Skip to main content

ब्राह्मणी मटन मसाला

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 01/05/2016 06:16 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राह्मणी मटण मसाला..... असे चमत्कारीक नाव असलेली एक रेसिपि वाचनात आली..ति शे‌अर करत आहे ................. साहित्य... मटण १/२ किलो एक मोठा कांदा चिरलेला तेल दालचिनी ईलायची दगडफुल.खसख...तमालपत्र लवंगा आदी खडा मसाला. गोडा मसाला..आमटी साठी वापरतात तो तिखट मिठ मॅरिनेट साठी........ बचकभर कोथिंबीर पुदीनी आल+लसुण +मिरची .. वाटण... एक चिरलेला कांदा निम्म खोबरे.. २ वेलदोडे +२ लवंगा आल+लसुण कृति....... १..बचकभर कोथिंबीर पुदीना+ आल+लसुण+मिरची .. च वाटण तयार करा मटनाला लावुन घ्या २...कुकर मधे २ मोठे चमचे तेल घ्या तेल तापले कि ...

आजोळ

लेखक श्वेताली कुलकर्णी यांनी रविवार, 01/05/2016 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे आमची परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संपली कि आजोबा आम्हाला घेऊन जाण्यासाठी आलेलेच असणार , उन्हाळ्याची सुट्टी म्हणले कि आमचे ठरलेले ठिकाण येळावी माझे आजोळ . कवठे महांकाळ ते येळावी दीड दोन तासाचा प्रवास , तासगाव मधून गाडी बदलावी लागत असे मी एकीकडे आजोबा मध्ये आणि दीदी दुसरीकडे असा आमचा प्रवास . गाव तसे लहान होते पण आजोबांना मानणारे लोक खूप , त्यामुळे जोशीबुवांची नातवंडे म्हणून आमचीही मजा असे .

Confession Box : भाग २ ...शिक्षकांचा 'लाडका' विद्यार्थी बनलो

लेखक मार्मिक गोडसे यांनी रविवार, 01/05/2016 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ आज बाबा हट्टालाच पेटले होते. मला माहीत आहे तुला कशात करीअर करायचे आहे ते, परंतू स्पर्धा परिक्षेच्या निमित्ताने आपल्या प्रदेशाचा, समाजाचा व त्यांचा विकास करणार्‍या यंत्रनांचा तुझा अभ्यास होइल. आणि इथे शहरापेक्षा तुझ्या मामाच्या गावी तुला ह्या गोष्टी जवळून अभ्यासता येतील. बाबा मागे हटायला तयार नव्हते. मला स्पर्धा परिक्षांबद्दल ओ का ठो माहीती नव्हती आणि तीच्या वाटेला जायचेही नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून बाबांना म्हटले, दोन महिन्यांच्या सुटीनंतर माझे कॉलेज सुरू होइल तिकडे लावलेल्या क्लासची फी वाया जाईल.

महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव ( महाराष्ट्र दिन लेखमाला)

लेखक माहितगार यांनी शनिवार, 30/04/2016 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा साहित्य संपादकांनी १ मे २०१६निमित्त सुचवलेले तीन पर्याय विषय 'महाराष्ट्राचे भारताप्रती योगदान' या विषयावर आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्राच्या योगदानाचा अभिमान वाटावा, अशी इच्छा स्वाभाविक, पण यातील नेमके साध्य काय? महाराष्ट्रीय लोकांनी स्वतःच स्वत:ला प्रमाणपत्र देऊन केवळ स्वतःची भलावण एवढाच उद्देश याचे साध्य असेल का? खासकरून 'महाराष्ट्राचा भारतीय राजकारणातील प्रभाव' हा बहुधा ललित साहित्याचा विषय नसावा की चार विशेषणे आणि दोन अलंकार लिहिले की सारा भारत पाहा कसा महाराष्ट्राच्या राजकीय प्रभावाने दिपून जावा. पौराणिक इतिहासात राम गोदावरीपल्याड दक्षिणेत उतरल्यावर बरेच काही घडते.

नाडलेल्या लोकांची कहाणी .............

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 30/04/2016 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
मागून मागून थकलेली माणसं आली कोणी , उतरले तोंड डोळा सुटलेले पाणी ला ला ला ला , ला ..ला ला गेलेच आहेत पैसे आता खिशात काही नाही पैसे कुणा मागू आता मला कोण देई बडबडत बसतो सारखा गेले पैसे पाण्यात व्याज गेले माझे तरी मुद्दल द्या हातात सांगायची आहे माझ्या शहाण्या मुला नाडलेल्या लोकांची ही कहाणी तुला ..... ला ..ला ला ला ला , ला ..ला ला ला ला....

पहाट बोले …

लेखक उल्का यांनी शनिवार, 30/04/2016 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
आली पहा ती रम्य पहाट पक्षी करिती किलबिलाट कोकिळ घाले मधुर साद; केशर रंगी रविकिरणे शीतलता ही प्रसन्न करे पर्णांना सोनेरी वर्ख चढे; दावुनी अपुली किमया ही काय सांगू पाहते ती? “हार नका मानू कधी!” “तम हा सरला, उठा सारे, चैतन्याचा प्रकाश पसरे, कर्तृत्वाचे रचा मनोरे!” – उल्का कडले

सोलापूरचे कुणी आहे का?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 30/04/2016 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कालच "मिळून सार्‍याजणी-दिवाळी अंक-२०१५" वाचला. त्यातील "सौर उर्जा शेती" ह्या विषयावरील "आय.आय.टी की डोंबल" हा अरूण देशपांडे लिखित लेख वाचण्यात आला. ही शेती अंकोले ह्या सोलापूर शहराजवळच्या गावांत आहे. आज श्री. अरूण देशपांडे ह्यांच्या बरोबर प्राथमिक बोलणे झाले. मी आणि आमची सौ.

असा कसा काळ आला

लेखक gsjendra यांनी शनिवार, 30/04/2016 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
असा कसा काळ आला बापाआधी बाळ गेला असा कसा काळ आला धर्माच्या नावाखाली घोळ साला असा कसा काळ आला खरं बोलणारा वाळ झाला असा कसा काळ आला काळा कावळा शहाळं प्याला असा कसा काळ आला गाढवाच्या गळ्यात माळ घाला असा कसा काळ आला पैसा जगण्याचं मूळ झाला असा कसा काळ आला माणूसच कूठे गहाळ झाला भोसले जी.डी. आत्मशोध काव्यसंग्रह
काव्यरस

तेव्हा मला तू फार म्हणजे फार आवडतोस

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 30/04/2016 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
मार्केटयार्डामधुन आठवड्याची भाजी घेउन येताना अचानक मला सोसायटी मधली मैत्रिण भेटते ती एकटीच आलेली असते भाजी घ्यायला दोन मोठाल्या पिशव्या हतात् घेउन, अवघडून , अर्धातास, निमुट उभा रहात, आमच्या गप्पा ऐकणार्या तुझ्या कडे तिरप्या नजरेने बघत ती म्हणते “आमचे हे काल रात्री उशिरा कामावरुन आले दमुन झोपले आहेत बिचारे.

तेव्हा मला तू फार फार आवडतेस - प्रवास ३

लेखक कानडाऊ योगेशु यांनी शनिवार, 30/04/2016 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा : वरील कवितेतील पात्रांचे विचार्/दृष्टीकोन सर्वस्वी कवीचे आहेत.सदर घटना सत्य आहे का काल्पनिक ह्याबाबतीत कवी मौन बाळगत आहे. ------------------------------------------ गोव्याच्या त्या तत्सम एक्झॉटीक बीच वर उघडाबंब मी.. शार्कच्या नजरेप्रमाणे.. कपड्यांना चिकटलेली.. नितळ शरीरे पाहण्यात बिझी असताना... "अहो जास्त पुढे जाऊ नका. तुम्हाला साडेचार फुटात पोहायची सवय आहे..." असा डायरेक्ट आत्म्याशीच संवाद साधणारा आवाज येतो...! ती तूच असतेस. समुद्राच्या पाण्यात तू अलगद अंदाज घेत उतरतेस.... एक एक पाऊल पुढे टाकत..! अन पावलागणिक ओले होणारे तुझे अंग पाहत... मी स्तब्ध राह्तो...! अन मग हळुहळू त