Skip to main content

संध्याखंत - २

लेखक आजानुकर्ण यांनी सोमवार, 04/02/2008 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा नंदनशेठ यांची अप्रतिम कविता झांज हा अंगठा आमचे द्रोणाचार्य केशवसुमार यांच्या चरणी अर्पण. (एकलव्य) आजानुकर्ण आम्ही परतुनी आलो झाली होती सांज बल्ब लावूनी बसलो सुरु जाहली खाज नाही बिलगाया कोणी मनात येती इच्छा माडीवरती जाऊनी करावयाची का पृच्छा रंगीत बाटलीतूनी वाहतील सोनेरी धारा पेल्यात तरंगे जणू जीव अमुचा सारा रात्र येई गोकुळी आम्ही करितो खंत 'साकी' दिसे ना कुठे आता तुम्हीच ओता पंत (ह. घ्या.)
Taxonomy upgrade extras

ठाण्यात 'क्रांतिचा झंझावात'

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 04/02/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक एक, दोन व तीन फेबृवारी असे तीन दिवस ठाण्यातील ऍड. माधवी नाईक यांच्या ’अर्थ फाउंडेशन’ या संस्थेतर्फे एक आगळा वेगळा उपक्रम आयोजित केला गेला. ठाणेकर नागरिकांसाठी व विशेषत: नवीन पिढीला १८५७ ते १९४७ या नव्वद वर्षांच्या कालखंडात देशासाठी सर्वस्वाचा होम करणार्‍या क्रांतिकारकांचे सचित्र चरित्र दाखविणे हा या उपक्रमाचा हेतू होता. दुर्दैवाने आज स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊन गेल्यानंतरही बहुसंख्य जनतेला अनेक क्रांतिकारकांची नावे सुद्धा माहित नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

एका लग्नाची गोष्ट...

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 03/02/2008 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
"डोकं फिरलंया...बयेचं डोकं फिरलंया...' लग्नसमारंभाला अगदी साजेसं आणि नवरा-नवरीच्या मनःस्थितीचं सुयोग्य वर्णन करणारं गाणं बॅंडवर वाजवलं जात होतं. (लग्नाचीही काय गंमत असते बघा...आधी वधूपक्षाकडली मंडळी नवऱ्या मुलासाठी बॅंड वाजवतात आणि मग त्याचा बॅंड वाजवतात !) पाहुणे झकास नाचत होते. गणपतीतल्या नाचापेक्षा या नाचाचा दर्जा किंचित वरचा आहे, अशी शंका घ्यायला वाव होता. फुगड्या रंगल्या होत्या. काही जण लग्नातल्या कामांचा शीण घालवण्यासाठी अंग हलवत होते तर काही जण आधीच "श्रमपरिहार' करून आले होते आणि आता अंगात भिनलेलं रसायनच त्यांना नाचवत होतं.

घाईत घाई

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 03/02/2008 21:53 या दिवशी प्रकाशित केले.
मुडदा बशिवला तुझा...डोळेबिळे फुटलेत की काय? मेल्या पायाचं पार भजं केलंस की...तुझ्या...***!'' एक कचकचीत शिवी त्या कोंदटलेल्या, तुंबलेल्या बसमध्ये घुमली. आणि गजराबाईंच्या पायावर पाय देणाऱ्या सदाचा चेहरा (न) पाहण्यासारखा झाला. "कुठल्या मुहूर्तावर बसमध्ये चढलो कुणास ठाऊक,' असं त्याला वाटलं. एक तर सकाळी धावतपळत तो बसस्टॉपवर पोचला होता. त्यातून त्याच्या समोरच त्याची नेहमीची बस निघून गेली. त्यामुळं ही दुसऱ्याच मार्गाची बस त्याला धरावी लागली होती. वर फाट्यावर उतरून पुढे बरंच अंतर उन्हातान्हात चालत जावं लागणार होतं. दुसरं वाहन करावं, तर खिशाला चाट बसणार होती.

यावर विचार करा....

लेखक स्वाती राजेश यांनी रविवार, 03/02/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीत भाषांतर न करता मी इंग्रजीत आहे तसे लिहिले याबद्द्ल आपली सर्वांची क्षमा मागते. मला एक मेल आले,सुंदर विचार वाटले म्हणून शेअर करत आहे. Think over this!! How often do you let other people's nonsense change your mood? Do you let a bad driver, rude waiter, curt boss, or an insensitive employee ruin your day? However, the mark of a successful person is how quickly one can get back their focus on what's important. David J. Pollay explains his story in this way…. Sixteen years ago I learned this lesson. I learned it in the back of a New York City taxi cab. Here's what happened.

संध्याखंत

लेखक नंदन यांनी रविवार, 03/02/2008 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
गोफातली एक जुनी चारोळी, प्राजू यांची 'सांज' आणि ऋषिकेशची 'झांज' ही कविता यांच्यापासून स्फुरलेली/बनवलेली/पाडलेली ही मिसळ-कविता :) "गायी परतुनि आल्या अवचित झाली सांज दीप लागू लागले मंदिरी वाजे झांज पिले बिलगती आईला झाड आवरे पाने क्षितिज लाजले किंचित रेखीत रंगीत गाणे सारे काही जिथल्या तिथे मलाच नाही थारा विश्व मानिते ज्याला मी मग्न तो जगदाधारा" रात्र येई गोकुळी राधा करिते खंत कान्हा दिसे ना का कुठे रुपे जरी अनंत
Taxonomy upgrade extras

व्हॅलेंटाईन्स डे....

लेखक प्राजु यांनी शनिवार, 02/02/2008 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन्स डे. या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा मोका तमाम प्रेमींना मिळतो. या दिवसाच्या निमित्ताने एक धागा चालू करावा असा विचार सहज डोक्यात आला. प्रेम या विषयावर आपण चारोळ्या लिहूया का? प्रेम .. मग ते कोणावरहि असेल. ईश्वर , पती-पत्नी, आई, वडील, भाऊ-बहीण, मित्र्-मैत्रिण किंवा पाळीव प्राणी अगदी निसर्गावर सुद्धा.. कोणाबद्दलही वाटणारे प्रेम आपण शब्दबद्ध करूया का? एक सूचना मात्र : प्रेम भंग किंवा उदासिन चारोळ्या लिहू नयेत. ऋशिकेश, सहजराव, वरदा, स्वाती (तिन्ही- राजेश, दिनेश, महेश), विनायक, सगळे डॉन, डांबीसकाका, चतुरंग, केशवसुमार, प्रभाकर राव, डॉ.

फस्क्लास भेळ !!

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी शनिवार, 02/02/2008 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
कल्याण भेळ, बिबवेवाडी-को॑ढवा रोड (पुणे) येथे अतिशय सुरेख भेळ मिळते, ती खाल्ल्यावर तिथलेच 'पान्-पट्टी' आईसक्रीमसुद्धा खावे, म्हणजे जिवास बरे वाटते. अनामिका भेळ, नारायण पेठ सुद्धा मस्त असते..