Skip to main content

दोन क्षण विरंगुळ्याचे - पानशेत

लेखक मालविका यांनी सोमवार, 25/04/2022 13:14 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीनिवास च्या भावाबहिणींच्या गेट टुगेदरच्या निमित्ताने आम्ही सगळे भेटलो. पानशेतला त्याच्या बहिणीच फार्म हाऊस आहे. तिथे जमायच ठरलं. पानशेतला मी प्रथमच जात होते. शिवाय श्रीनिवास च्य भावाबहिणींना भेटायची उत्सुकता होती. सलग सुट्टी आल्याने आम्ही आधी औरंगाबाद - शेगाव दौरा करून साधारण साडेतीन/ चारच्या दरम्यान पानशेतला पोहोचलो. पानशेतच धरण दिसल आणि नंतर दिसणार्या पाण्याने डोळ्यांचा बरं वाटलं. औरंगाबाद, नगर असे रखरखीत प्रदेश पार करून आल्याने या पाण्याच्या नुसत्या दर्शनाने डोळ्यांचा थकवा दूर गेला.गुगल मॅप प्रमाणे चाललो होतो . हळूहळू वस्ती विरळ होऊन डोंगर चढायला लागलो.

उष्णकटिबंधीय वसंत

लेखक माहितगार यांनी सोमवार, 25/04/2022 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
वनस्पति उद्यानातून फेरफटका मारताना माहितीची पाटी नसलेले झाड पाहून साहित्यिक राजूमधील चौकश्याने विचारले हे झाड कोणते? त्याचा वनस्पती वैज्ञानिक मित्र म्हणाला उष्णकटिबंधीय म्हणजेच ट्रॉपीकल! (राजूने वेळ मारून नेणे कंसात जोडले) वनस्पती वैज्ञानिक मित्राने राजूची वसंत ऋतूवरील कविता ऐकुन झाल्यावर मोबाईलवर मराठी विकिपीडियावरचे वसंत ऋतूचे पान उघडत राजूला विचारले वसंत ऋतू आला हे कसे ओळखायचे ? झाडाला फुले लागल्यावर की कोकीळेने कुहू कुहू केल्यावर की वसंतऋतूवरील कविता ऐकल्यावर?

रोज किती पाणी प्यावे?

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
रोज किती पाणी प्यावे? शरीराची गरज असेल एवढे आणि आधुनिक विज्ञानाने सुविद्य डॉक्टर सुचवतील तेवढे रोज किती पाणी प्यावे? अन्न पिकविण्यासाठी शेतीसाठी शिल्लक राहील एवढे रोज किती पाणी प्यावे? शेती आणि शरीरांची गरज यांचे गणित नाही जुळली तर इतर अपव्यय टाळून लोकसंख्या नियंत्रणाचे महत्व ईतर चार जणांना पटवून शरीराची गरज भागेल तेवढे

आङळे वाङळें साहित्य संमेलन

लेखक माहितगार यांनी रविवार, 24/04/2022 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आङळे वाङळें साहित्य संमेलन आङळे वाङळेंना म्हणाली मराठी साहित्य संमेलनाला नाही गेलात कसे ते? वाङळें आङळेंना म्हणाला तुमच्या आङळीकेचे साहित्याने अजीर्ण झाल्यावर इतर साहित्याला जागा आता उरलीच कुठे ?

प्रिय सचिन

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी रविवार, 24/04/2022 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सचिन, पुन्हा तो दिवस - पुन्हा तीच भावना. आता तर त्या भावनेला शब्दांचीही गरज वाटत नाही. तू निवृत्त होऊन ९ वर्षं झाली. आम्हीही थोडे (वयानी) मोठे झालो, वयानुरूप थोडीबहुत परिपक्वता, व्यावहारिकता आली. जे दिसतंय त्यापलिकडे बघायची नजर आली. तू खेळत असताना असलेली आमची क्रिकेट बघण्यातली बेहोषी आता कमी झाली. परिस्थिती बदलली, जग बदललं तसं क्रिकेटही अर्थातच बदललं. आम्ही अजूनही क्रिकेटवेडे आहोतच. आताही शुभमन गिलच्या शैलीवर, पंतच्या बेफिकीरीवर, डेवॉल्ड ब्रेविसच्या चौफेर फटक्यांच्या रेंजवर, शाहीन आफ्रिदीच्या वेगावर फिदा आहोतच. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मासारख्या मुलींबद्दलही कौतुक आहेच.

कॅवलरी टँक म्युझियम (रणगाडा संग्रहालय) - अहमदनगर

लेखक टर्मीनेटर यांनी शुक्रवार, 22/04/2022 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
.container1 { position: relative; width: 100%; overflow: hidden; padding-top: 56.25%; /* 16:9 Aspect Ratio */ } .responsive-iframe { position: absolute; top: 0; left: 0; bottom: 0; right: 0; width: 100%; height: 100%; border: none; } .my-heading { background-color : #f0f0f0; color : #000; margin-top :16px; margin-bottom :16px; padding : 12px; font-size : 17px; font-weight : bold; border : 1px dashed #9fa9a3 } .notes { background-color : #f0f0f0; color : #000; margin :16px; padding : 12px; border : 1px solid #9fa9a3; } १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर शहरातील

ती २५ तारीख

लेखक शानबा५१२ यांनी गुरुवार, 21/04/2022 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज २१ तारीख, एप्रील २०२२....अगदी अपक्षाच्याही बरोबर नसताना मला २५ तारीख आठवली. त्या व्यक्तीची आठवण आली त्या २५ तारखेवरुन. २५ जानेवरी आहे ती तारीख हे नंतर लक्षात आल. बाळासाहेब ठाकरे, ह्या व्यक्तीत ती जादु, तो प्रभाव होता की, मला कुठल्यही राजकीय पक्षाशी अगदी अपक्ष म्हणुन निवडणनुकीत रस घेणा-या व्यक्तीशीही दुरचे नाते नसताना ह्या एकाच व्यक्तीबद्दल एवढा जिव्हाळा वाटावा, ह्याचे आश्चर्य वाटले. टीव्हीवरती लहान असताना बघितलेले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर युट्युबच्या सौजन्याने बघितलेले गॉगल व सफेद दाढीत अजुन रुबाबदार, भक्कम दीसणारे बाळासाहेब ठाकरे अजुनही तितकेच माझ्या मनाला भावतात.

खुनी डॉक्टर व तारणहार आडनावबंधू

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 21/04/2022 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना. डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता.

फोनमधली connectivity 4G/4G+/5G कोणती?

लेखक कंजूस यांनी मंगळवार, 19/04/2022 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
( डिस्क्लेमर : मी तंत्रज्ञानी नाही पण शोधाशोध करत असतो. तंत्रज्ञान गटात लेख टाकला आहे पण चर्चा आहे.) सध्या वापरात असलेल्या 4G net मध्ये काही फोन्स 4G+ support करतात. यामध्ये 850,900,1800,2300 हे चारही फ्रिक्वेन्सी bands एकाच वेळी चालू राहून चांगला नेट स्पीड मिळतो.

आणि मुंबईत धावले वाफेचे इंजिन...

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 16/04/2022 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील बोरीबंदर ते ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली 16 एप्रिल 1853 रोजी. त्या ऐतिहासिक घटनेचे आता 170 वे वर्षे सुरू झाले आहे. यंदाच्या 170व्या वर्षाच्या निमित्ताने 20 वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यावेळी भारतीय रेल्वेचे 150वे वर्ष सुरू झाले होते. त्या निमित्ताने 16 एप्रिल 2002 रोजी मुंबईत एका वेगळ्याच घटनेचे साक्षीदर होण्यासाठी लाखो मुंबईकरांनी बोरीबंदर ते ठाणेदरम्यानच्या लोहमार्गांच्या दुतर्फा, जिथे जागा मिळेल तिथे गर्दी केली होती. अगदी 16 एप्रिल 1853 ला केली होती तशीच. सगळेच जण ज्या दिवसाची वाट पाहत होते तो खास दिवस अखेर उजाडला होता.