मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं. काल मी आणि श्री समर्थ असे दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत होतो.बोलता बोलता मधुमेह ह्या व्याधीचा विषय निघाला. “अलीकडे आपल्याकडे ह्या व्याधींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे “ असं मी समर्थांना म्हणालो. “जशी देशाची श्रीमंती वाढत चालली आहे तशी अनेक जणांची खाण्याची सवय वृद्धींगत होत चालली आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू एव्हडं जेवण घरी तयार करून ठेवण्यापेक्षा बाहेर उक्तं मिळत असेल तर बाहेर पैसे खर्च केल्यास घरी कष्ट कमी होतात.आणि बाहेर जेवण्याच्या सवयी वाढत असल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी खाण्याच्या सोई वाढत आहेत.

लाख म्हणू देत जगाला, ही संगत अटळ आहे

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
काव्यरस
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत तूझ्या माझ्या मनाचा निर्णय होता भेटण्याचा जसे बगीच्यात बहार असतां फुलांचा बहरण्याचा तुझे दू:ख आता माझे,माझे दू:ख झाले तुझे तुझे हे दोन नेत्र, चंद्र सूर्यासम झाले माझे लाख म्हणूदेत जगाला,ही संगत अटळ आहे हातात हात असल्याने, हे हात सुटणे अटळ आहे अरे, मला जीवनसाथ देणाऱ्या, प्रियतमा तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत

समाजमाध्यमांवरील निरागसता

सर टोबी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
साधारण १९९८ ला टर्निंग पॉईंट या संस्थेचं "फोरम" नावाचं तीन दिवसाचं शिबिर केलं होतं. व्यक्तिगत संबंध, कामाच्या ठिकाणी इप्सित ध्येय साध्य करण्यासाठीची बांधिलकी, आणि व्यक्तिगत प्रगती अशा गोष्टींवर काही नाविन्यपूर्ण कल्पनांच्या द्वारे स्वतःमध्ये बदल घडवून आणणे असा त्या शिबिराचा उद्देश असतो. आजकाल अशी शिबिरं आणि त्यातील गुरु यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याकाळी तब्बल तीन हजार खर्च करून आणि रोज किमान ९ तास श्रवणभक्ती करणं हे तसे नविनच होते.

हृदयसंवाद (३) : नाडी, रक्तदाब व ‘इसीजी’

हेमंतकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
भाग २ इथे .. .. .. हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत : 1. नाडी तपासणी 2. रक्तदाब मोजणी 3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी 4. इसीजी तपासणी इथे एक मुद्दा लक्षात येईल. या चाचण्या जशा संबंधित रुग्णावर करतात त्याचप्रमाणे त्या निरोगी व्यक्तींसाठी सुद्धा आरोग्यचाळणी चाचण्या म्हणून वापरल्या जातात.

पाकिस्तान - ११

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
लाहोर भारतासाठी विशेष महत्त्वाचे नव्हते. लाहोर जिंकणे हा ना कधी अजेंडा होता ना सैन्याने कधी प्रयत्न केले. सीमेपासून लाहोरपर्यंतचे अंतर तेवढेच आहे जेवढे कॅनॉट प्लेस ते नोएडा. असही नाही की रस्त्यात रणगाड्यांची रांग लागलेली असते नी सैन्य त्याला ओलांडून जाऊ शकत नाही. ग्रँड ट्रंक रोडसारखा उत्कृष्ट रस्ता बनलेला आहे. पाकिस्तानने लाहोरच्या वेशीवर जुन्या पद्धतीची सुरक्षा व्यवस्था केली होती. जसे किल्ल्याच्या बाहेर एक कालवा खणणे, जेणेकरून इतर सैन्य तेथवरच थांबू शकेल.

अमर प्रेमवीर शास्त्रज्ञ युगुल - मारी आणि पिअरे क्यूरी

सुधीर कांदळकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
प्रेम, शृंगार आणि प्रणय ही निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य आणि अजोड देणगी आहे. तरल कवीमनाला प्रेमप्रणयशृंगाराची फोडणी घातली तर मेघदूतासारखे सुंदर काव्य जन्माला येते. परंतु तरल कवीमनातल्या प्रतिभेतून केवळ काव्यच जन्माला येते असे नाही. विज्ञानजगतातले अनेक विस्मयकारक शोध हे तरल कवीमनाच्या प्रतिभेतूनच जन्माला आलेले आहेत. वैज्ञानिक हे आपल्यातूनच निर्माण झालेले आहेत. प्रेमप्रणयशृंगार त्यांच्याकडेही असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मारी आणि पिअरे क्यूरी हे वैज्ञानिक युगुल. जन्म १५ मे १८५९ पॅरीस इथे. मृत्यू पॅरीसला १९ एप्रिल १९०६. गुरू गॅब्रिएल लिपमन. भौतिकी हे पिअरेचे कार्यक्षेत्र.

ब्राह्मणीची बारव व इतर पुरातन पाऊलखुणा

Bhakti ·
A खूप दिवसापासून ब्राह्मणीची बारव पाहायचं मनात होतं. पण आज ते जुळून आलं. खरं म्हणजे सकाळीच ग्रुप ट्रेकला जायचं होतं पण पण उठायला उशीर झाला सहा साडेसहा वाजले होते. पिंपळगाव माळवीच्या रोडनी चाललो होतो तेव्हा म्हटलं जाऊ या.

अत्तराच्या कुपीतून दरवळणारा सुगंध. . .

मार्गी ·
लेखनप्रकार
रोजच्या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण अनेकदा गोष्टी विसरून जातो. वर्तमानाच्या धामधुमीमध्ये जुन्या सुगंधी आठवणींचा दरवळ विसरून पुढे जातो. आणि मानवी स्वभावच असा आहे की, ज्या गोष्टी चांगल्या वाटतात त्या आपल्याला कमी लक्षात राहतात आणि जे खटकत असतं, जे त्रासदायक असतं तिकडेच जास्त लक्ष जातं. जे चांगलं आणि उत्तम होतं ते आपण लक्षात ठेवत नाही. आणि पुढे जाताना मागची वाटसुद्धा आपल्या नजरेसमोरून दिसेनाशी होती. आपली मुळं आणि आपला आरंभ आपल्या डोळ्यांसमोर नसतो.

जय रायरेश्वर

बिपीन सुरेश सांगळे ·
लेखनविषय:
जय रायरेश्वर ------------------------------------------------------------------------------------------------------------- सकाळची प्रसन्न वेळ. रायरेश्वराचं अफाट पठार. पठारावरून ऊन हळूहळू खाली दरीत उतरत होतं. तर शिवाजीराजे किल्ल्यावर जात होते. सारीकडे पिवळं पडलेलं गवत. त्यामुळे पठार सोनेरी भासत होतं. आणि तो सोन्याचाच दिवस नव्हता काय ? आज राजे आणि त्यांचे सहकारी किल्ल्यावर चालले होते, ते रायरेश्वराच्या देवळात शपथ घ्यायला. साधीसुधी शपथ नाही, तर स्वराज्य स्थापनेची ! तो दिवस होता - २७ एप्रिल १६४५. राजांनी देवळात प्रवेश केला आणि त्यांच्या सवंगड्यांनीही.

काही आम्ही आणि एक म्हातारा.

भागो ·
लेखनविषय:
काही आम्ही आणि एक म्हातारा. आजचा दिवस आमच्या गँगसाठी खास होता. कारण आमच्या गँगच्या एका मेंबराची म्हणजे पक्याची कसोटी होती. पक्याने शाळेत असतानाच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. बोले तो शाळेच्या टीम मधून खेळायला सुरवात केली. तसं तर आम्हीपण क्रिकेट खेळत होतोच कि. पण पक्या म्हणजे राजहंस होता आणि आम्ही म्हणजे बदकं. आमची थेरी अफाट पण पक्या प्रॅक्टिकल. एकदा का क्रिकेटवर चर्चा सुरु झाली कि पहा सापळ्या तुम्हाला स्विंग बॉलिंगचे फ्लुइड मेकॅनिक डायग्रामसकट समजावून सांगणार. स्पिन बॉलिंग म्हणजे आम्हाला वाटायचे कि टप्पा खाल्यावर चेंडू इकडे वळतो नाहीतर तिकडे वळतो.