ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे निधन

लेखनविषय:
लेखनप्रकार
ज्येष्ठ गायिका गंगूबाई हनगल यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी ह्र्दयविकाराने व श्वसनाच्या दुखण्याने आज हुबळी येथे सकाळी सव्वासात वाजता निधन झाले. त्या गानतपस्विनीला श्रद्धांजली.

डेट्रॉईट्मध्ये ब्लॅक अँड व्हाईट चा कार्यक्रम

हिंदी कृष्णधवल चित्रपटातील गाण्यांचा कार्यक्रम तारीख आणि वेळ : रविवार, २ ऑगस्ट २००९, दुपारी ४:०० ते ७:०० ठिकाणः नोव्हाय हायस्कूल २४०६२ टाफ्ट रोड, नोव्हाय, मिशिगन ४८३७५ गायकः हृषिकेष ऱानडे, विभावरी आपटे, जितेंद्र अभ्यंकर, सावनी रविंद्र संचालनः राहुल सोलापुरकर दिग्दर्शन मिलिंद ओक तिकिटांसाठी संपर्क: (१५ आणि २० डॉलर्स) पराग वाकणकर (दुवा क्र. २) - २४८-७३५-०२०३ (pwakankar@gmail.com) शौनक आठवले (दुवा क्र. १) - ७३४-९४४-६२६६ (bnwmi@yahoo.com)

"कैसी बजाये सखी शाम मुरलिया.." या गाण्याबद्दल माहिती हवी आहे

लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, साधारण वर्षापुर्वी आकाशवाणि वरती एक गाणं ऐकलं होतं आणि मला ते खुप आवडलं होतं. ते कुणी गायलय वगैरे काहीच माहिती नाही. पण ते मी त्यावेळी ध्वनिमुद्रीत करून ठेवलं होतं. ते अपलोड करून त्यचा इथे दुवा देत आहे. http://www.esnips.com/doc/90fe4403-032c-4430-bfc4-f9893c535289/kaisee_bajaye.wma कुणाला माहित असल्यास त्याची गायिका, राग, अल्बम आणि ते कुठे मिळूशकेल हे कृपया सांगा. - दादा कोंडके

लय आणि ताल शरिरातून व्यक्त करणे

लेखनप्रकार
लय आणि ताल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण आपल्या शरिरात व्यक्त होताना त्यांचा घनिष्ठ संबंधही आहे. तालाबद्दल तात्यांनी लेख लिहिला, त्यात त्यांनी आठवण करून दिली हृदयाच्या ठोक्यांमधला ताल हा आपल्या सर्वांमध्येच असतो. पुढे या ठिकाणीच मी वसंतराव देशपांड्यांची एक ध्वनिफीत ऐकली, त्यात त्यांनी सांगितले की हृदयाच्या ठोक्यातून येणारी अचल लय असते, तिच्यातून बदलती लयकारी येऊ शकत नाही - कारण हृदयाची लय अचानक बदलली तर जीव घाबरा होतो, सौंदर्यानुभव येत नाही. पण तरी तात्यांनी म्हटल्यासारखे हे खरेच जाणवते, की आपल्या शरिरात एकाप्रकारची लय असते.

एक हलके फुलके गाणे.

लेखनविषय:
काही महीन्यांपूर्वी रोहीत राऊत या बालकलाकाराचे गाणे ऐकले होते तेव्हा असे वाटले की या (रोहीतच्या)पिढीसाठी गेय कविता लिहायची तर कशी लिहावी लागेल ? मग लक्षात आलं की यांच्या साठी गेय असं काही लिहायचं झालं तर यांचा रीदम अनुभवून मग लिहावं लागेल.संगीताची समज कमी आहे तरी एक प्रयत्न करून पाहीला .तुमच्या पुढे ठेवतो आहे. कल्पना अशी आहे की नोकरी नसलेला एखादा तरुण मुलगा आसपासच्या मुलीकडे रोज बघतो . त्याला ती ज्याम आवडतेय, पण नोकरीचा पत्ता नाही विचारायचं कसं ? कोरस : टफ लूकींग गाय पण डेरींगच नाय गूड लूकींग गाय पण नोकरीच नाय. चेहेरा गोरामोरा का झाला सांग ना. गजरा चुरगळला का गळल्या पाकळ्या क

पावसाची गाणी

लेखनविषय:
लेखनप्रकार
नुकताच पाऊस सुरू झालाय. वाटतं अशावेळी माथेरान, महाबळेश्वर सारख्या ठिकाणी जावं. वस्तीपासून जरा दूर एकांत स्थळी असलेल्या एखाद्या व्हिक्टोरियन शैलीतील लॊजच्या एका कोप़रयातील सुट्च्या गॆलरीत मस्त आरामखुर्चीत पहुडावं, समोरची हिरवाई धुक्याचे झिरझिरीत वस्त्र ल्यायलेली असावी. सायंकाळच्या त्या वेळी हवेतील गारठा अंगावर घेतलेल्या शालीशी लगट करीत असावा. बाजूच्या टेपरेकॊर्डरमधून मस्तपैकी गुलाम अली किंवा मेहदी हसनचे सूर पाझरत असावेत. हातात सोनेरी छटा धारण करणार्या वारुणीचा ग्लास असावा. पाऊस आला की त्याची मजा अनुभवण्याचा हा मार्ग मला आवडतो. पण प्रत्येक वेळी ते शक्य होतेच असे नाही.

अली अकबर गेले ! सूर लोपले!

लेखनविषय:
लेखनप्रकार
विश्वविख्यात सरोदवादक उस्ताद अली अकबर खा यांचे आज निधन झाले. भारतीय सन्गीत जगप्रसिध्द करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आज भारतीय संगीताला जे आंतरराष्ट्रिय व्यासपीठ मिळालय त्याची बीजं अलि अकबर आणि रवि शंकर ह्यांनी रुजवली आहेत. उस्ताद्जींना भावपूर्ण श्रध्दांजली. - शुभंकर. फार वाईट झाले.. माझी भावपूर्ण श्रद्धांजली!! (एकाच बातमीचे दोन धागे झाल्याने दोन्ही धागे एकत्र करून दिले आहेत.) - संपादक.

'फिटे अंधाराचे जाळे' - एक सुरेल अनुभव

लेखनविषय:
लेखनप्रकार
डॉ. किशोर भिसे यांच्या ’सिद्धकला’ या ठाण्याच्या संस्थेतर्फे शनिवार दि. १३ जून ला गडकरी रंगायतन येथे "फिटे अंधाराचे जाळे’ हा श्री. श्रीधर फडके यांच्या व कै. बाबुजींच्या गाण्यांचा कार्यक्रम अयोजित करण्यात आला होता. संकल्पना व संयोजन डॉ. किशोर भिसे व श्री. रवि चौबळ यांचे. ही संस्था केवळ कार्यक्रमच नव्हे तर अनेक उपक्रमही सातत्याने सादर करीत असते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीधरजींनी देवाचे नाव घेत केली - ’देव देव्हार्‍यात नाही’.

मथुरानगरपती काहे तुम...

लेखनविषय:
टीप - ह्या विरहिणीच्या शब्दांबद्दल, अर्थाबद्दल, मी मिपाकर धनंजयला काही भाष्य करण्यास सांगितले आहे.

असलेलं नसलेलं

लेखनविषय:
लेखनप्रकार
वाचकांसाठी सूचना
प्रस्तुत लेख हा भावनेच्या भरतीच्या काळात लिहिलेला आहे. त्यामुळे त्या भावना वाचकांच्या अंगावर आदळून वाचक भिजण्याची शक्यता आहे. कृपया रेनकोट घालून लेख वाचावा. ;) त्यादिवशी खूप दिवसांनी त्याला फोन केला तर त्याच्या कॉलर टयूनमधून नेहमीसारखाच रेहमान भेटला. युवराज चित्रपटातलं मनमोहिनी हे गाणं!
“लट उलझी सुलझा जा बालम… माथे की बिंदिया बिखर गयी है… अपने हाथ सजा जा बलमा”
अरेच्चा ही चीज ओळखीची असूनही अनोळखी का बरं वाटते आहे? भीमपलासच्या कोमल ग नी ची जादू असावी का?
Subscribe to संगीत