठेवायची असते ते चर्चेला किंवा संवादाला नेहेमी नाही म्हणतात. त्यांना वाद किंवा विवाद हवा असतो पण संवाद नको असतो आणि टोकाची भूमिका घेऊन आपणच बरोबर आहे हेच सिद्ध करायचे असते. कारण संवादाने किंवा चर्चेने समस्येचे निराकरण झाले तर मग सतत समस्येचे रडगाणे गाऊन इतरांना दोष द्यायला काही कारण उरत नाही. काहीजण चर्चेला किंवा संवादाला यासाठी नाही म्हणतात की त्यांना स्वतःच्या विचारसरणी पेक्षा वेगळी विचारसरणी ऎकायची किंवा स्वीकारायची नसते.

शब्द झाले मोती...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 29/05/2015 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मनात होते.. आपण फक्त लिहावे .. उत्स्फुर्त.. तेंव्हाच सुचलेले ...दूसर्याने त्यावरती रिप्लाय मध्ये लिहावे...त्याला जे वाटले ते... कधी विरुद्ध अर्थाने कधी पुरक अर्थाने.. मध्येच त्याला साजेसे कोणी चित्र टाकावे.. कवीने कविता/कडवी लिहावी ..पुन्हा आपण रिप्लाय मधुन त्या अनुषंगाने बोलावे... कधी आपल्याच आपल्याला रिप्लाय करावा खरेच असे होउ शकेल का .. उत्स्फुर्त लिखानाला वाव मिळेल का ? पण सुरुवात कुठुन करायची हेच कळेना.. उत्स्फुर्त लिखान म्हणजे कुठलाही विषय कसाही... नंतर त्या बद्दलचे विचार ... आणि कोणी तसेच रिप्लाय करतील का ? बघु सुरुवात करतो आहे..

एक थरारक प्रवास "किल्ले रांगणा" चा

लेखक ganeshpavale यांनी शुक्रवार, 29/05/2015 13:10 या दिवशी प्रकाशित केले.

ओळख किल्ल्याची

स्वराज्याच्या गडकोठाची सफर करण्याची मला खूप आवड आहे.. त्यात छ. शिवाजी राजांचा भक्त असल्याकारणाने त्यांचा इतिहास जवळून पाहण्याचा मोह तर खूपच. मला गडांना भेट द्यायला जास्त वेळ भेटत नाही. तरीही मी वेळ काडून गड किल्ल्यांना भेट देतो. आज पहायची इच्छा झाली तो इतिहासाचा साक्षीदार रांगणा किल्ला या किल्ल्याला पसिद्धगड असेही म्हणतात. समुद्र सपाटीपासून सुमारे ७७० मीटर उंचीवर असणारा हा किल्ला. शिलाहार वंशीय राजा महामंडलेश्वर भोज (दुसरा) ने इसवी सन ११८७ च्या आसपास बांधला. बहामणी राजा महमद गवाण याने इसवी सन १४७० मध्ये जिंकला.

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 29/05/2015 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक सुरकतलेल्या चेहर्‍यावरी तुझाच कयास उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं भुकेल्या पोटाला आता मातीची ढेकळं पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!! आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव हरवलं आता भान.. अंधारलं जग मिठीत तुझ्या विसावलं वेडं स्वप्नपान ------------- शब्दमेघ
काव्यरस