Skip to main content

समाज

महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?)

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 15/02/2010 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण :: प्रतिक्रिया पाठवा :: (पण कोठे?) http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=47… (या असल्या धोरणाबाबतच्या बातम्या

प्रेमदिन

लेखक जयवी यांनी रविवार, 14/02/2010 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेमदिन आला म्हणून करतात प्रेम प्रेमदिन सरला की पळतं प्रेम प्रेमदिन सरला की ओसरतं प्रेम प्रेमदिन सरला की विसरतं प्रेम कशाला हवी ही प्रेमाची कसरत प्रेमदिन संपला की बसायचं हात हलवत प्रेम करा, प्रेम करा.... म्हणून होतं का प्रेम प्रेमदिन आला म्हणून करता येतं का प्रेम सगळा नुसता दिखावा.... सगळं प्रेम उथळ एक दिवसाची टिमकी, बाकी थापा निव्वळ जयश्री

पण शाहरूख खान ने एक चूक केली

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 11/02/2010 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
शाहरूख खानने आय पी एल च्या खेळाडूंच्या लिलावानंतर पाकिस्तानी (म्हणत आहेत त्याप्रमाणे तर सर्वच देशांच्या) खेळाडूंना समर्थन दिले. शिवसेनेने त्याविरोधात दंड थोपटले आणि 'माय नेम इज खान' वर बहिष्कार टाकण्यास सांगितले. शाहरूख खान म्हणतो, " मला भारताबद्दल देशप्रेम आहेच. मी त्याविरोधात काही बोललो नाही." (नेमकी त्याची वाक्ये नाहीत पण आशय तोच). गेले आठवडाभर हो नाही चालत, पुन्हा 'माय नेम इज खान' चा विरोध समोर आला. काँग्रेस सरकारने दुटप्पीपणा करत लगेच ह्या सिनेमाला सुरक्षा देण्याचे ठरवले. इतर वेळी ' सुरक्षा मागाल तर देऊ' ही भूमिका. शाहरूख खानने काही चर्चा करण्यास नकार दिला.

भ्रष्टाचाराची पाळेमूळे

लेखक सुनिल पाटकर यांनी बुधवार, 10/02/2010 21:35 या दिवशी प्रकाशित केले.
भ्रष्टाचाराची पाळेमूळे भ्रष्टाचाराची पाळेमूळे आपल्या देशात आपल्या संस्कृती इतकी खोल रुजली गेली आहेत असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.गल्ली पासून दिल्ली पर्यंत पसरलेल्या या समाजव्यवस्थेतील किडीला ` चलता है '’ म्हणत आपण अधिकच खतपाणी घालतो.भ्रष्टाचार करणार्‍यांची ही अफाट बुध्दिमत्ता त्यांनी योग्य कामी वापरली तर भारत महासत्ताक होण्यास फार वेळ लागणार नाही.

सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजग नागरिक पुरस्कार

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी बुधवार, 10/02/2010 10:03 या दिवशी प्रकाशित केले.
७ फेब्रुवारी २०१० ला पुण्यात सजग नागरिक मंचा तर्फे सतिश शेट्टी यांना मरणोत्तर सजन नागरिक पुरस्कार देण्यात आला. संस्थापक विवेक वेलणकर यांनी पुरस्कारामागची भुमिका विशद केली. अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार होता परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येउ न शकल्याने त्याच क्षेत्रातील एक खरेखुरे आयडॊल सातारा जिल्ह्यातील शिवाजी राउत यांच्या हस्ते देण्यात आला. सतिश शेट्टी यांचे एक धाकटे बंधु संदीप शेट्टी व अमेरिकेतुन आलेले दुसरे बंधु संतोष शेट्टी यांनी तो स्वीकारला. माहिती अधिकार क्षेत्रात सामाजिक काम केलेले सतिश शेट्टी हे भारताच्या दुसर्‍या स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा ठरले.

प्रत्येकानी वाचावेच असे.....

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 08/02/2010 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
नुसार संपूर्ण लेख इथे कोपी पेष्ट करून इथे टाकावा असे वाटते पण मिपाच्या पॉलीसीनुसारते शक्य नाही म्हणून हा दुवा इथे देत आहे. आवर्जून वाचावे असे काही http://72.78.249.125/esakal/20100208/5087969775112240764.htm या लोकांची इच्छाशक्तीला लाख सलाम ........ हॅट्स ऑफ

आणखी किती सतिश शेट्टी?

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 06/02/2010 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी किती सतिश शेट्टी? हा लोकशाही उत्सवांतर्गत पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळात २९ जाने २०१० रोजी एक परिसंवाद झाला. परिसंवाद लोकशाही उत्सव समितीने आयोजित केला होता व सतिश शेट्टींना समर्पित केला होता. परिसंवादात माहिती अधिकार क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, मारुती भापकर नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा,सिमप्रितसिंग टाटा इन्स्टिट्युट ऒफ सोशल सायन्सेस यांची मुलाखत मुक्तपत्रकार व आपले मिपाकर श्रावण मोडक व नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु र यांनी घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद चव्हाण यांनी केल.

सर्वच राजकीय पक्षांचा निषेध

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 05/02/2010 01:23 या दिवशी प्रकाशित केले.
ताजी बातमी : रॉकेल ६ रु., गॅस १०० रु. वाढीची शिफारस. गेल्या कित्येक दिवसांपासून डाळ, तांदूळ, गहू, भाज्या, दूध, साखर ह्या सर्व महाग होत असलेल्या वस्तूंमध्ये आता रॉकेल, गॅसची ही भरती. अर्थात त्यांना भाववाढ करायची असेल ५० रू ची. पण १०० सांगितले तर ५० वर लोक तयार होतील असाच त्यांचा विचार असेल म्हणून १०० रू.ची शिफारस. आणि पुढे डिझेल/पेट्रोल रांगेत आहेतच.

गरुडाची मुले

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 04/02/2010 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या व्याख्यानात काय सांगायचे हा मी विचारच केला नव्हता. एका वर्तमानपत्राचा वर्धापनदिन. त्यानी काही पालकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. निमन्त्रण खरेतर पंधरा दिवसाअगोदरच मिळाले होते. व्याख्यानाला नेहमी तयारीनिशी जातोच असे नाही. बरेचदा काही ठराविक विषयावर बोलायचे असे ठरवून जाऊनही उपस्थित गर्दीचे अ‍ॅव्हरेज वय पाहून विषय बदलावा लागतो असा अनुभव गाठीशी बरेचदा होता. वर्तमानपत्राचा वर्धापनदिन ..न नक्की कोणकोण बोलावले आहेत याचा अंदाज लावणे कठीण असते.

बटाटेवडे

लेखक प्रभो यांनी शनिवार, 30/01/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी संपत आला. पहिल्यांदा गड्डा मिस झाला. अरे....समजलं नसेल ना मी काय म्हणतोय ते? मी बोलतोय सोलापुरच्या जत्रेबद्दल, ज्याला सोलापुरातले सगळे गड्डा म्हणतात. साधारण जानेवारीचा पूर्ण महिना जत्रेची तयारी आणी जत्रेला भेट देण्यातच जातात. ५-६ तारखेपासून गड्ड्याची तयारी सुरू होते. आणी गड्डा सुरू होतो १० तारखेपासून.भोगी,संक्रांतीला जास्त महत्व असायचं जत्रेत. काठ्यांची मिरवणूक, अनवाणी चालून ६८ शिवलिंगांना अभिषेक, सिद्धरामेश्वरांचे काठीसोबत लग्न आणी शेवटी दारूकामाची आतिषबाजी.... बाकी जत्रा म्हणजे अशी काही वेगळी असणारे गावचे रितीरिवाज सोडून.