Skip to main content

समाज

होऊ कशी उतराई ?

लेखक नेहमी आनंदी यांनी रविवार, 29/11/2009 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझं नाव शिल्पा.. नाव मोठं आणी लक्षण खोटं म्हणतात अगदी तस्सं. मी खुप सुंदर असणार दिसायला असच वाटुन तिने माझं नाव ठरवले असणार.. असो. तर मी शिल्पा.. जन्माने नि:शक्त.. पुढच्या आयुष्यात औषधाने फ़रक पडण्याची अपेक्षा नसलेली.. mental retardetion घेउन जन्माला आलेली. पहिले ७ दिवस तर डोळेही उघडले नाहीत मी. मला म्हणे पिवळ्या झाला होता. आणि oxizen वर ठेवायची वेळ आली होती. किती कुजबुज झाली असेल तेव्हा देवालाच माहीत.. कारण आई जवळ माझे बाबा ठामपणॆ उभे होते.. हो, त्यात तिचा तरी काय दोष होता? कोणत्या आईला वाटेल तिच्या पोटी असे बाळ जन्माला यावे? आईने माझे खुप काही केले. कुठे कुठे दवाखान्यात नेले.

हे घ्या थोडं मीठ... चोळा तुमच्या जखमांवर !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 27/11/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्यापैकी अनेकांनी हे व्हीडिओज पाहिलेही असतील. पण पुन्हा बघा... अन आयुष्यभर लक्षात ठेवा. http://www.mumbaihangout.org/index.php?option=com_content&task=view&id=…

२६ नोव्हेंबर विसरायचा नसेल तर आवर्जून पहावं असं काही

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 26/11/2009 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
भष्टाचाराविरूद्ध महत्वाचे हत्यार ठरू शकणार्‍या माहिती आधिकाराच्या कायद्यानंतर त्याच्या काही यश-कथा वाचल्या, तसंच हेमंत करकरे, विजय साळस्कर आणि अशोक कामटे यांच्या अतिरेक्यांद्वारा हत्येनंतर त्यांच्या बुलेटप्रूफ जॅकेट विषयीच्या चौकशीला मिळालेलं असं बेजबाबदार उत्तरही वाचनात आलं.

...आणि `गोठलेल्या' अश्रूंना पुन्हा वाट फुटली!!

लेखक दिनेश५७ यांनी बुधवार, 25/11/2009 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून "जीपीओ'कडील रस्त्याने बाहेर पडणारी गर्दी आज नेहमीसारखी "वाहत' नव्हती. या दिशेने बाहेर पडणाऱ्या आणि रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची पावले आज थबकत होती... आणि मूक होऊन पुढे सरकत होती. गेल्या वर्षी 26 नोव्हेंबरला याच रेल्वेस्थानकावर अतिरेक्‍यांनी अंदाधुंद गोळीबार करीत पहिला उच्छाद मांडला आणि नंतर अवघ्या मुंबईला वेठीस धरले. आज या स्थानकावर पाय ठेवणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच "त्या' दिवसाच्या आठवणींचा वेढा पडलेला असतानाच, स्थानकाबाहेरच्या रस्त्यावरचे छायाचित्रांचे प्रदर्शन अंतर्मुख करीत होते.

यशवंतराव चव्हाण यांची आज २५ वी पुण्यतीथी.

लेखक मधु मलुष्टे ज्यु. बी. ए. यांनी बुधवार, 25/11/2009 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व संयुक्त महाराष्ट्राचे पहीले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज २५ वी पुण्यतीथी. त्यांना आदरांजली.

बदलती शिल्पे, बदलता समाज

लेखक चित्रा यांनी बुधवार, 25/11/2009 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
बॉस्टनच्या म्युझियम ऑफ फाईन आर्टस (कला संग्रहालया) मध्ये आम्ही काय खाल्ले सारखे (अजूनच) रटाळ डिटेल्स कोणाला नको असतील असे धरून पुढे चालू करते... आर्ट म्युझियम म्हटले की खरे तर आपल्या डोळ्यांसमोर शिल्पे, भिंतीवर अडकवलेली चित्रे, फारतर कलात्मक गालिचे अशा वस्तू येतात, पण बहुदा टीव्ही येत नाहीत/नसावेत. पण आम्ही खाणे आटपून मधल्या चौकातून जिन्याकडे जायला निघालो तो काही लोक भिंतीला टेकून समोर पाहत हसत असल्याचे दिसले. तर त्यांच्यासमोर भिंतीवर एकत्र जोडलेल्या पंधरा-वीस लहान टीव्हींचा एक संच होता.

शिवनेरिची वारी

लेखक झकासराव यांनी मंगळवार, 24/11/2009 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी शिवनेरीला जाउन आलो. आपल्या महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जिथे झाला त्या ठिकाणी जायचं ह्या कल्पनेनच सॉल्लिड्ड मस्त वाटत होतं. काय करणार. ज्यावेळी पुण्यात येवुन पहिल्यांदाच लाल महाल पाहिला होता त्यावेळी तिथली माती कपाळाला लावणारी आम्ही येडी. त्यामुळे असं गडावर जायच म्हणल की स्फुरण चढतचं. :) मग काय माहिती गोळा करुन चार टाळकी जमवुन निघालो. फोटो टाकतोच पण आधी थोडासा इतिहास टाकतो गडाचा. हा गड छत्रपतींच्या काळात स्वराज्यात नव्हता. वाचुन विश्वास नाही ना बसला.

मी कोण?

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 24/11/2009 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
त्यांनी जेव्हा मला विचारलं आपण कोण! तेव्हा माझ्या मनी प्रथम उत्तर आलं या अफाट विश्वातला एक छटाक माणुस मी! पण मनातलं उत्तर ओठांवर येण्याआधीच कानी आला ओरडा देशद्रोही, भारत माता की जय, जयहिंद! अन तेव्हा मी म्हणलं मी एक भारतीय हेच बरोबर उत्तर असेल बहुतेक! तेव्हढ्यात कुणीतरी चिरकलं काफीर, दार-उल-हर्ब, गर्व से कहो हम हिंदु है! तेव्हा मी विचार केला मी हिंदु असंच सांगण योग्य! पण तेव्हढ्यात कानी आला गलका घाटी, भांडी घासा आमची, घास रे रामा, जय महाराष्ट्र! मग मनी म्हणलं आहेच मी मराठी तर गरजेन जय महाराष्ट्र! तोवर कुजबुज सुरु झाली सवर्ण, दलीत, बामण, ९६ कुळी! मग मला आठवली जातीकरता खावी माती ही उक्ती!