Skip to main content

दुष्काळ वणवा

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे, दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे, उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना, तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना, चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना, सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना.. विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले, मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले, उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले, भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे... पुढे वाढवली तरी चालेल..
काव्यरस

छि _ _

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 10/10/2015 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
छि _ ल, पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता. मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की करत पुढे आलं.

देवाचा 'सुपर कंप्युटर'

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 10/10/2015 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
सहज अस वाटल,कि देवा जवळ समजा सुपर कॉम्प्यूटर असला तर तो किती बिझी असेल,म्हणजे पहा ना प्रत्येकाच्या पाप अन पुण्यांचे हिशेब ठेवण प्रत्यक्ष देव जरी असला तरी लोकसंख्या इतकी आहे कि त्याला जिकिरीच जात असेल.एक तरी सुपर कोम्पूटर असेलच .e.g.
काव्यरस

पराडकर सर ......२ (अंतिम)

लेखक चुकलामाकला यांनी शनिवार, 10/10/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
पराडकर सर ........१ परदेशी स्थायिक झाल्यानंतर गावाकडच्या फेऱ्या तशा कमी झाल्या. मग ऑर्कुटवर सरांच्या माजी विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनला. त्यावर एका मित्राचा मेसेज आला की सरांना प्रोस्टेट कँन्सर डिटेक्ट झालाय म्हणून. सरांचे विद्यार्थी सर्व क्षेत्रात पसरले होते. भराभरा सुत्रं हलली. मुंबईला टाटामध्ये ट्रीटमेंट झाली. सर तीन चार महिन्यानंतर गावी परतले. आठवड्यातून दोनदा जवळच्या मोठ्या शहरात जाऊन इंजेक्शन घेऊ यावे लागे. शिवाय वॉकरही संगतीला घ्यावा लागे. सर कसलीही तक्रार न करता हसतमुखानं सगळं सहन करत होते.

शेअर्स मार्केट म्हणजे काय रे भाऊ

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी शनिवार, 10/10/2015 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट म्हणजे काय रे भाऊ? छोटू आणि गोटू या दोन भावांचा संवाद छोटू--शेअर मार्केट म्हणजे काय रे भाऊ? गोटू--अरे शेअर मार्केट म्हणजे किनई ,एक प्रकारचा बाजार असतो, जिथं एक माणूस तंयाचं डोकं ठिकाणावर नसल्यासारखं सतत कांहीतरी विकत घेतो,थोड्या वेळानं तीच वस्तु डबल विकतो किंवा त्याचया उलटहि करतो,दुसरा, तिसरा ,चौथाहि हेच करतो.ना इथं प्रत्यक्षात कोणी माल वा पैसे रोख देतो वा घेतो. छोटू--म्हणजे वेड्यांचा बाजार काय रे भाऊ? जिथे एकजण म्हणतो मी ताजमहाल विकत घेतला, दुसरा म्हणतो पण मी कुठे विकला? गोटू--अरे नव्हे नव्हे!शेअर मार्केट म्हणजे एक प्रकारचा

अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: ४ जोशीमठ दर्शन

लेखक मार्गी यांनी शनिवार, 10/10/2015 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .

माझ्या कविता

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कविता. .    काही शब्दांनी सजलेल्या . .    काही स्वप्नांनी भिजलेल्या. .    कधी भासांमधे अडकून    काही क्षणांमधे रुजलेल्या. . माझ्या कविता. .     कळत नकळत मनामध्ये विरलेल्या..     कधी कधी तर भावनाच विखुरलेल्या ..     कधी ओझरत्या आशेने खुललेल्या ..     तर कधी विखुरत्या रंगात फुललेल्या.. माझ्या कविता.
काव्यरस

स्वराज्य

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझे विचार.. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " असे लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारला ठणकावून सांगितले आणि 1949 साली आपल्याला स्वातंत्र मिळाले, पण आज खरचं आपल्याला स्वातंत्र मिळाले आहे का? खरचं आपल्याला स्वातंत्र्याचा अर्थ माहीत आहे का? या स्वातंत्र्याने काय दिले हे माहीत आहे का ?        संविधानाने आपल्याला काही अधिकार दिलेत ते तरी माहीत आहे का?  हां FC च्या टीचर सांगतात म्हणून आपल्याला काहीही बोलण्याचा ,आपले मत मांडण्याचा अधिकार आहे हे माहित आहे.      पण बोलणं म्हणजे नक्की काय? मत कधी व कुठे  मांडावे ?

सुखद श्रावणसरी

लेखक माहीराज यांनी शनिवार, 10/10/2015 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
गर्दी दाटून आली नव्याने काळ्या मेघांची अंबरात,, व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात.. आतुरली ही घरणी, आतुरले सारे पक्षी आस लावी मनाला निळ्या आभाळाची नक्षी, भरलेले आकाश दवाने पुन्हा बसरु दे निमिषात , व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबांची ब़रसात.. पंख पसरुनी मयुर हा जणु गातो मनी गाणे गंध दाटला मातीचा सुर छेडीले चातकाने ओढे,नाले,सरिता,डबके पुन्हा भरावी क्षणात व्हावी धरणी वरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
काव्यरस

धन्यवाद

लेखक सन्जोप राव यांनी शनिवार, 10/10/2015 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी, खरे तर वर्षांपूर्वी,'मिसळपाव' वरील माझ्या परिचित-अपरिचित मित्रांना मी माझ्या संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला मला उदंड प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादांचे विश्लेषण करुन काही महिन्यांपूर्वी मी माझा प्रबंध सादर केला. या प्रबंधाबद्दल नुकतीच मला पुणे विद्यापीठाकडून ‘विद्यावाचस्पती’ (पी.एच.डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये मला मदत करणाऱ्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानतो. यथावकाश या संशोधन प्रकल्पावर अधिक काही लिहिण्याचा माझा मानस आहे. पुन्हा एकदा धन्यवाद!