मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

वेड्या आईची वेडी माया

रानरेडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आई मेलीय माझी! असे रोहन म्हणायचा. खरे तर आई होती त्याला पण तो तिला एकटीला सोडून दूर आला होता . रोहन - गणितात जबरी असलेला इंजिनिअर. असा अँटी सोशल इंजिनिअर कि ज्याच्या नावाचा विचार इंजिनिअरिंगमधील नोबेल साठी होत होता पण त्याची आई - ती जरा सरकलेली होती आणि तिचे वेड वाढत होते तो वीस वर्षांचा झाला तेव्हा तिचं मोठ्याने हसणं त्याला त्रासदायक वाटू लागलं, तिचा गोंधळ थकवणारा वाटू लागला, ती नावं विसरायची, भाजी जळवायची, आणि टीव्ही तिच्याशी “हळूच बोलतोय” असं म्हणायची.

अभंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
संसदेत नाही । फिरकले पायी । महिलांच्या ठायी । धाक वाटे ।।१।। जुने मढे सारे । काढिले बाहेरी । नाव नेहरूंचे । घेती सदा ।।२।। एपस्टिन यादी । येईल बाहेरी । हीच भीती उरी । दाटलेली ।।३।। शिक्षण, बेकारी । तशी महागाई । बोलणेच नाही । विषयांवर ।।४।। आत्महत्या करी । राजा शेतकरी । जंगले व्यापारी । लुटविती ।।५।। निवडणुकीवेळी । गोड गोड बोली । वचनांची झोळी । रिकामीच ।।६।। सेवा तीर्थ नाव । ध्यानी नाही भाव । जनहिती ठाव । फेकीला हा ।।७।। संसदेचा वेळ । वायाचि गेला हा । 'दिलीप' म्हणे पाहा । कुणाकडे? ।।८।।

भारत-म्यानमार फाळणी

केदार भिडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वर्षाच्या सुरुवातीला दोनदा भारत आणि म्यानमार यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संदर्भ आले आणि मी सुद्धा नेमके सॅम डॅलरिम्पलचे Shattered Lands वाचायला घेतलेले होते. Eko या अतिशय सुंदर मलयाळम चित्रपटात त्यातील काही कथानक तत्कालीन बर्मा प्रांतात घडले आहे. तसेच Family Man Season ३ मध्ये मणिपूर येथे राहणाऱ्या काही तामिळ भाषिक लोकांचा उल्लेख आलेला आहे. भारत आणि पाकिस्तान यांची १९४७ साली झालेली फाळणी आणि त्यातून लाखो लोकांची झालेली वाताहत सर्वांना परिचयाची आहे.

पकडले हाथ रंगे

बाजीगर ·
लेखनविषय:
मंत्रालयात ढेरंगे, पकडले हाथ रंगे अन्न नागरीलिपिक, लाचखोरीचे पीक, असे इमान ना विक, पांडुरंगा || ३५ हजार रोकड आता शोधा बोकड, आरोपांचा हा फड कसा वाचवू मी गड एकनाथा || लाचखोरी शेवाळ, वदले ते झिरवाळ, लोक म्हणे कपाळ, धूर तिथेच जाळ, 'देवा' धाव || लाचखोरी प्रकरण, नाही चुकीचे करणं, हो तेच माझे दालन, राजीनामा हे मरण, नरहरी ||

जरा आगळे आज वाटते.

Deepak Pawar ·
लेखनविषय:
काव्यरस
जरा आगळे आज वाटते मनी काहीसे आज दाटते करमत नाही हुरहुर काही कुणी सारखे स्वप्नात येते. आज झऱ्याचा नाद वेगळा आज नभाला साज वेगळा वेगळ वाटतं नभातल चांदणं काळजा छेडती कुणाची पैंजण मना कुणीसे आज वेढते. आज उदासी मना भारुनी उरी कुणीसे येई फिरुनी कळेना असे का भिरभिरते मन मनी प्रीत कुणाची फुले क्षणक्षण प्रीत कुणाची मनी उमलते. https://youtu.be/8g_lRY-rduk

भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....

नागनिका ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
काही दिवसांपासून एपिस्टन फाईल्स चर्चेत आहे आणि या संबधित असणारी छायाचित्रे व व्हिडिओने तर समाज माध्यमांवर एकच धुमाकूळ घातला आहे. यामध्ये नामांकित व्यक्ती असण्याची चर्चा आजूबाजूला होताना दिसत आहे. जेफ्री एपिस्टन नावाचा कोणी एक धनाढ्य व्यक्ती एका खाजगी बेटावर लहान मुलींची तस्करी करत होता. धनाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलींचे या बेटावर लैंगिक शोषण केले जायचे. ३० लाख कागदपत्रे असलेल्या या फाईलमध्ये समाजातील मान्यवर व्यक्तीची नावे असली तरी ही मंडळी दोषी असल्याचे अजूनतरी सिद्ध झाले नाही. या कागदपत्रांमध्ये ‘cannibalism’ या शब्दाने खळबळ माजवली आहे. Cannibalism म्हणजे स्वजातीचे भक्षण करणे.

डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने

युयुत्सु ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने ============== --राजीव उपाध्ये चीनच्या अधोगतीची स्वप्ने बघणार्‍या आणि त्यावरून माझ्याशी कचाकचा भांडणार्‍या मंदबुद्धी संघोट्या मित्राची मला अधूनमधून आठवण येते. त्याने माझ्याशी भांडण केल्याला आता २-२.५ वर्षे होऊन गेली असतील. मी त्याच्याकडे २-३ वर्षे मागितली होती. प्रत्य्क्षात चीनच्या पिछेहाटीचा कुठेही मागमूस पण दिसत नाहीये. सतत गोलपोस्ट हलवत राहायचं, लोकांची दिशाभूल करत राहायचं हा अशा ’समर्पित’ लोकांचा आवडता उद्योग असतो. आणि मग हे मंदबुद्धी लोक जेव्हा तोंडावर आपटतात तेव्हा "चीन मध्ये जाऊन राहा" असा एकच घोष चालू करतात.

तरीही....(विडंबन)

श्वेता२४ ·
लेखनविषय:
प्रेरणा असलेली मूळ गझल इथे वाचून शकता... तरीही.... नाजूक उंड्याचा सावरते मी तोल, तरीही का होईना पोळी माझी गोल तरीही.... पिठी घातली घट्ट कराया पूरण थोडे.. अजून का ही पूरणामध्ये ओल तरीही.... काठाकाठाने लाटतसे, यत्न न सोडी... तव्यावरी जाता, मी मारी शीळ तरीही.... भेटत नाहीत सख्या मला या 'कीटी' शिवाय म्हणूनी खास हा त्यांच्यासाठी घोळ तरीही.... कोरीव भृकूटी मम सखीची पाहून ती पोळी का मज वाटे अधिकच झाली खोल तरीही.... ग्रास आग्रही भरवी सखीला तो गोडूला करी डोळे मोठे..अन आली भोवळ!!!! तरीही...!!

सैल धागे

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
मी: शेवटचं तुला भेटायचं राहून गेलं, स्वप्नच तू, जगायचं राहून गेलं... चंद्रखळ्यांचं गाव बिलोरी, अवखळ, त्या गावात हरवायचं पुन्हा राहून गेलं... ती: अंतरातले अंतर मोजताना, अंतर काही संपत नाही… (२) अंतरात माझ्या पाहताना, अंतर तुला तिथेही नाही. मी: माळले नवकिरणांनी नभाचे हार, रात्रीस बिलगायचं, शेवटचं राहून गेलं... बांधले नजरेचे पूल या डोळ्यांनी, तुझ्यासवे शेवटचं चालायचं राहून गेलं... ती: चंद्र विसावला अंतरी तरी, अंतरात हे कसले अंतर? अंतरात खोल दडले, तुझे माझे सैल धागे - शब्दमेघ (६ फेब्रुवारी २०२६)