Skip to main content

अभोगी

लेखक यमन यांनी बुधवार, 09/09/2015 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यूचा रंग कसा असतो माहितेय तुम्हाला ? काळा ,खोल खोल काळा . त्याच्या जवळ येणाऱ्या प्रत्येकाला शोषून घेणारा . जिवंत प्राण्याला सहसा दिसणार नाही असा . काही लोक त्याच्या ओढिनेच मरण पत्करतात . मी नशीबवान . कितीही मोठा प्रतिभावान चित्रकार पकडू शकणार नाही असा हा रंग मी रोज अंगावर पांघरते . माझा आबा मरताना मला तीन लहान बहिणी आणि आमचं रक्त शोषणारी अपंग सावत्र आई देऊन गेला . आबा गेल्यावर पोटभर खायला मिळालंय असं फारसं झालंच नाही .लहान बहिणी भुकेपाई बाजारात बसायच्याच बाकी होत्या. पण देवाच्या दारात गर्दी खूप असावी . त्याला आम्हाला जगवत ठेवावं लागलं . देव निष्ठुर आहे त्याची सारखी प्रचीती देत.

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

दुष्काळवाडा भाग ९ मरण येथले संपत नाही

लेखक pradnya deshpande यांनी बुधवार, 09/09/2015 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
मरण येथले संपत नाही आत्महत्या दोनच महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये झालेल्या सर्वेक्षणात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी मिळाली. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना मन सुन्न झाले. केवळ नापिकी हे एकमेव कारण शेतकर्‍यांच्या आत्महत्यांमागे नाही हेही प्रकर्षाने जाणवले.

दमामि म्हणे किंवा विडंबनकाराची व्यथा किंवा चोराच्या उलट्या बोंबा

लेखक दमामि यांनी बुधवार, 09/09/2015 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
बहिर्वक्र म्हणा हवे तर , विडंबन हा आरसा देखणे वा कुरुप तुम्ही, फरक नाही फारसा... पाडती जिलब्या इथे , वर वापरुनी डालडा रंग नाही स्वाद नाही , जाहला अतिसारसा.. ट्रोलभैरवांचे जथे मुक्त फिरती हिंस्रसे हरून पडला नवमिपाकर त्यापुढे गपगारसा.. आक्रंदती मिपात आता राम नाही राहिला जाहले संस्थळ जणू कट्टा पडिक बेकारसा... सकस लिहिणारे मिपाकर आजला गेले कुठे "मापं" ओलांडुन जाती भरला इथे बाजारसा...

वर्तुळ - शशक

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 08/09/2015 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
"पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला.." पर्स मधील मोबाईल खणाणला. तिच्या गोबऱ्या गालावर हसु फुटले. बंदुकीची नळी सरळ करत तिनं माझ्यावर रोखली. धडाम्... मी जागीच कोसळलो. थरथरत्या हातातली बंदुक गळून पडली. घाईघाईने ती निघाली. मोबाईलबरोबर बंदुकही पर्समध्ये टाकायला विसरली नाही. पिटुकल्या स्कुटीवर बसुन वाड्याकडे निघाली. वाड्याजवळ येताच धुंद हसली. करकरत दरवाजा उघडला. धावतच वरच्या मजल्यावर आली. एकटाच होतो. मी निलाजरेपणानं बेधुंद प्रणयाची मागणी केली. ती त्याच्यासाठीच आली होती. शृंगारल्या डोळ्यांनी ती लाजुन चुर झाली. तेवढ्यात, "पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पारोला..

लोकमान्य टिळकांचे अग्रलेख विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 08/09/2015 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिस्रोत प्रकल्पात टिळकांचे केसरीतील लेख भाग ४ संकीर्ण लेख संग्रह (सामाजिक धार्मिक वाङमय विषयक) ग्रंथ उपलब्ध केला आहे. या ग्रंथाची पाने वाचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

(इच्छामटण)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 08/09/2015 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते.

मुंबई, काव्य आणि ललित साहित्यातील, 'ये है बम्बई मेरी जान'

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 08/09/2015 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई हा मराठी विकिपीडियावर ज्ञानकोशीय लेखाचा विषय असू शकतो; पण चर्चा पानावरील चर्चेचा विषय असू शकत नाही. अशा चर्चांना वाव देण्याचे काम मिसळपाव सारख्या मराठी संस्थळांचे.

--------अन----लग्न----------

लेखक अर्थहीन यांनी मंगळवार, 08/09/2015 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
भावाचं लग्न झालेलं आहे. -त्याला एक मुलगी आहे. माझं लग्न झालेलं नाही. गावाकडे आमची अडाणी काकू राहते. ती म्हणते. तुझ्या (म्हणजे माझ्या) आयुष्याला काहीही अर्थ नाही. (मी म्हणतो कोणाच्याही आयुष्याला काय अर्थ असतो?) म्हणजे मी शिकलो, engg झालो. परदेशात वगैरे तरी जाऊन आलो. अन आता चांगला (म्हणजे अजिबात काम नसलेल्या आरामदायी कंपनीत) जॉब करतो- तरी माझ्या आयुष्याला काहीच अर्थ नाही असं तिचं ठाम मत. कारण असं की- माझं लग्न होत नाहीये. म्हणजे मला साधं मुलगीही पसंत पडत नाहीये.