मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

गाडी रूळावरून सांधे बदलून जाते तेंव्हा..

बहुगुणी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मिपावरचा लतादीदींवरचा लेख वाचल्यानंतर डोक्यात घुसलेलं 'जो वादा किया वो' आज सकाळी गुणगुणत होतो (बाथरूम मध्ये, दुसरीकडे कुठे आमची हिंमत असायला), आवरून बाहेर गाडीकडे जात असतांना गाण्याच्या शब्दांचं शिटीत रूपांतर झालेलं. गाडी सुरू केली आणि मग पुन्हा (काचा बंद आहेत हे subconsciously लक्षात येऊन!) शिटीवरून पुन्हा शाब्दिक गाण्यावर. फ्रीवेवर गेल्यावर लक्षात आलं की आपण भलतंच गाणं गातोय आता ... 'ये दिल और उनकी निगाहोंके साये...' च्या मारी! हे गाणं कुठून आलं?

आगे नारी - एक कोंकणी लोकगीत

धनंजय ·
लेखनप्रकार
गोव्यातली "ख्रिस्ती लोकगीते" गोव्याबाहेर फारशी परिचयाची नाहीत. त्यांच्यावर पाश्चिमात्य संगीताची छाप आहे, पण मूळ ती एतद्देशीय आहेत. गोव्यातील पाककलेसारखेच हे घरोघरच्या, गावोगावच्या कलाकारांना स्फुरलेले रम्य मिश्रण आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी गोव्याच्या ख्रिस्ती लोकगीतांचा एक खजिना मला आंतरजालावरती मिळाला. वेगवेगळ्या लोकांनी केलेली संकलने सुरावटीसकट स्कॅन करून या स्थळावर चढवलेली आहेत. एक सुखद आश्चर्य म्हणजे त्यातले एक संकलन (ख्रिस्तवासी) पाद्री लूर्दीन्य बार्रेतो यांनी केलेले होते - हे नाव माझ्या ओळखीचे होते.

आवाजातला गोडवा

प्रशांत उदय मनोहर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
वयोमानापरत्वे दीदींच्या आवाजातला गोडवा कमी झालाय असं अनेक विद्वानांचं मत आहे. हैदराबादमध्ये काही वर्षांपूर्वी लतादीदींचा कार्यक्रम झाला होता, त्यानंतर दीदींचा लाईव्ह कार्यक्रम झाल्याचं ऐकिवात नाही. आवाजातला नाजुकपणा पूर्वीपेक्षा कमी झाला असला, तरी गोडवा अजूनही तितकाच कायम होता असं त्या कार्यक्रमातली गाणी ऐकल्यावर लक्ष्यात येतं. दीदींच्या आवाजाच्या गोडव्याबद्दल बोलण्याची माझी लायकी नाही.

एच्च्. मंगेशकरांचा भ्रमनिरास

भडकमकर मास्तर ·
नुकताच महाराष्ट्र टाईम्सच्या दिवाळी अंकामध्ये बाळासाहेबांनी लिहिलेला एक लेख वाचला. लेखाचा विषय आहे , " सा रे ग म प ..रिअ‍ॅलिटी शो"... मंगेशकरांचा हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे..... खूप मजेदार आहे. लेखातले काही मुद्दे असे, १.स्टेज शो करणार्‍या निवडक गायकांमधून महागायक निवडायच्या या पर्वाची आयडिआ बाळासाहेबांची होती. .. (पर्वानंतर यातल्या सर्व कलाकारांच्या गाण्यांचा एक आल्बम चॅनल काढणार असे आश्वासन चॅनलने दिले होते , परंतु चॅनल आता त्याकडे लक्ष न देता पुढच्या कार्यक्रमाच्या तयारीला लागले सुद्धा....

किराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास...

वाटाड्या... ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सप्रेम नमस्कार मंडळी.. आज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात.. किराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे. असं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला.

हम है राही प्यार के

अनुप्रिया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, ११ नोव्हेंबर २००९ ला एक खास गोष्ट आहे, पुण्यात "निषाद" च्या १९व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली आहे सदाबहार "देव आनंदच्या" गाण्यांची 'आनंद'यात्रा........" हम है राही प्यार के......". देवच्या या 'दिल के करीब' गाण्यांची महफिल घेऊन येणार आहेत....चंद्रशेखर महामुनी. यामधले विशेष म्हणजे सॅक्स सुप्रिमो श्री. मनोहरी सिंग यांचा सहभाग व ऑडीओ विज्युअल सादरीकरण. हा कार्यक्रम ११ नोव्हेंबर २००९ रोजी "यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे" येथे रात्री ८.३० वाजता आहे. तिकीट विक्री ८ नोव्हेबर २००९ पासून सुरू होईल. तिकीटाचे दर- रू २००/- रू १५०/- रू १००/- आणि रू.

पावरफुल्ल तोडी

अन्वय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दुसरे महायुद्ध सुरू होण्याआधी (1933) प्रख्यात शास्त्रीय गायक ओंकारनाथ ठाकूर एकदा युरोपमध्ये संगीत दौऱ्यावर गेले होते. याच दौऱ्यात त्यांना इटलीत जाण्याचा योग आला. मुसोलिनी त्यावेळी इटलीचा सर्वेसर्वा होता. त्याला भारतीय शास्त्रीय संगीत ऐकविण्याची ओंकारनाथांची इच्छा झाली. मुसोलिनीच्या सचिवामार्फत त्यांनी मुसोलिनीला गाणं ऐकविण्याची परवानगी मिळविली. पाच मिनिटात गाणं संपवायचे ही अट होती. पंडितजींनी ती मान्य करून मुसोलिनीसमोर तोडी राग गाण्यास सुरवात केली. वेळ संपत आली; पण मुसोलिनीला गायनाने भारावून गेला होता. त्यानं पंडितजींना खुणेने गात राहायला सांगितलं. तोडी सुरूच होता.

पीर पराई...

विसोबा खेचर ·
लेखनप्रकार
गुणीदास पं जगन्नाथबुवा पुरोहित. हिंदुस्थानी गायकीतलं, आग्रा गायकीतलं, बंदिशीच्या दुनीयेतलं, तबलावादनातलं एक मोठं नांव. पं जितेंद्र अभिषेकी, पं यशवंतबुवा जोशी, मणिक वर्मा, पं रामभाऊ मराठे, पं भाई गायतोंडे यांसारख्या दिग्गजांना घडवणारे जगन्नाथबुवा! कठोर परिश्रम करून गाण्यावर हुकुमत मिळवलेले जगन्नाथबुवा! 'हम्म!

याचे गाणे ऐकाच

अन्वय ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
हेमंत ब्रीजवासी या बालकाचे गाणे ऐकले. डोळ्यात पाणीच उभे राहिले. काय तयारी आहे त्याची. http://lilchamps2009.mypopkorn.com/videos/hemant-brijwasi-performance-october-9.html तुम्ही पण ऐका

मन्ना डे

विदेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
३,५००च्या वर गाणी गाणा-या मन्ना डे यांना २००७ सालचा"दादासाहेब फाळके" पुरस्कार जाहीर झाला आहे. मन्ना डे यांनी गाईलेली अवीट गोडीची गाणी सर्व रसिकांना आता आठवणे , अपरिहार्य आहे ! आपणा सर्वांतर्फे मन्ना डे यांचे मन:पूर्वक अभिनंदन !