Skip to main content

ढगाळ वातावरण

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 17/05/2024 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
शेतात रोज उन्हाळी वातावरण पाहून,कंटाळा आल्यासारखं होतं. आणि ढगाळ पावसाळी वातावरणाची आठवण येत राहते. ढगाळ दिवसांत शेतावर काम करत असल्याची अनुभवून गेलेली आठवण,मी माझ्या वहीत एकदा कधी लिहून ठेवली होती ती वाचत होतो. “कधीकधी मला ढगाळ दिवस पण आवडतात त्यांचं सौंदर्य मला मोहित करतं. सर्वसाधारणपणे बरेच लोक उन्हाळी दिवसांचं कौतुक करताना दिसतात.आनंद आणि उच्च उत्साह मिळतो असं त्यांना वाटत असतं. निळ्या आकाशात आनंद निर्माण होतो असं वाटणं स्वाभाविक असू शकतं, परंतु माझ्यासाठी ते अगदी उलट आहे: जेव्हा सूर्य ढगाळ पडद्याआड सुरक्षितपणे दूर जातो तेव्हा मी सर्वात समाधानी असतो.

जाळं

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शुक्रवार, 17/05/2024 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
जाळं ---------------------------------------- रात्र झाली होती .मस्त गार वारं सुटलं होतं. दिवसभराची लग्नाची चाललेली धामधूम हळूहळू मंदावत चालली होती. पण ते लोकांचं . बन्सीकिशनच्या डोक्यातली गडबड मात्र हळूहळू वाढत चालली होती . गावाकडची मोकळी हवा . तो मित्रांबरोबर कडुनिंबाच्या झाडाखाली बसला होता. बाजेवर हवा खात . पलीकडे पोरंटोरं खेळत होती . मित्र काहीबाही सांगत होते. वात्रट बोलत होते ,एकमेकांना टाळ्या देत होते. बन्सीकिशन मात्र अवघडला होता. तो कसंनुसं हसत होता. तो वाट पाहत होता ... सुहागरातीची ! तिच्या घरचे बोलणी करायला आले होते . एकतर अलीकडे मुलगी मिळायची मुश्किल . तशात एवढी सुंदर मुलगी ! ...

आनंदी न राहण्यात आणि मजा करण्यात काही अर्थ नाही

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 17/05/2024 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
“एकटं मन वैरी असतं “ असं म्हणतात,पण आज माझ्या एकट्या मनात जे विचार सुचले, ते माझ्या मनाला पटणारे वाटले.ते असे, “मला असं वाटतं की, आनंदी न राहता मजा करण्यात काही अर्थ नसतो. आनंदी लोक आशावादी असल्यामुळे उत्तम जीवन जगतात. माझं एक आवडतं म्हणणं आहे आनंदी लोक निरोगी असतात. मला असं वाटतं की, आनंदी राहिल्याने बरंच काही मार्गस्थ करता येतं. जीवनाचा उद्देश काय आहे असा प्रश्न बहुतेकांना पडतो.जेव्हा मी वेगवेगळ्या मूडमध्ये असतो, तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा मी स्वतःला हा प्रश्न विचारतो तेव्हा मला वाटतं की जीवन व्यर्थ आहे.

निसर्गरम्य शांतता

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 16/05/2024 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी मी शेतात खूप काम करत असे. चोहीकडचा परिसर म्हणजे अर्थात निसर्ग असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आता ह्या वयात त्या परिसरात अनुभवलेल्या गोष्टींची आठवण येऊन निसर्गाबद्दल थोडंफार लिहावं म्हणून केलेला हा प्रयत्न. मला वाटतं निसर्गाचं सामर्थ्य अफाट आहे. मी निसर्गाच्या आपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेचा संदर्भ देत नाही, तर उलट - त्याच्या ठीक करण्याच्या,बरं करण्याच्या शक्ती, बद्दल म्हणत आहे. सूर्यप्रकाशात भिजणं आणि ताज्या, शुद्ध हवेत श्वास घेणं यापेक्षा मनाला आणि शरिराला आरामदायक, सुखदायक करणारं दुसरं काहीही नाही.

कबूतरावरचं असंही एक पुस्तक

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 16/05/2024 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझ्या मुलीचं पाचवीचं हिंदी पुस्तक वाचताना एका पुस्तकाची माहिती मिळाली. उत्सुकता वाटली म्हणून हे पुस्तक विकत घेतलं आणि लवकरच वाचूनही झालं. अमेरिकन बाल साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेलं आजवरचं एकमेव भारतीय लेखकाचं पुस्तक! धान गोपाल मुकर्जींनी लिहीलेलं 'गे-नेक: द स्टोरी ऑफ अ पिजन!' 'गे-नेक' पिजन म्हणजे रंगीत मानेचं कबूतर आणि हे पुस्तक म्हणजे ह्या कबुतराची कहाणी! १९२५ मध्ये प्रकाशित झालेलं हे पुस्तक म्हणजे लेखकाच्या समृद्ध भावविश्वामधील प्रत्यक्षातील अनुभवांचं वर्णन आहे. आज आपण "त्या काळापासून" खूप दूर आलो आहोत.

सह्याद्रीच्या बाजूबाजूने एक रोडट्रिप

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 16/05/2024 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच महिन्यात आम्हा तिघा मित्रांची निखळ अशी रोडट्रिप केली नव्हती, तो योग अचानक आला. मित्राने नवी कोरी इनोव्हा हायक्रॉस हायब्रीड घेतली होती, पण त्यातून आमचं फिरणं झालं नव्हतं. सरता पावसाळा होता. १६ सप्टेंबरची रात्र. मित्राचा रात्री साडेअकराला फोन आला. मी नेहमीप्रमाणेच लवकर झोपत असल्याने झोपेतच फोन घेतला. "अरे आपल्याला उद्या पहाटे पाच साडेपाचला माळशेजला जाण्यासाठी निघायचंय, तेव्हा तयार राहा, 'दुसराही येतोय" बरं म्हणालो. मी रोजच तसाही पहाटे पाचलाच उठत असल्याने गजर लावायची गरज नव्हती. साडेचार पावणेपाचला उठलो, आवरत होतोच तितक्यात पहिल्याचा फोन आला.

सोनचाफ्याचची फुलं आणि तो स्पर्श (भाग ३ )

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 15/05/2024 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
सुम्याच्या लहानपणातल्या प्रेमासंबंधाच्या सतावणार्‍या त्या आठवणी सुम्या,तिची मुलगी आणि नवरा घाईगर्दीने कोकणात गेली होती कारण,सुम्याची आई बरीच आजारी होती.एक महिना ती कोकणात राहिली.आईला मुंबईला आणून चांगल्या डॉक्टरला दाखवायचं असा त्यांचा विचार होता.पण हा विचार ऐकून आई खूप नाउमेद झाली. आणि दोन दिवसातच तिचा अंत झाला. सुम्याला आता बेत बदलावा लागला. म्हातार्‍या वडीलाना आपल्याबरोबर मुंबईला घेऊन जाण्याचा विचार त्यांनी केला.आणि त्याप्रमाणे कोकणातलं घर बंद करून वडीलांना घेऊन ती सर्व मंडळी मुंबईला आली.

पाकिस्तानने भारतावर परमाणू अस्त्र वापरलं आणि भारताने आपलं—

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 15/05/2024 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
मानवजात आणि भविष्यात होऊ घातलेली पृथ्वीची समस्या. काल मी आणि प्रो. देसाई आम्ही दोघेच तळ्यावर भेटलो होतो.प्रो.

माझ्या वहितला एक उतारा,-मनोदशा (mood ).

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 14/05/2024 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या वहितला एक उतारा.--- मला आठवतं हा उतारा लिहायला त्या दिवशी मी का उद्युक्त झालो होतो. शेतावरची कामं त्या दिवशी मनासारखी होत नव्हती.बरेच कामगार एनंकेनं कारणाने गैरहजर होते.जरूर ती कामं होणार नव्हती. वैताग आला होता. दिवस कसातरी संपायला आला होता.घरी जायचं मूड नव्हतं. आजही तसंच वाटत होतं.म्हणून माझ्या वहितला उतारा वाचत होतो. “ मला असं वाटतं की,( मूड ) मनोदशा सतत बदलत असते आणि काही सेकंदात बदलली जाऊ शकते. जीवनातला एखादा क्षण पुसला किंवा बदलला जाऊ शकत नाही, परंतु केवळ आठवणींच्या संदर्भातून मागे वळून पाहिलं जाऊ शकतं.

त्या तरूतळी

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 14/05/2024 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
अशोकाच्या पारावर सीतामाय उसासते सोनमृगाच्या मोहाला मनोमन धि:कारते शमीवृक्षाचा विस्तार शस्त्र पार्थाचे झाकतो प्रत्यंचेला स्पर्शण्यास शर अधीरसा होतो वृद्ध बोधिवृक्षातळी गौतम नि:संग बसे बोधरवि उगवता दिव्यप्रभा फाकतसे अजानवृक्षाच्या तळी ज्ञानयोगी अविचल अभावाच्या कर्दमीही प्रतिभेचा परिमळ नांदुरकीची डहाळी आज कशाने हलते? अणूहुनी सूक्ष्म कोणी सारे आकाश व्यापते!