महामानवास अभिवादन!
- Read more about महामानवास अभिवादन!
- 48 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नमस्कार,
मिसळपावच्या नवीन रूपात संगणकावर मराठी लिहिण्याच्या पध्दतीत थोडा बदल केला आहे. दुर्दैवाने गमभण module स्वरूपात नसल्यामुळे ही नवीन पद्धत बनवावी लागली आहे. आपण या नवीन पद्धतीला लेखनिक असे म्हणतोय.
तुम्ही ही लेखनिक पध्दत वापरून पाहिली आहे का? लिहीताना काही अडचण येते आहे का? कुठला शब्द लिहिता येत नाहीये. अर्थात येथे लिहिता नाही आला तर इंग्रजीत लिहून सांगू शकता.
कृपया लिहून बघा. त्रुटी सांगा. त्यावर उपाय करूया आणि ही पद्धत अधिकाधीक सोयिस्कर बनवूया.
धन्यवाद.
माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
माजा नाखावा गेलाय होर्मुज खाडीला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||ध्रू||
जवा येईल तवा आणीन पेट्रोल डिजेलला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||१||
सैपाक करत होती तवाच सिलेंडर संपला
कवा येईल परतून काळजी लागली मला ||२||
साडी चोळी नको, नको घेऊ माळ तू मला
एकडाव पेट्रोलची टाकी भरून दे गाडीला ||३||
कोबीची भाजी करपली, मासे नाही भाजीला
डोनाल्ड अन बेंजामीनचा मुडदा बशिवला ||४||
राकेल नाय मिळत, झाडं नाय सरपणणाला
लवकर ये घराला, काळजी लागली मला ||५||
- पाभे
१८/०४/२०२६
एक गायक होता, जो आयुष्यभर फक्त दुःख आणि वेदनांनी भरलेली गाणीच गात असे. तुटलेलं हृदय, दगा, उदासी आणि एकाकी रात्री - हे त्याच्या गाण्यांचे नेहमीचे विषय होते.
त्याच्या लग्नाची २५वी वर्षगाठ होती. सकाळपासूनच बायकोने स्पष्ट इशारा दिला होता, “आज आनंदाचा दिवस आहे. कोणतंही नकारात्मक किंवा दुःखी गाणं म्हणू नकोस. नाहीतर बघून घेईन!”....
वेळास कासव महोत्सव पाहण्याची अनेक वर्षांची तीव्र इच्छा मला अखेर काल या पिटुकल्या कासवांच्या जन्मसोहळ्याला घेऊन गेली.
मागील भागात [1] किंमत कोठून येते आणि अर्थव्यवस्थेत समन्वय आणि संदेशवहन याचे काम किंमत प्रणालीद्वारे कसे केले जाते हे पाहिले. किंमत प्रणाली आपल्याकडून सतत बदलाची अपेक्षा ठेवत असते. सतत बदलत राहायची आपली तयारी नसते, माझी सुद्धा नाही. तर सततच्या बदलाच्या अपेक्षेमुळे जी नाराजी तयार होते त्याचे आजच्या काळात राजकीय मागण्यांमध्ये रूपांतर होते. राजकीय ताकदीचा वापर करून किंमत प्रणालीमध्ये अडथळे घातले जातात. किंमत प्रणालीमध्ये असे अडथळे आणले की काय काय होते हे आपण या भागात पाहणार आहोत. तसेच किंमत प्रणालीचा वापर करून सध्याच्या काही प्रश्नांना उत्तर सापडायची शक्यता आहे तेही पाहणार आहोत.
नमस्कार मिपाकर मंडळी
नवीन कोरे मिपा चालु झाल्याबद्दल मालकांचे आणि सहकारी मंडळाचे अनेक आभार आणि शुभेच्छा!!
तर सालाबादप्रमाणे यंदाही उत्तरवाहीनी परीक्रमेला गेलो होतो. तेव्हाचे काही किस्से सांगायला हा लेख
(मागील लेखाचा दुवा)
https://www.misalpav.com/story/51273
कल्पद्रुमाच्या पर्णद्रोणी
खळबळणारे मृगजळ घ्यावे
चकोरचंचू मधून मधुरसे
चंद्रामृत चाखत रिचवावे
छायाग्रह राहू केतूच्या
कुंडलीत पापग्रह व्हावे
मिथक कथांच्या दग्धभूमीचे
औटघटीचे राज्य मिळावे
निळ्याशारशा मान सरोवरी
राजहंस होऊन विहरावे
नीर-क्षीर विवेका विसरून
हंस-गान शेवटचे गावे