गर्दी दाटून आली नव्याने काळ्या मेघांची अंबरात,,
व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
आतुरली ही घरणी, आतुरले सारे पक्षी
आस लावी मनाला निळ्या आभाळाची नक्षी,
भरलेले आकाश दवाने पुन्हा बसरु दे निमिषात ,
व्हावी धरणीवरी सुखाने ओल्या थेंबांची ब़रसात..
पंख पसरुनी मयुर हा जणु गातो मनी गाणे
गंध दाटला मातीचा सुर छेडीले चातकाने
ओढे,नाले,सरिता,डबके पुन्हा भरावी क्षणात
व्हावी धरणी वरी सुखाने ओल्या थेंबाची बरसात..
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1232
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आहे कविता
बरं आसतय ह्या असल्या कवितांचं
आमच्या ओळखीचे एक कवी वेगळंच
In reply to बरं आसतय ह्या असल्या कवितांचं by अभ्या..